शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘फिल्डिंग’ लावूनही बिघडली बदल्यांची गणिते

By admin | Updated: May 6, 2016 05:50 IST

अमुक ठिकाणीच बदली व्हावी, जाण्या-येण्यासाठी सोपे पडावे, कामाचा ताण कमी असावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत

पिंपरी : अमुक ठिकाणीच बदली व्हावी, जाण्या-येण्यासाठी सोपे पडावे, कामाचा ताण कमी असावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत बदलीसाठी ‘फिल्डिंग’ लावली होती. मात्र, आयुक्तांची अचानक बदली झाल्याने बदलीसाठी तयारीत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांंचे गणित बिघडले आहे. एप्रिल आणि मे हे महिने म्हणजे बदल्यांचा हंगाम समजला जातो. या महिन्यात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. मनाप्रमाणे बदली व्हावी, अशी अनेकांची इच्छा असते, तर काहींना बदलीच नको असते. महापालिकेतील अनेक पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक विविध विभागांत नोकरीस आहेत. पदाधिकाऱ्यांचे नाव पुढे करून कामाला देखील ‘ठेंगा’ दाखवीत असल्याची उदाहरणे आहेत. तसेच बदल्यांच्या वेळीही अशा कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बदल्या होतात. सध्यांच्या बदल्यांच्या हंगामात इच्छित ठिकाणी बदली करवून घेण्यासाठी विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांमार्फत ‘फिल्डिंग’ लावली होती. त्यातच आता महापालिका निवडणुका जवळ आल्याने पदाधिकाऱ्यांनीदेखील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष घातले होते. एखादा अधिकारी, कर्मचाऱ्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो, यासाठीही पदाधिकाऱ्यांकडून बदल्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी ‘सेटिंग’ही लावले होते. मात्र, आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाल्याने अनेकांची गणितेच बिघडली आहेत. आयुक्तांच्या बदलीमुळे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांकडे हेलपाटेअनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणारयांची संख्याही अधिक आहे. यामुळे कामकाजावर देखील काही प्रमाणात परिणाम होतो. मात्र, संबंधित कर्मचारी एखाद्या पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या बदलीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहिल्यानंतर काही तरी फायदा असल्याने त्या ठिकाणाहून बदली नको असते. बदली टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारण्याचे प्रकारही घडतात. कर्मचाऱ्यांची मानसिकता नाहीशासनाच्या इतर संस्थांमध्ये काम करीत असताना एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात, तर कधी इतर जिल्ह्यांतही बदली केली जाते. त्यासाठीची तयारीही कर्मचारी ठेवतात. तर महापालिकेत काम करीत असताना बदली करायची असल्यास महापालिका हद्दीअंतर्गतच केली जाते. केवळ एखादा विभाग बदलू शकतो. फार फार तर येण्या-जाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर अंतर वाढू शकते. तरीही बदलीसाठी कर्मचाऱ्यांची मानसिकता नसते. बदली रद्दसाठी हालचाली केल्या जातात.