शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

भाटनगर वसाहतही धोक्याच्या छायेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:22 IST

भाटनगर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वडाची झाडे उगवली असून सांडपाण्याच्या गळतीमुळे भिंती शेवाळल्या आहेत.

पिंपरी : भाटनगर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वडाची झाडे उगवली असून सांडपाण्याच्या गळतीमुळे भिंती शेवाळल्या आहेत. यामुळे या इमारती लवकरच खचण्याच्या मार्गावर आहेत की काय, अशी भीती येथील रहिवाशांच्या मनाला लागून राहिली आहे. मात्र, पुनर्वसन प्रकल्पाचे पुन्हा पुनर्वसन करता येत नसल्याचे कारण देत महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे घाटकोपरमधील ‘साईसिद्धी’ची पुनरावृत्ती झाली तर दोष कुणाला द्यायचा, असा सवाल उपस्थित होत आहे.झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वतीने १९८७ मध्ये भाटनगर येथे पहिला बहुमजली पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत भाटनगर, बौद्धनगर, अशोकनगर येथे १७ इमारती उभारण्यात आल्या. या प्रकल्पाचे त्या वेळी मोठे कौतुकही झाले होते. तथापि, सद्य:स्थितीमध्ये या सर्व इमारतींची दुरवस्था झाली आहे़पुनर्वसन प्रकल्पातील इमारती ३० वर्षे जुन्या झाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे वास्तव्यास धोका निर्माण झाला आहे. जिणे नादुरुस्त झाले आहेत. त्यावरून चढउतार करतेवेळी अपघात होत असतात. पावसाळ्यात तर चौथ्या मजल्यावरील घरांमध्ये छतातून पाणी गळते. ड्रेनेज व्यवस्था खराब झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक इमारतींना तडे गेले आहेत. इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वड, पिंपळासारखी झाडे उगवली आहेत. इमारतीच्या बहुतांश भिंती शेवाळलेल्या असल्याने कमकुवत बनल्या आहेत. ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्यामध्ये आळ्यांची बजबज पहायला मिळत आहे. भटक्या जनावरांचा वावरही मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. या समस्यांविषयी स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन एक-एक दिवस कंठत असल्याची भावना येथील महिलांनी व्यक्त केली. विजेचे मीटर गायब झाले असून बाहेरील खांबावरून घेण्यात आलेल्या वीज जोडणीमुळे इमारतीमध्ये धोकादायक विजेचे जाळे निर्माण झाले आहे. इमारत कोसळण्याच्या भीतीबरोबरच धोकादायक वीजतारांमुळेदेखील मोठी दुर्घटना होऊ शकते. भाटनगर प्रकल्पाचे पुन्हा पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.