शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

भाटनगर वसाहतही धोक्याच्या छायेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:22 IST

भाटनगर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वडाची झाडे उगवली असून सांडपाण्याच्या गळतीमुळे भिंती शेवाळल्या आहेत.

पिंपरी : भाटनगर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वडाची झाडे उगवली असून सांडपाण्याच्या गळतीमुळे भिंती शेवाळल्या आहेत. यामुळे या इमारती लवकरच खचण्याच्या मार्गावर आहेत की काय, अशी भीती येथील रहिवाशांच्या मनाला लागून राहिली आहे. मात्र, पुनर्वसन प्रकल्पाचे पुन्हा पुनर्वसन करता येत नसल्याचे कारण देत महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे घाटकोपरमधील ‘साईसिद्धी’ची पुनरावृत्ती झाली तर दोष कुणाला द्यायचा, असा सवाल उपस्थित होत आहे.झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वतीने १९८७ मध्ये भाटनगर येथे पहिला बहुमजली पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत भाटनगर, बौद्धनगर, अशोकनगर येथे १७ इमारती उभारण्यात आल्या. या प्रकल्पाचे त्या वेळी मोठे कौतुकही झाले होते. तथापि, सद्य:स्थितीमध्ये या सर्व इमारतींची दुरवस्था झाली आहे़पुनर्वसन प्रकल्पातील इमारती ३० वर्षे जुन्या झाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे वास्तव्यास धोका निर्माण झाला आहे. जिणे नादुरुस्त झाले आहेत. त्यावरून चढउतार करतेवेळी अपघात होत असतात. पावसाळ्यात तर चौथ्या मजल्यावरील घरांमध्ये छतातून पाणी गळते. ड्रेनेज व्यवस्था खराब झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक इमारतींना तडे गेले आहेत. इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वड, पिंपळासारखी झाडे उगवली आहेत. इमारतीच्या बहुतांश भिंती शेवाळलेल्या असल्याने कमकुवत बनल्या आहेत. ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्यामध्ये आळ्यांची बजबज पहायला मिळत आहे. भटक्या जनावरांचा वावरही मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. या समस्यांविषयी स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन एक-एक दिवस कंठत असल्याची भावना येथील महिलांनी व्यक्त केली. विजेचे मीटर गायब झाले असून बाहेरील खांबावरून घेण्यात आलेल्या वीज जोडणीमुळे इमारतीमध्ये धोकादायक विजेचे जाळे निर्माण झाले आहे. इमारत कोसळण्याच्या भीतीबरोबरच धोकादायक वीजतारांमुळेदेखील मोठी दुर्घटना होऊ शकते. भाटनगर प्रकल्पाचे पुन्हा पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.