शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निष्काळजीपणा बेततोय जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 04:11 IST

पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावर देहूरोड ते खडकी दरम्यान अपघातांचे प्रमाण अधिक आहे

पिंपरी : पुणे ते लोणावळा रेल्वे मार्गावर देहूरोड ते खडकी दरम्यान अपघातांचे प्रमाण अधिक आहे. पुणे, तसेच लोणावळा या अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकांच्या हद्दीत घडणाऱ्या अपघाताच्या घटनांच्या तुलनेत देहूरोड ते खडकी या वर्दळ नसलेल्या ठिकाणी अपघातांची अधिक नोंद आहे. या अपघातांना नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे.पुणे ते लोणावळा लोहमार्गावर देहूरोड ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान महिन्याकाठी किमान दोन ते तीन जण रेल्वे अपघाताचे बळी ठरत आहेत. वास्तविक, या मार्गावर लोकलच्या फेºया कमी आहेत. एक्सप्रेससुद्धा विशिष्ट वेळेत आहेत. मुंबई, पुण्याप्रमाणे येथे रेल्वे मिनिटा-मिनिटाला धावत नाही. तरी वर्षभरात घडलेल्या घटनांची संख्या २५ हून अधिक आहे. देहूरोडमध्ये ३, आकुर्डीत ४, पिंपरीत ६, कासारवाडीत ५, दापोडीत ४, खडकीत ३ अशा अपघातांच्या घटनांची नोंद आहे. याशिवाय रेल्वे अपघातात जखमी होण्याच्या, कायमचे जायबंदी होण्याच्याही घटना शहरात घडल्या आहेत.कानाला हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणाºया तरुणांना रेल्वेच्या धडकेने जीव गमावावा लागल्याच्या घटना पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा महिन्यांपूर्वी घडल्या आहेत. धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणाºयांना पिंपरी आणि कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या हद्दीत प्राणास मुकावे लागले आहे. रेल्वे प्रवासात हुल्लडबाजीकरणाºया दरवाजात थांबून अथवा दरवाजात पाय बाहेर सोडून बसणारे तरुण खांबाचा धक्का लागून पडले आहेत. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनांची रेल्वे पोलिसांकडे नोंद आहे. देहूरोड, पिंपरी, आकुर्डी, कासारवाडी, दापोडी या रेल्वे स्थानकांवर हमखास अपघात घडून येत आहेत.प्रवासावेळी दक्षता बाळगावीपुणे ते लोणावळा दरम्यानचा प्रवास करताना ३१ वर्षांची महिला गर्दीमुळे पाय घसरून पडली. त्याच वेळी प्रसंगावधान दाखवून पी़ टी़ कर्दाळे आणि अनिल बागुल या रेल्वे पोलिसांनी तिला वाचविले. मोठ्या दुर्घटनेतून ही महिला बचावली. प्रवास करताना नागरिक सुरक्षिततेची दक्षता घेत नाहीत. त्यामुळे दुर्घटना घडतात, असे त्यांचे मत आहे.रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडताना कोयना एक्सप्रेसच्या धडकेत दोन मुलांसह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. १२ नोव्हेंबर २०१७ ला पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडलेली घटना अद्यापही नागरिकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. लोणावळा-पुणे लोकलमधून पिंपरी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर मुलांना घेऊन रुळ ओलांडत असताना मुंबईकडे जाणाºया कोयना एक्सप्रेसची धडक महिलेसह मुलांना बसली. तिघांचा जागीच मृत्यू झाला. २५ वर्षे वयाची महिला, सात वर्षांचा मुलगा, १० वर्षांची मुलगी आहे. असे तीनजण रेल्वे अपघातात दगावले. या घटनेनंतर नागरिक दक्षतेचा धडा घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र मातेसह दोन मुले दगावण्याची हृदयद्रावक घटना घडल्यानंतरही जोखीम पत्करून धोकादायकरीत्या रूळ ओलांडणाºयांची संख्या घटलेली नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेले पादचारी पूल ओस पडल्याचे दिसून येतात. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी येथे पुलाचा वापर करण्याऐवजी उडी मारून शॉर्टकट मार्गाने रुळ ओलांडताना प्रवासी दिसून येतात. रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे रुळ ओलांडू नये,पादचारी मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना दिल्या जात असताना, त्याकडे दुर्लक्ष करून प्रवासी धोकादायकरीत्या रुळ ओलांडताना दिसतात.