शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तालुक्यात भातलागवडी जोमात

By admin | Updated: July 2, 2017 02:26 IST

मावळ तालुक्यात सध्या भाताची रोपे लागवडीच्या कामांची धामधूम सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात सध्या भाताची रोपे लागवडीच्या कामांची धामधूम सुरू आहे. चार-पाच दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. सध्या पावसाचा जोर असल्याने लावणीच्या कामांना विलंब होऊ नये, यासाठी येथील शेतकरी प्लॅस्टिक कागद, पोते, इरले-घोंगड्याचा वापर करून भात लावणीची कामे करताना दिसत आहेत.मावळ तालुक्यात खरीप हंगामात भात हे मुख्य पीक शेतकरी घेतात. या भागातील शेतकरी दरवर्षी नदीच्या पाण्यावर रोपवाटिका तयार करतात. चार-पाच दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने रोपे लागवडीसाठी शेतात पाणी  आल्याने लागवड सुरू करण्यात आली.वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मुळशी तालुक्यात भातलागवडीसाठी मजूरच मिळत नाहीत. काही गावांमध्ये एकमेकांमध्ये अदलाबदली करून भातलागवड सुरू केली आहे. काही परराज्यांतील बांधकाम मजुरांना शेतीकामासाठी न्यावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.अधिक उत्पन्न वाढीसाठी व मशागतीसाठी चारसूत्री पद्धत अत्यंत योग्य असल्याने, रोग व किड्यांचे नियंत्रण करणे सोपे जाते. त्याचबरोबर सर्व रोपांना योग्य प्रकारे सूर्यप्रकाश मिळतो. हवा खेळती राहत असल्याने उत्पन्नात भरघोस वाढ होत आहे. शेतकरी सध्या पारंपरिक पद्धत सोडून चारसूत्री भातलागवडीकडे वळलेला दिसत आहे.वारंवार कृषी अधिकाऱ्यांकडून सल्ला घेतला जात आहे. तसेच शेतकरी एकमेकांना मदत करत असल्याने भात रोपांची लागवड केली जात आहे. तसेच आधुनिक चारसुत्री पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने समाधान व्यक्त होत आहे.संततधार पावसाने भातरोपे जोमातवडगाव मावळ : या नक्षत्रात निसर्गाच्या अवकृपेमुळे पावसाने दडी मारल्याने भातपिकाच्या दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकऱ्यावर ओढवले असते. ठिकठिकाणी भाताची रोपे उगवली होती. ती पावसाअभावी पिवळी पडत चालली होती. तरी, बळीराजाला वरुणराजने चांगली साथ दिली; त्यामुळे भातरोपे जोमात आली आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. भातरोपे मोठ्या डौलात वाढत आहेत.