शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अल्पवयीन दुचाकीस्वारांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:18 IST

कामशेत शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, त्यातही अल्पवयीन दुचाकीचालकांचे प्रमाण अधिक आहे.

कामशेत : कामशेत शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, त्यातही अल्पवयीन दुचाकीचालकांचे प्रमाण अधिक आहे. या अल्पवयीन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची सातत्याने पायमल्ली होत असूनही पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अनेक ज्येष्ठ नागरिक करीत आहेत.शाळा, खासगी शिकवणी व इतरत्र जाण्यासाठी अनेक धनदांडग्यांच्या मुलांसह सर्वसामान्य नागरिकांची मुले पालकांच्या मर्जीने दुचाकीचा सर्रास वापर करतात. पण वाहतुकीच्या नियमांचे त्यांच्यातील अनेकांकडून उल्लंघन केले जाते.स्पोर्टबाईक व इतर मॉडीफाय वाहनांची तरुणांसह अल्पवयीन मुलांमध्ये क्रेझ असून, आपल्या वाहनावर विविध प्रकारचे स्टंट करणे, भर चौकातून वाहने अतिवेगात चालवण्यात या अल्पवयीन व तरुण चालकांना मोठी मजा येते. त्याचा इतरांना त्रास होतो याचा विचार त ेकरीतच नाहीत.विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट बसणे, जोरजोरात व कर्कश हॉर्न वाजवणे, शाळा परिसर व गर्दीच्या ठिकाणी वेगात वाहन चालवणे, रस्त्यावरील वाहन व पादचाºयांना कट मारणे आदी प्रकार या अल्पवयीन व हुल्लडबाज मुलांकडून होत असतात.याकडे त्यांच्या पालकांबरोबरच पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्याने शहर व परिसरात किरकोळअपघात घडत आहेत. यातूनच एखादा मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.अल्पवयीन मुलांचे वाहन चालवणे अनेक पालकांना भूषणाचे वाटत असून, काही पालक तर आपल्या मुलांकडे दुचाकी वाहन देऊन त्याच्या मागे ऐटीत बसत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक अल्पवयीन मुले आपल्या पालकांना रेल्वे स्टेशन व इतरत्र सोडवताना दिसत आहेत.कामशेतच्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून जोरात गाडी चालवून पायी चालणाºया नागरिक, महिला व मुलींच्या अंगावर पाणी उडवणे सर्रास होत आहे. काही हुल्लडबाज तरुण वाहनाच्या सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून फटाक्याच्या स्फोटाचे आवाज काढतात. तरगाडीच्या हेडलाइटमध्ये झगमगाटाचे दिवे रात्रीच्या वेळी लावून इतरवाहन चालकांना त्रासदायक ठरत असून समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका आहे. पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.अशा बेफाम चालकांवर जरब बसविण्यासाठी नियमितपणेकसून तपासणी आणि दोषींवरकठोर कारवाई करावी. कोणालाही पाठीशी घालू नये अशी मागणीहोत आहे.