शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

भाटनगर वसाहतही धोक्याच्या छायेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:22 IST

भाटनगर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वडाची झाडे उगवली असून सांडपाण्याच्या गळतीमुळे भिंती शेवाळल्या आहेत.

पिंपरी : भाटनगर येथील पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वडाची झाडे उगवली असून सांडपाण्याच्या गळतीमुळे भिंती शेवाळल्या आहेत. यामुळे या इमारती लवकरच खचण्याच्या मार्गावर आहेत की काय, अशी भीती येथील रहिवाशांच्या मनाला लागून राहिली आहे. मात्र, पुनर्वसन प्रकल्पाचे पुन्हा पुनर्वसन करता येत नसल्याचे कारण देत महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे घाटकोपरमधील ‘साईसिद्धी’ची पुनरावृत्ती झाली तर दोष कुणाला द्यायचा, असा सवाल उपस्थित होत आहे.झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वतीने १९८७ मध्ये भाटनगर येथे पहिला बहुमजली पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत भाटनगर, बौद्धनगर, अशोकनगर येथे १७ इमारती उभारण्यात आल्या. या प्रकल्पाचे त्या वेळी मोठे कौतुकही झाले होते. तथापि, सद्य:स्थितीमध्ये या सर्व इमारतींची दुरवस्था झाली आहे़पुनर्वसन प्रकल्पातील इमारती ३० वर्षे जुन्या झाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे वास्तव्यास धोका निर्माण झाला आहे. जिणे नादुरुस्त झाले आहेत. त्यावरून चढउतार करतेवेळी अपघात होत असतात. पावसाळ्यात तर चौथ्या मजल्यावरील घरांमध्ये छतातून पाणी गळते. ड्रेनेज व्यवस्था खराब झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक इमारतींना तडे गेले आहेत. इमारतींच्या भिंतींवर झुडपांसह वड, पिंपळासारखी झाडे उगवली आहेत. इमारतीच्या बहुतांश भिंती शेवाळलेल्या असल्याने कमकुवत बनल्या आहेत. ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्यामध्ये आळ्यांची बजबज पहायला मिळत आहे. भटक्या जनावरांचा वावरही मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. या समस्यांविषयी स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन एक-एक दिवस कंठत असल्याची भावना येथील महिलांनी व्यक्त केली. विजेचे मीटर गायब झाले असून बाहेरील खांबावरून घेण्यात आलेल्या वीज जोडणीमुळे इमारतीमध्ये धोकादायक विजेचे जाळे निर्माण झाले आहे. इमारत कोसळण्याच्या भीतीबरोबरच धोकादायक वीजतारांमुळेदेखील मोठी दुर्घटना होऊ शकते. भाटनगर प्रकल्पाचे पुन्हा पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.