शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

निष्काळजीपणा बेततोय जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 04:11 IST

पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावर देहूरोड ते खडकी दरम्यान अपघातांचे प्रमाण अधिक आहे

पिंपरी : पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावर देहूरोड ते खडकी दरम्यान अपघातांचे प्रमाण अधिक आहे. पुणे, तसेच लोणावळा या अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकांच्या हद्दीत घडणाऱ्या अपघाताच्या घटनांच्या तुलनेत देहूरोड ते खडकी या वर्दळ नसलेल्या ठिकाणी अपघातांची अधिक नोंद आहे. या अपघातांना नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे.पुणे ते लोणावळा लोहमार्गावर देहूरोड ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान महिन्याकाठी किमान दोन ते तीन जण रेल्वे अपघाताचे बळी ठरत आहेत. वास्तविक, या मार्गावर लोकलच्या फेºया कमी आहेत. एक्सप्रेससुद्धा विशिष्ट वेळेत आहेत. मुंबई, पुण्याप्रमाणे येथे रेल्वे मिनिटा-मिनिटाला धावत नाही. तरी वर्षभरात घडलेल्या घटनांची संख्या २५ हून अधिक आहे. देहूरोडमध्ये ३, आकुर्डीत ४, पिंपरीत ६, कासारवाडीत ५, दापोडीत ४, खडकीत ३ अशा अपघातांच्या घटनांची नोंद आहे. याशिवाय रेल्वे अपघातात जखमी होण्याच्या, कायमचे जायबंदी होण्याच्याही घटना शहरात घडल्या आहेत.कानाला हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणाºया तरुणांना रेल्वेच्या धडकेने जीव गमावावा लागल्याच्या घटना पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा महिन्यांपूर्वी घडल्या आहेत. धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणाºयांना पिंपरी आणि कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या हद्दीत प्राणास मुकावे लागले आहे. रेल्वे प्रवासात हुल्लडबाजीकरणाºया दरवाजात थांबून अथवा दरवाजात पाय बाहेर सोडून बसणारे तरुण खांबाचा धक्का लागून पडले आहेत. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनांची रेल्वे पोलिसांकडे नोंद आहे. देहूरोड, पिंपरी, आकुर्डी, कासारवाडी, दापोडी या रेल्वे स्थानकांवर हमखास अपघात घडून येत आहेत.प्रवासावेळी दक्षता बाळगावीपुणे ते लोणावळा दरम्यानचा प्रवास करताना ३१ वर्षांची महिला गर्दीमुळे पाय घसरून पडली. त्याच वेळी प्रसंगावधान दाखवून पी़ टी़ कर्दाळे आणि अनिल बागुल या रेल्वे पोलिसांनी तिला वाचविले. मोठ्या दुर्घटनेतून ही महिला बचावली. प्रवास करताना नागरिक सुरक्षिततेची दक्षता घेत नाहीत. त्यामुळे दुर्घटना घडतात, असे त्यांचे मत आहे.रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडताना कोयना एक्सप्रेसच्या धडकेत दोन मुलांसह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. १२ नोव्हेंबर २०१७ ला पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडलेली घटना अद्यापही नागरिकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. लोणावळा-पुणे लोकलमधून पिंपरी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर मुलांना घेऊन रुळ ओलांडत असताना मुंबईकडे जाणाºया कोयना एक्सप्रेसची धडक महिलेसह मुलांना बसली. तिघांचा जागीच मृत्यू झाला. २५ वर्षे वयाची महिला, सात वर्षांचा मुलगा, १० वर्षांची मुलगी आहे. असे तीनजण रेल्वे अपघातात दगावले. या घटनेनंतर नागरिक दक्षतेचा धडा घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र मातेसह दोन मुले दगावण्याची हृदयद्रावक घटना घडल्यानंतरही जोखीम पत्करून धोकादायकरीत्या रूळ ओलांडणाºयांची संख्या घटलेली नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेले पादचारी पूल ओस पडल्याचे दिसून येतात. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी येथे पुलाचा वापर करण्याऐवजी उडी मारून शॉर्टकट मार्गाने रुळ ओलांडताना प्रवासी दिसून येतात. रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे रुळ ओलांडू नये,पादचारी मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना दिल्या जात असताना, त्याकडे दुर्लक्ष करून प्रवासी धोकादायकरीत्या रुळ ओलांडताना दिसतात.