शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

महाविद्यालयांत ‘अ‍ॅण्टिरॅगिंग’ प्रतिज्ञापत्र बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:40 IST

पालकांना ‘अ‍ॅण्टिरॅगिंंग अ‍ॅफेडेव्हिट’ (रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र) सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना दिलासा मिळणार आहे.

पिंपरी : विविध प्रवेश परीक्षा झाल्या, त्यानंतर महाविद्यालय प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. प्रवेश होईपर्यंत कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी धावाधाव केल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला जात असताना, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच पालकांना ‘अ‍ॅण्टिरॅगिंंग अ‍ॅफेडेव्हिट’ (रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र) सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना दिलासा मिळणार आहे.महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी रॅगिंंग करीत असल्याने अनेकदा आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. रॅगिंंगमुळे विद्यार्थी एकाकी पडल्याचे दिसून आले आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांचाही रॅगिंंगच्या माध्यमातून छळ केल्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत. असे अनुचित प्रकार शैक्षणिक संस्थांमध्ये घडू नयेत, यासाठी देशातील सर्व विद्यापीठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र भरून घेण्यासंबंधीचे आदेश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे पाऊल महाविद्यालयांनी उचलले आहे.या प्रतिज्ञापत्रात विद्यार्थ्याला त्याची माहिती, त्याचे पालक अथवा पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी लागते. त्यात दिलेल्या नियमावलीनुसार चांगल्या वर्तणुकीची हमी दिली जाते. तसेच रॅगिंंगच्या कसल्याही कृत्यात सहभागी होणार नाही, असे लिहून द्यावे लागते. अशा प्रकारच्या कृत्यात सहभागी झाल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जावी.महाविद्यालय व्यवस्थापनाकडून प्रवेश रद्द केला जाऊ शकतो,याची जाणीव असल्याचे, तसेच दिलेली माहिती खरी असून नियमावली मान्य आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करणे बंधनकारक आहे.ना हरकत, संमतीपत्रआमच्या पाल्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास महाविद्यालय व्यवस्थापनाकडून केल्या जाणाºया कारवाईबद्दल आमची काही हरकत नसेल, असे पालकांचे संमतीपत्रही घेतले जात आहे. काही महाविद्यालयांमध्ये अ‍ॅण्टिरॅगिंंग समितीसुद्धा स्थापन झाल्या आहेत. या समितीकडे विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीची तक्रार आल्यास नियमानुसार पुढील कारवाईची प्रक्रिया केली जाते.अ‍ॅण्टिरॅगिंग कमिटीचा अभावशहरातील बहुतांशी महाविद्यालयांमध्ये अ‍ॅण्टिरॅगिंग समिती स्थापन झाल्या आहेत. काही महाविद्यालयांतील समित्या केवळ कागदावरच आहेत. अनेक महाविद्यालये तर अशी काही समिती असते, याबद्दलच अनभिज्ञ आहेत. अ‍ॅण्टिरॅगिंग प्रतिज्ञापत्रांमुळे त्यांना आता याचे महत्त्व लक्षात आले असून, समिती स्थापन्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.