शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बँक, एटीएमसमोर रांगा कायम

By admin | Updated: December 31, 2016 05:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस उलटून गेले, तरी बँकांसमोरील रांगा कायम असून, शहरातील एटीएम रोकड अभावी अद्याप बंद असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

पिंपरी : नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस उलटून गेले, तरी बँकांसमोरील रांगा कायम असून, शहरातील एटीएम रोकड अभावी अद्याप बंद असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. उद्योग-व्यवसायावर मंदीचे सावट पसरल्याने बाजारात पुरेसे खेळते चलन नाही. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्यावर आपोआप बंधने आली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून कॅशलेस व्यवहारावर भर दिल्याचे दिसत आहे. नोटाबंदीच्या निर्णयावेळी ५० दिवसांमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा दावा पंतप्रधानांनी केला होता. अद्यापही नवीन चलनी नोटांचा तुटवडा असल्याने परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शहरातील बहुतांश एटीएम बंदच असल्याने नागरिकांनी बँक ांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेकडून पुरविण्यात येणाऱ्या नोटांची संख्या अपुरी असल्याने ग्राहकांना अपेक्षित रक्कम देण्यावर मर्यादा येत असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या सर्व गोंधळामध्ये चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. दैनंदिन खर्चासाठी पैसे काढायचे असतील, तर सकाळी आठपासूनच रांगेत उभे राहावे लागत आहे. जेणेकरून कामाला दांडी होणार नाही. मात्र, बँका सुरू होण्याची वेळ साडेनऊची असते. प्रत्यक्षात मात्र व्यवहार सुरू होण्यासाठी अकरा वाजतात. त्यामुळे नोकरदार वर्गाला त्या दिवशी सुटीच घ्यावी लागत आहे. त्यामुळे बँक प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. गृहिणींंना स्वयंपाकघरातील बजेट सावरताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)सायबर क्राइमचे वाढले भय कॅशलेस व्यवहारनोटाबंदीनंतर कॅशलेस ही संकल्पना जोर धरू लागली आहे. शासनाकडूनही डेबिट, क्रेडिट कार्ड, पेटीएम, माय वॉलेट, बिल बचाओ अशा इंटरनेटवर आधारित प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरुण वर्गाकडून या प्रणालीचा वापरही केला जात आहे. मात्र, निरक्षर, अल्पशिक्षित, ज्येष्ठ नागरिकांना असे कॅशलेस व्यवहार करण्यावर बंधने येत आहेत. अनेकांकडे तर डेबिट अथवा क्रेडिट कार्डच नाहीत. अशांना रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच भारतामधील सायबर सिक्युरिटी यंत्रणा कितपत सक्षम आहे, याविषयी उलटसुलट चर्चा असल्याने आॅनलाइन व्यवहार करण्यासाठी अनेक जण धजत नाहीत. तसेच अनेक मजूर व वर्गाकडे अशा डिजीटल सुविधाच नाहीत. त्यामुळे मजुरांनी हा त्रास कधीपर्यंत सहन करायचा, असा प्रश्न विचारला जात आहे. निगडी : गेल्या महिन्याभरात दिवसभर बँकांसमोर पैसे भरण्यासाठी आणि नवीन नोटांसाठी गर्दी कायम राहिली होती. मात्र, या नोटाबंदीच्या निर्णयाला पन्नास दिवस पूर्ण झाले असून, निगडी परिसरातील बहुतांश बँकांमधील व्यवहार सुरळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रहाटणी : ५० दिवस पूर्ण झाले. मात्र, परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आली नाही. बँकांवरील ताण काही प्रमाणात कमी झाला असला, तरी नागरिकांच्या समोर असलेल्या समस्या सुटता सुटत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.सांगवी : बँकांच्या समोर अद्यापही रांगा कायम आहेत. बहुतांश एटीएममध्ये पैसाच नसल्याने शहरातील एखाद्या एटीएममध्ये पैसे आले की, मोठ्या रांगा दिसत आहेत. शासनाच्या कॅशलेस प्रणालीसाठी नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.