शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मावळ तालुक्यात भातलागवडी जोमात

By admin | Updated: July 2, 2017 02:26 IST

मावळ तालुक्यात सध्या भाताची रोपे लागवडीच्या कामांची धामधूम सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात सध्या भाताची रोपे लागवडीच्या कामांची धामधूम सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. सध्या पावसाचा जोर असल्याने लावणीच्या कामांना विलंब होऊ नये, यासाठी येथील शेतकरी प्लॅस्टिक कागद, पोते, इरले-घोंगड्याचा वापर करून भात लावणीची कामे करताना दिसत आहेत.मावळ तालुक्यात खरीप हंगामात भात हे मुख्य पीक शेतकरी घेतात. या भागातील शेतकरी दरवर्षी नदीच्या पाण्यावर रोपवाटिका तयार करतात. चार-पाच दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने रोपे लागवडीसाठी शेतात पाणी  आल्याने लागवड सुरू करण्यात आली.वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मुळशी तालुक्यात भातलागवडीसाठी मजूरच मिळत नाहीत. काही गावांमध्ये एकमेकांमध्ये अदलाबदली करून भातलागवड सुरू केली आहे. काही परराज्यांतील बांधकाम मजुरांना शेतीकामासाठी न्यावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.अधिक उत्पन्न वाढीसाठी व मशागतीसाठी चारसूत्री पद्धत अत्यंत योग्य असल्याने, रोग व किड्यांचे नियंत्रण करणे सोपे जाते. त्याचबरोबर सर्व रोपांना योग्य प्रकारे सूर्यप्रकाश मिळतो. हवा खेळती राहत असल्याने उत्पन्नात भरघोस वाढ होत आहे. शेतकरी सध्या पारंपरिक पद्धत सोडून चारसूत्री भातलागवडीकडे वळलेला दिसत आहे.वारंवार कृषी अधिकाऱ्यांकडून सल्ला घेतला जात आहे. तसेच शेतकरी एकमेकांना मदत करत असल्याने भात रोपांची लागवड केली जात आहे. तसेच आधुनिक चारसुत्री पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने समाधान व्यक्त होत आहे.संततधार पावसाने भातरोपे जोमातवडगाव मावळ : या नक्षत्रात निसर्गाच्या अवकृपेमुळे पावसाने दडी मारल्याने भातपिकाच्या दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकऱ्यावर ओढवले असते. ठिकठिकाणी भाताची रोपे उगवली होती. ती पावसाअभावी पिवळी पडत चालली होती. तरी, बळीराजाला वरुणराजने चांगली साथ दिली; त्यामुळे भातरोपे जोमात आली आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. भातरोपे मोठ्या डौलात वाढत आहेत.