शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्राधिकरण विकासाला खोडा; भाजपानेही गिरवला राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा कित्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 05:17 IST

- विश्वास मोरेपिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणावर लोकनियुक्त समिती नसल्याने १५ वर्षांत विकासाला खोडा बसला आहे. काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस आघाडी सरकारने गिरविलेला कित्ता भारतीय जनता पक्षानेही गिरविला आहे. भाजपा सरकारची सत्ता संपुष्टात यायला वर्ष शिल्लक राहिले असताना अद्यापही समिती झालेली नाही. परिणामी राजकीय अनास्थेने प्राधिकरण विकासाला खोडा बसला ...

- विश्वास मोरेपिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणावर लोकनियुक्त समिती नसल्याने १५ वर्षांत विकासाला खोडा बसला आहे. काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस आघाडी सरकारने गिरविलेला कित्ता भारतीय जनता पक्षानेही गिरविला आहे. भाजपा सरकारची सत्ता संपुष्टात यायला वर्ष शिल्लक राहिले असताना अद्यापही समिती झालेली नाही. परिणामी राजकीय अनास्थेने प्राधिकरण विकासाला खोडा बसला आहे.औद्योगिकनगरीतील नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना १४ मार्च १९७२ रोजी करण्यात आली. एकूण १० गावे, ४२ रहिवासी पेठा व चार व्यापारी पेठांचे नियोजन करण्यात आले. एकूण ४३२३ हेक्टर क्षेत्रापैकी १७२३ हेक्टर क्षेत्र नियोजन आणि नियंत्रणाखाली आहे. एकूण संपादनाखाली असलेले क्षेत्र २५८४ हेक्टर आहे. त्यापैकी ताब्यात आलेले क्षेत्र १७७१ हेक्टर आहे. त्यापैकी विकसित क्षेत्र १३२५ हेक्टर आहे. आजपर्यंत ३४ गृह योजना राबविण्यात आल्या असून, २३१ व्यापारी वाणिज्य प्रयोजनाचे गाळे आहेत.प्राधिकरणाने ६९७९ निवासी आणि व्यापारी गाळ्याची विक्री केली आहे. तर संपादनाखाली ५६ हेक्टर क्षेत्र येणे अपेक्षित आहे. आत्तापर्यंत ११ हजार २२१ सदनिकांची निर्मिती केली. स्थापनेपासून आत्तापर्यंतचा कालखंड पाहिल्यास उद्योनगरीतील नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्णकरण्यात प्राधिकरण कमी पडले आहे. हे वास्तव आहे. बिल्डरधार्जिण्या धोरणांमुळे मूळ उद्देशापासून प्राधिकरण दूर गेले आहे. आजवरच्या एकूण कालखंडापैकी या समितीवर सर्वाधिक कालखंड प्रशासकीय राजवट राहिली आहे. त्यामुळे आजवर दृष्टे अधिकारी न मिळाल्याने विकासाला खोडा बसला आहे.१५ वर्षांपासून प्रशासकीय राजगेल्या पंधरा वर्षांत म्हणजे प्राधिकरणावर २००४ पासून विभागीय आयुक्त दिलीप बंड, डॉ. नितीन करीर, प्रभाकर देशमुख, विकास देशमुख, एस. चोक्कलिंगम् आणि विद्यमान चंद्रकांत दळवी यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी होती. दळवी यांच्याकडील जबाबदारीकाढून घेऊन पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविली होती. मात्र, त्यांनी पदभार न स्वीकारल्याने दळवीच अध्यक्षपदाचे काम पाहत आहेत. अध्यक्ष पूर्णवेळ नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनाच प्राधिकरणाचा गाडा हाकावा लागत आहे.लोकनियुक्त समितीच नाहीराष्टÑवादी आणि काँग्रेसची सत्ता असतानाही चौदा वर्ष या संस्थेवर लोकप्रतिनिधी निवडलेले नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे काँग्रेसने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात कधीही लक्ष घातले नाही. परिणामी राष्टÑवादीच्या एकाही कार्यकर्त्यांना संधी दिली नाही. सत्तांतर झाल्यानंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी प्राधिकरणाची लोकनियुक्त समिती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने अध्यक्षपदी प्रशासकीय अधिकारीच अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. आघाडीचा कित्ता भाजपाने गिरविला आहे.- प्राधिकरणाचे एकूण ४३२३ हेक्टर क्षेत्रापैकी १७२३ हेक्टर क्षेत्र नियोजन आणि नियंत्रणाखाली.- संपादनाखाली असलेले क्षेत्र २५८४ हेक्टर, ताब्यात आलेले क्षेत्र १७७१ हेक्टर.- विकसित क्षेत्र १३२५ हेक्टर असून आजपर्यंत ३४ गृह योजना, २३१ व्यापारी वाणिज्य प्रयोजनाचे गाळे.- गेल्या ४६ वर्षांत ६९७९ निवासी आणि व्यापारी गाळ्याची विक्री, ११ हजार २२१ सदननिकांची निर्मिती.- संपादनाखाली ५६ हेक्टर क्षेत्र येणे अपेक्षित आहे. पंधरा वर्षांत एकही गृहप्रकल्प नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड