शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शहरातील काळा पैसावाल्यांना हादरा

By admin | Updated: November 9, 2016 02:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाचे सर्जिकल स्ट्राइक या उद्देशाने मंगळवारी मध्यरात्रीपासून हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाचे सर्जिकल स्ट्राइक या उद्देशाने मंगळवारी मध्यरात्रीपासून हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यांच्याकडे या नोटा असतील त्यांना या नोटा बँकेत जमा करण्याची ५० दिवसांची मुदत दिली. ही माहिती मिळताच अनेकांचे धाबे दणाणले. घरातील हजार-पाचशेंच्या नोटांचा समावेश असलेल्या मोठ्या रकमेचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. आगामी महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून काहींनी कोट्यवधींचा काळा पैसा जमा करून ठेवला आहे. एवढी मोठी रक्कम बँकेत जमा करता येत नाही. भविष्यात वापरातही येणार नाही. त्यामुळे नेमके काय करायचे, असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. दोन दिवस बँका व एटीएम बंद राहतील, असे नमूद केल्याने व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. एटीएम केंद्रात नोटा स्वीकृतीच्या यंत्रांवर काहींनी तर रात्रीच धाव घेतली. हजार, पाचशेच्या नोटा त्या यंत्रात जमा केल्या. नोटांचा भरणा करण्यासाठी अक्षरश: रात्री गर्दी उसळली. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, अशांनी खासगी पतसंस्था, सहकारी बँकांकडे धाव घेतली. आपल्याकडील रक्कम त्या पतसंस्थेत आणि सहकारी बॅँकेत भरण्यास प्राधान्य दिले. जमीन खरेदी विक्री करणारे एजंट, रिअल इस्टेट व्यावसायिक ज्यांची दिवसाची आर्थिक उलाढाल मोठी आहे, अशांचे धाबे दणाणले आहे. ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम भरताना पॅन कार्ड बंधनकारक आहे. पॅनकार्डशिवाय मोठी रक्कम काढता येत नाही. त्यामुळे बेहिशेबी मोठी रक्कम बँकेत भरायची झाल्यास पैसे कोठून आले हे प्राप्तिकर खात्याला दाखवून देणे भाग पडणार आहे. आतापर्यंत प्राप्तिकर खात्याची दिशाभूल करून शासनाचा कर न भरणाऱ्यांना काळा पैसा लपविणे अवघड जात आहे.(प्रतिनिधी)