शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

‘फिल्डिंग’ लावूनही बिघडली बदल्यांची गणिते

By admin | Updated: May 6, 2016 05:50 IST

अमुक ठिकाणीच बदली व्हावी, जाण्या-येण्यासाठी सोपे पडावे, कामाचा ताण कमी असावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत

पिंपरी : अमुक ठिकाणीच बदली व्हावी, जाण्या-येण्यासाठी सोपे पडावे, कामाचा ताण कमी असावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत बदलीसाठी ‘फिल्डिंग’ लावली होती. मात्र, आयुक्तांची अचानक बदली झाल्याने बदलीसाठी तयारीत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांंचे गणित बिघडले आहे. एप्रिल आणि मे हे महिने म्हणजे बदल्यांचा हंगाम समजला जातो. या महिन्यात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. मनाप्रमाणे बदली व्हावी, अशी अनेकांची इच्छा असते, तर काहींना बदलीच नको असते. महापालिकेतील अनेक पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक विविध विभागांत नोकरीस आहेत. पदाधिकाऱ्यांचे नाव पुढे करून कामाला देखील ‘ठेंगा’ दाखवीत असल्याची उदाहरणे आहेत. तसेच बदल्यांच्या वेळीही अशा कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बदल्या होतात. सध्यांच्या बदल्यांच्या हंगामात इच्छित ठिकाणी बदली करवून घेण्यासाठी विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत ‘फिल्डिंग’ लावली होती. त्यातच आता महापालिका निवडणुका जवळ आल्याने पदाधिकाऱ्यांनीदेखील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष घातले होते. एखादा अधिकारी, कर्मचाऱ्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो, यासाठीही पदाधिकाऱ्यांकडून बदल्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी ‘सेटिंग’ही लावले होते. मात्र, आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाल्याने अनेकांची गणितेच बिघडली आहेत. आयुक्तांच्या बदलीमुळे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांकडे हेलपाटेअनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणारयांची संख्याही अधिक आहे. यामुळे कामकाजावर देखील काही प्रमाणात परिणाम होतो. मात्र, संबंधित कर्मचारी एखाद्या पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या बदलीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहिल्यानंतर काही तरी फायदा असल्याने त्या ठिकाणाहून बदली नको असते. बदली टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारण्याचे प्रकारही घडतात. कर्मचाऱ्यांची मानसिकता नाहीशासनाच्या इतर संस्थांमध्ये काम करीत असताना एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात, तर कधी इतर जिल्ह्यांतही बदली केली जाते. त्यासाठीची तयारीही कर्मचारी ठेवतात. तर महापालिकेत काम करीत असताना बदली करायची असल्यास महापालिका हद्दीअंतर्गतच केली जाते. केवळ एखादा विभाग बदलू शकतो. फार फार तर येण्या-जाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर अंतर वाढू शकते. तरीही बदलीसाठी कर्मचाऱ्यांची मानसिकता नसते. बदली रद्दसाठी हालचाली केल्या जातात.