शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

निष्काळजीपणा बेततोय जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 04:11 IST

पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावर देहूरोड ते खडकी दरम्यान अपघातांचे प्रमाण अधिक आहे

पिंपरी : पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावर देहूरोड ते खडकी दरम्यान अपघातांचे प्रमाण अधिक आहे. पुणे, तसेच लोणावळा या अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकांच्या हद्दीत घडणाऱ्या अपघाताच्या घटनांच्या तुलनेत देहूरोड ते खडकी या वर्दळ नसलेल्या ठिकाणी अपघातांची अधिक नोंद आहे. या अपघातांना नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे.पुणे ते लोणावळा लोहमार्गावर देहूरोड ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान महिन्याकाठी किमान दोन ते तीन जण रेल्वे अपघाताचे बळी ठरत आहेत. वास्तविक, या मार्गावर लोकलच्या फेºया कमी आहेत. एक्सप्रेससुद्धा विशिष्ट वेळेत आहेत. मुंबई, पुण्याप्रमाणे येथे रेल्वे मिनिटा-मिनिटाला धावत नाही. तरी वर्षभरात घडलेल्या घटनांची संख्या २५ हून अधिक आहे. देहूरोडमध्ये ३, आकुर्डीत ४, पिंपरीत ६, कासारवाडीत ५, दापोडीत ४, खडकीत ३ अशा अपघातांच्या घटनांची नोंद आहे. याशिवाय रेल्वे अपघातात जखमी होण्याच्या, कायमचे जायबंदी होण्याच्याही घटना शहरात घडल्या आहेत.कानाला हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणाºया तरुणांना रेल्वेच्या धडकेने जीव गमावावा लागल्याच्या घटना पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा महिन्यांपूर्वी घडल्या आहेत. धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणाºयांना पिंपरी आणि कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या हद्दीत प्राणास मुकावे लागले आहे. रेल्वे प्रवासात हुल्लडबाजीकरणाºया दरवाजात थांबून अथवा दरवाजात पाय बाहेर सोडून बसणारे तरुण खांबाचा धक्का लागून पडले आहेत. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनांची रेल्वे पोलिसांकडे नोंद आहे. देहूरोड, पिंपरी, आकुर्डी, कासारवाडी, दापोडी या रेल्वे स्थानकांवर हमखास अपघात घडून येत आहेत.प्रवासावेळी दक्षता बाळगावीपुणे ते लोणावळा दरम्यानचा प्रवास करताना ३१ वर्षांची महिला गर्दीमुळे पाय घसरून पडली. त्याच वेळी प्रसंगावधान दाखवून पी़ टी़ कर्दाळे आणि अनिल बागुल या रेल्वे पोलिसांनी तिला वाचविले. मोठ्या दुर्घटनेतून ही महिला बचावली. प्रवास करताना नागरिक सुरक्षिततेची दक्षता घेत नाहीत. त्यामुळे दुर्घटना घडतात, असे त्यांचे मत आहे.रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडताना कोयना एक्सप्रेसच्या धडकेत दोन मुलांसह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. १२ नोव्हेंबर २०१७ ला पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडलेली घटना अद्यापही नागरिकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. लोणावळा-पुणे लोकलमधून पिंपरी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर मुलांना घेऊन रुळ ओलांडत असताना मुंबईकडे जाणाºया कोयना एक्सप्रेसची धडक महिलेसह मुलांना बसली. तिघांचा जागीच मृत्यू झाला. २५ वर्षे वयाची महिला, सात वर्षांचा मुलगा, १० वर्षांची मुलगी आहे. असे तीनजण रेल्वे अपघातात दगावले. या घटनेनंतर नागरिक दक्षतेचा धडा घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र मातेसह दोन मुले दगावण्याची हृदयद्रावक घटना घडल्यानंतरही जोखीम पत्करून धोकादायकरीत्या रूळ ओलांडणाºयांची संख्या घटलेली नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेले पादचारी पूल ओस पडल्याचे दिसून येतात. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी येथे पुलाचा वापर करण्याऐवजी उडी मारून शॉर्टकट मार्गाने रुळ ओलांडताना प्रवासी दिसून येतात. रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे रुळ ओलांडू नये,पादचारी मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना दिल्या जात असताना, त्याकडे दुर्लक्ष करून प्रवासी धोकादायकरीत्या रुळ ओलांडताना दिसतात.