शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

भाटनगर वसाहतही धोक्याच्या छायेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:22 IST

भाटनगर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वडाची झाडे उगवली असून सांडपाण्याच्या गळतीमुळे भिंती शेवाळल्या आहेत.

पिंपरी : भाटनगर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वडाची झाडे उगवली असून सांडपाण्याच्या गळतीमुळे भिंती शेवाळल्या आहेत. यामुळे या इमारती लवकरच खचण्याच्या मार्गावर आहेत की काय, अशी भीती येथील रहिवाशांच्या मनाला लागून राहिली आहे. मात्र, पुनर्वसन प्रकल्पाचे पुन्हा पुनर्वसन करता येत नसल्याचे कारण देत महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे घाटकोपरमधील ‘साईसिद्धी’ची पुनरावृत्ती झाली तर दोष कुणाला द्यायचा, असा सवाल उपस्थित होत आहे.झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वतीने १९८७ मध्ये भाटनगर येथे पहिला बहुमजली पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत भाटनगर, बौद्धनगर, अशोकनगर येथे १७ इमारती उभारण्यात आल्या. या प्रकल्पाचे त्या वेळी मोठे कौतुकही झाले होते. तथापि, सद्य:स्थितीमध्ये या सर्व इमारतींची दुरवस्था झाली आहे़पुनर्वसन प्रकल्पातील इमारती ३० वर्षे जुन्या झाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे वास्तव्यास धोका निर्माण झाला आहे. जिणे नादुरुस्त झाले आहेत. त्यावरून चढउतार करतेवेळी अपघात होत असतात. पावसाळ्यात तर चौथ्या मजल्यावरील घरांमध्ये छतातून पाणी गळते. ड्रेनेज व्यवस्था खराब झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक इमारतींना तडे गेले आहेत. इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वड, पिंपळासारखी झाडे उगवली आहेत. इमारतीच्या बहुतांश भिंती शेवाळलेल्या असल्याने कमकुवत बनल्या आहेत. ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्यामध्ये आळ्यांची बजबज पहायला मिळत आहे. भटक्या जनावरांचा वावरही मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. या समस्यांविषयी स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन एक-एक दिवस कंठत असल्याची भावना येथील महिलांनी व्यक्त केली. विजेचे मीटर गायब झाले असून बाहेरील खांबावरून घेण्यात आलेल्या वीज जोडणीमुळे इमारतीमध्ये धोकादायक विजेचे जाळे निर्माण झाले आहे. इमारत कोसळण्याच्या भीतीबरोबरच धोकादायक वीजतारांमुळेदेखील मोठी दुर्घटना होऊ शकते. भाटनगर प्रकल्पाचे पुन्हा पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.