शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बँक, एटीएमसमोर रांगा कायम

By admin | Updated: December 31, 2016 05:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस उलटून गेले, तरी बँकांसमोरील रांगा कायम असून, शहरातील एटीएम रोकड अभावी अद्याप बंद असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

पिंपरी : नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस उलटून गेले, तरी बँकांसमोरील रांगा कायम असून, शहरातील एटीएम रोकड अभावी अद्याप बंद असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. उद्योग-व्यवसायावर मंदीचे सावट पसरल्याने बाजारात पुरेसे खेळते चलन नाही. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्यावर आपोआप बंधने आली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून कॅशलेस व्यवहारावर भर दिल्याचे दिसत आहे. नोटाबंदीच्या निर्णयावेळी ५० दिवसांमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा दावा पंतप्रधानांनी केला होता. अद्यापही नवीन चलनी नोटांचा तुटवडा असल्याने परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शहरातील बहुतांश एटीएम बंदच असल्याने नागरिकांनी बँक ांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेकडून पुरविण्यात येणाऱ्या नोटांची संख्या अपुरी असल्याने ग्राहकांना अपेक्षित रक्कम देण्यावर मर्यादा येत असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या सर्व गोंधळामध्ये चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. दैनंदिन खर्चासाठी पैसे काढायचे असतील, तर सकाळी आठपासूनच रांगेत उभे राहावे लागत आहे. जेणेकरून कामाला दांडी होणार नाही. मात्र, बँका सुरू होण्याची वेळ साडेनऊची असते. प्रत्यक्षात मात्र व्यवहार सुरू होण्यासाठी अकरा वाजतात. त्यामुळे नोकरदार वर्गाला त्या दिवशी सुटीच घ्यावी लागत आहे. त्यामुळे बँक प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. गृहिणींंना स्वयंपाकघरातील बजेट सावरताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)सायबर क्राइमचे वाढले भय कॅशलेस व्यवहारनोटाबंदीनंतर कॅशलेस ही संकल्पना जोर धरू लागली आहे. शासनाकडूनही डेबिट, क्रेडिट कार्ड, पेटीएम, माय वॉलेट, बिल बचाओ अशा इंटरनेटवर आधारित प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरुण वर्गाकडून या प्रणालीचा वापरही केला जात आहे. मात्र, निरक्षर, अल्पशिक्षित, ज्येष्ठ नागरिकांना असे कॅशलेस व्यवहार करण्यावर बंधने येत आहेत. अनेकांकडे तर डेबिट अथवा क्रेडिट कार्डच नाहीत. अशांना रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच भारतामधील सायबर सिक्युरिटी यंत्रणा कितपत सक्षम आहे, याविषयी उलटसुलट चर्चा असल्याने आॅनलाइन व्यवहार करण्यासाठी अनेक जण धजत नाहीत. तसेच अनेक मजूर व वर्गाकडे अशा डिजीटल सुविधाच नाहीत. त्यामुळे मजुरांनी हा त्रास कधीपर्यंत सहन करायचा, असा प्रश्न विचारला जात आहे. निगडी : गेल्या महिन्याभरात दिवसभर बँकांसमोर पैसे भरण्यासाठी आणि नवीन नोटांसाठी गर्दी कायम राहिली होती. मात्र, या नोटाबंदीच्या निर्णयाला पन्नास दिवस पूर्ण झाले असून, निगडी परिसरातील बहुतांश बँकांमधील व्यवहार सुरळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रहाटणी : ५० दिवस पूर्ण झाले. मात्र, परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आली नाही. बँकांवरील ताण काही प्रमाणात कमी झाला असला, तरी नागरिकांच्या समोर असलेल्या समस्या सुटता सुटत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.सांगवी : बँकांच्या समोर अद्यापही रांगा कायम आहेत. बहुतांश एटीएममध्ये पैसाच नसल्याने शहरातील एखाद्या एटीएममध्ये पैसे आले की, मोठ्या रांगा दिसत आहेत. शासनाच्या कॅशलेस प्रणालीसाठी नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.