शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

चक्रेश्वर मंदिराकडे जाणारा पूल खचला

By admin | Updated: February 20, 2017 02:16 IST

येथील बलुत आळीकडून चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावरील पूल रहदारीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलाजवळील रस्त्यालगतचा भाग खचल्याने

पुणे : चाकण (ता. खेड) येथील बलुत आळीकडून चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावरील पूल रहदारीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलाजवळील रस्त्यालगतचा भाग खचल्याने हा पूलच ढासळण्याच्या अवस्थेत आहे. या पुलाच्या बाजूपट्ट्या खचत चालल्याने धोकादायक ठरत आहेत. पुलावर संपूर्णपणे नवीन लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याची आणि पुलाजवळील खचलेल्या भागात भराव टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. हा पूल रहदारीला धोकादायक असल्याने पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. चर्मकारवस्तीपासून पुढे ओढ्यावरील पुलावरून जाणारा रस्ता चाकण चक्रेश्वर रस्त्याला जोडला जातो. हाच रस्ता पुढे चाकण-शिक्रापूर रस्त्यावर जाण्यास सोयीचा असल्याने या पुलावरून अनेक वाहनांची वर्दळ असते. पूल अरुंद असून त्यावरील संरक्षक लोखंडी पाइप तुटलेले आहेत. या रस्त्यावरील संबंधित पुलाजवळ नागमोडी वळण आहे. धक्कादायक म्हणजे पुलालगतच्या भागात सिमेंट रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भाग खचला आहे. त्यामुळे सिमेंटचा रस्ता खालून पोकळ झाला आहे. त्यातच मोठ्या वाहनांच्या रहदारीने पूलसुद्धा खचत चालला आहे. रात्रीच्या वेळी या धोकादायक भागाचा अंदाजच येत नाही. त्यामुळे येथून एखादे वाहन खाली ओढ्यात कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या रस्त्यावरील धोकादायक नागमोडी वळण काढून संपूर्णपणे नवीन पूल बांधण्यासाठी नगर परिषदेने प्रयत्न करण्याची मागणीही परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.नागरिकांत नाराजी या पुलावरून विद्यार्थी, नोकरदार, चक्रेश्वर मंदिराकडे जाणारे भाविक आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रा यांची नेहमी वर्दळ असते. संबंधित पुलाच्या दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. चाकण नगर परिषदेने लक्ष देऊन पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील रहिवासी व यंग जॉली क्लब मंडळाचे संतोष वाव्हळ, राजेंद्र जगनाडे यांनी केली आहे.