शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ऐन पावसाळ्यात खोदाईला मुहूर्त

By admin | Updated: June 30, 2017 03:43 IST

ताथवडेतील मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची चिरफाड करून कासवगतीने सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : ताथवडेतील मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची चिरफाड करून कासवगतीने सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या कामामुळे ताथवडेकरांची त्रेधातिरपीट सुरू आहे. त्यांची नित्याची वाट महापालिकेने अतिशय बिकट बनवून या रस्त्यावर अक्षरश: राडा घातला आहे. संथगतीने सुरू असलेले काम वाटसरूंच्या जीवावर बेतत आहे. या रस्त्यावर जेएननर्मच्या माध्यमातून महापलिका पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या सहाशे व्यासाची मोठी पाईपलाईन बसवीत आहे़ मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून हे काम अतिशय संथगतीने सुरू असून नुकताच झालेल्या पावसामुळे या कामाचा फज्जा झाल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे़ सुमारे दीड कि़मी़चा हा रस्ता पार करण्यासाठी रहिवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भर रस्त्यात खोदलेले मोठाले खड्डे, सर्वत्र चिखल-गाळ, राडारोड्याने रस्ता माखून दाणादाण उडाली आहे़ त्यातच तो चिखल मातीने निसरडा होऊन धोकादायक बनला आहे. सातत्याने होणारी वाहतूककोंडी, अपघाते आणि वाहने चिखलात रुतण्याचे प्रकार यामुळे ग्रामस्थ, रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिकटावस्था झालेल्या या रस्त्यावर गेल्या आठवड्याभरात सुमारे ५० दुचाकी घसरून अनेक जण गंभीर जखमी झाले. मागील काही दिवसात तर २० हून अधिक अवजड वाहने चिखलात रुतले आहेत. या अवजड वाहने मधेच चिखलात रुतल्याने वाहतुककोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी सर्वांचीच मोठी पंचाईत होते मग स्वत:च्याच घरी अथवा इच्छितस्थळी जाण्यासाठी मोठा पाच कि़मी़चा वळसा मारण्याची नामुष्की येथील रहिवाशांवर ओढावत असल्याने सर्वांचाच तिळपापड होत आहे. अखेर मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी कामगारांना याबाबत जाब विचारीत काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतल्याने दोन दिवसांपासून काम बंद आहे. मात्र, या रस्त्यावरून जाण्याचे म्हणजेच अग्निदिव्यातून जाण्याचा धोका कायम आहे.