शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
3
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
4
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
5
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
6
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
7
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
8
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
9
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
10
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
11
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
12
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
13
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
14
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
15
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
16
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
17
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
18
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
19
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
20
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?

एटीएमचा व्यवहार २३ रुपयांचा भुर्दंड

By admin | Updated: March 7, 2017 00:57 IST

स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) खातेदार असणाऱ्या व्यक्तींना आता पाचव्या व्यवहारापासून एटीएमसाठी सेवाकरासह जवळपास २३ रुपये मोजावे लागतील

पुणे : स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) खातेदार असणाऱ्या व्यक्तींना आता पाचव्या व्यवहारापासून एटीएमसाठी सेवाकरासह जवळपास २३ रुपये मोजावे लागतील. इतकेच काय तर पुरेसे पैसे शिल्लक नसतील आणि एटीएमचा वापर केला तरीही असे शुल्क तुमच्या खात्यातून वसूल करण्यात येणार आहे. याशिवाय धनादेश, एनईएफटी, आरटीजीएस, बचत खात्यात देखील पैसे भरण्यासाठी शुल्क आकारण्यात येणार असून, खात्यात किमान १ ते ५ हजार रुपये सरासरी रक्कमही आता अनिवार्य करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व कॅशलेस व्यवहार धोरण म्हणून स्वीकारले आहे. यापुढे सर्व व्यवहारांची नोंद होण्यासाठी बँक महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. या व्यवहारासाठी आता भरभक्कम शुल्क मोजण्याची तयारी ग्राहकांना ठेवावी लागणार आहे. आता बँकेतून आपलेच पैसे काढण्यासाठी अथवा आॅनलाइन व्यवहारांसाठी आपला ‘ई खिसा’ रिता करावा लागणार आहे. खातेदारांना आपल्या खात्यात किमान रक्कम ठेवावी लागणार आहे. मुंबईसारख्या महानगरात महिना सरासरी ५ हजार रक्कम ठेवावी लागणार आहे. अन्यथा, जितकी रक्कम कमी होईल त्या प्रमाणात ५० ते शंभर रुपये शुल्क आकारण्यात येईल. शहरी भागात ३ हजारांची रक्कम ठेवणे बंधनकारक असून, अन्यथा ४० ते ८० रुपयांचा दंड होईल. निम्नशहरी भागात २, तर ग्रामीण भागात १ हजार रुपये ठेवावे लागतील. निम्नशहरी भागात २५ ते ७५ आणि ग्रामीण भागात २० ते ५० रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) केल्यास १० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत २ ते १२ रुपयांचे शुल्क असून, सेवा शुल्क अतिरिक्त आकारण्यात येईल. बचत खात्यात महिन्याला केवळ तीनदाच विनाशुल्क पैसे भरता येतील. त्यापेक्षा अधिक वेळा पैसे भरल्यास प्रत्येक व्यवहारासाठी ५० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. डेबिट कार्डवरून त्रयस्थ खात्यात व्यवहार केल्यास त्यासाठी २२ रुपये मोजावे लागतील. प्रत्येकाला दरमहा चार एटीएम व्यवहार विनामूल्य असतील. त्यापुढील व्यवहारावर २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. बँक व्यवहारांच्या या प्रत्येक शुल्कावर साडेचौदा टक्के सेवा शुल्क आकारला जात असल्याने, त्या प्रमाणात शुल्काची रक्कमदेखील वाढणार आहे. याबाबत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आरबीआयच्या गव्हर्नरला पत्र लिहिले आहे. बँक खात्यात आता प्रत्येक खातेदारालाच किमान रक्कम ठेवणे अनिवार्य आहे. त्याखाली रक्कम गेल्यास दंडात्मक शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय एटीएमच्या पाचव्या व्यवहारापासूनही भरमसाठ शुल्क आकारले जाणार आहे. आपलेच पैसे काढण्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याऐवजी छळवणूकच सुरू झाली आहे. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंचशहरी भागात ३ हजारांची रक्कम ठेवणे बंधनकारक असून, अन्यथा ४० ते ८० रुपयांचा दंड होईल. निम्नशहरी भागात २, तर ग्रामीण भागात १ हजार रुपये ठेवावे लागतील. >प्रत्येकाला दरमहा चार एटीएम व्यवहार विनामूल्य असतील. त्यापुढील व्यवहारावर २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) केल्यास १० हजार ते एक लाख रुपयापर्यंत २ ते १२ रुपयांचे शुल्क डेबिट कार्डवरून त्रयस्थ खात्यात व्यवहार केल्यास २२ रुपये शुल्क