शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ऐन पावसाळ्यात खोदाईला मुहूर्त

By admin | Updated: June 30, 2017 03:43 IST

ताथवडेतील मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची चिरफाड करून कासवगतीने सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : ताथवडेतील मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची चिरफाड करून कासवगतीने सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या कामामुळे ताथवडेकरांची त्रेधातिरपीट सुरू आहे. त्यांची नित्याची वाट महापालिकेने अतिशय बिकट बनवून या रस्त्यावर अक्षरश: राडा घातला आहे. संथगतीने सुरू असलेले काम वाटसरूंच्या जीवावर बेतत आहे. या रस्त्यावर जेएननर्मच्या माध्यमातून महापलिका पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या सहाशे व्यासाची मोठी पाईपलाईन बसवीत आहे़ मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून हे काम अतिशय संथगतीने सुरू असून नुकताच झालेल्या पावसामुळे या कामाचा फज्जा झाल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे़ सुमारे दीड कि़मी़चा हा रस्ता पार करण्यासाठी रहिवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भर रस्त्यात खोदलेले मोठाले खड्डे, सर्वत्र चिखल-गाळ, राडारोड्याने रस्ता माखून दाणादाण उडाली आहे़ त्यातच तो चिखल मातीने निसरडा होऊन धोकादायक बनला आहे. सातत्याने होणारी वाहतूककोंडी, अपघाते आणि वाहने चिखलात रुतण्याचे प्रकार यामुळे ग्रामस्थ, रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिकटावस्था झालेल्या या रस्त्यावर गेल्या आठवड्याभरात सुमारे ५० दुचाकी घसरून अनेक जण गंभीर जखमी झाले. मागील काही दिवसात तर २० हून अधिक अवजड वाहने चिखलात रुतले आहेत. या अवजड वाहने मधेच चिखलात रुतल्याने वाहतुककोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी सर्वांचीच मोठी पंचाईत होते मग स्वत:च्याच घरी अथवा इच्छितस्थळी जाण्यासाठी मोठा पाच कि़मी़चा वळसा मारण्याची नामुष्की येथील रहिवाशांवर ओढावत असल्याने सर्वांचाच तिळपापड होत आहे. अखेर मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी कामगारांना याबाबत जाब विचारीत काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतल्याने दोन दिवसांपासून काम बंद आहे. मात्र, या रस्त्यावरून जाण्याचे म्हणजेच अग्निदिव्यातून जाण्याचा धोका कायम आहे.