शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
4
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
5
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
6
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
7
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
8
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
9
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
10
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
11
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
12
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
13
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
14
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
15
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
16
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
17
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
18
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
19
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
20
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

पवनेतील गाळ काढण्यास अखेर सुरुवात

By admin | Updated: May 10, 2016 00:39 IST

दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि वाढते तापमान, त्याचबरोबर गेल्या वर्षी तुलनेने कमी झालेला पाऊस यामुळे पवना धरणातील पाण्याचा साठा प्रथमच कमी झाला आहे.

पवनानगर : दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि वाढते तापमान, त्याचबरोबर गेल्या वर्षी तुलनेने कमी झालेला पाऊस यामुळे पवना धरणातील पाण्याचा साठा प्रथमच कमी झाला आहे. भविष्यात तो आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीला या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. अनेक वर्षांपासून धरणातील गाळ काढला नसल्याने सध्या धरणातील पाणीसाठ्याची क्षमता कमी होत चालली आहे. हा गाळ काढण्यास सोमवारी सुरुवात झाली. गेल्या ४५ वर्षांत पवना धरणातील पाणीसाठा प्रथमच घटला असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ठळकपणे दिले होते. त्याची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांची दखल घेत जिल्हाधिकारी, तसेच पाटबंधारे, पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांनी धरणात जाऊन पाहणी केली. पवना धरण परिसरात गाळ काढण्यास सोमवारी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तसेच महसूल विभागाचे अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.गाळ काढण्यासाठी बारणे यांनी त्यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये निधी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे. गाळ काढण्याची मोठी जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची आहे. या संदर्भात आयुक्त दिनेश वाघमारे यांना माहिती देण्यात आली आहे. यासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी केली.पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारा पवना धरण हा एकमेव स्रोत आहे. गेल्या ५० वर्षांत पवना धरणातील गाळ काढला नाही. साचलेला गाळ काढण्याची जबाबदारी संपूर्णपणे राज्य शासन व महापालिकेची आहे. सध्या पावसाळा सुरू होण्यास काही अवधी असल्याकारणाने आतापासून सुरुवात केल्यास पाण्याचा साठा काही प्रमाणात पुढील वर्षासाठी वाढेल. परंतु धरण भागातील पाण्याचा साठा कमी झाल्यानंतर प्रत्येक वर्षी गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू ठेवल्यास पवना धरणातील पाण्याचा साठा कायमस्वरूपी वाढेल व जास्तीत जास्त पाणी उपलब्ध होईल. गाळ काढण्याच्या या प्रक्रियेमध्ये सामाजिक संस्था, स्थानिकबांधकाम व्यावसायिक, उद्योजक यांनी सहभागी होऊन स्थानिक शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी यंत्रसामग्री पुरविल्यास कमी वेळेत मोठ्या क्षमतेने पवना धरण पात्रातील गाळ काढला जाऊ शकतो.(वार्ताहर)