शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

अल्पवयीन दुचाकीस्वारांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:18 IST

कामशेत शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, त्यातही अल्पवयीन दुचाकीचालकांचे प्रमाण अधिक आहे.

कामशेत : कामशेत शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, त्यातही अल्पवयीन दुचाकीचालकांचे प्रमाण अधिक आहे. या अल्पवयीन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची सातत्याने पायमल्ली होत असूनही पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अनेक ज्येष्ठ नागरिक करीत आहेत.शाळा, खासगी शिकवणी व इतरत्र जाण्यासाठी अनेक धनदांडग्यांच्या मुलांसह सर्वसामान्य नागरिकांची मुले पालकांच्या मर्जीने दुचाकीचा सर्रास वापर करतात. पण वाहतुकीच्या नियमांचे त्यांच्यातील अनेकांकडून उल्लंघन केले जाते.स्पोर्टबाईक व इतर मॉडीफाय वाहनांची तरुणांसह अल्पवयीन मुलांमध्ये क्रेझ असून, आपल्या वाहनावर विविध प्रकारचे स्टंट करणे, भर चौकातून वाहने अतिवेगात चालवण्यात या अल्पवयीन व तरुण चालकांना मोठी मजा येते. त्याचा इतरांना त्रास होतो याचा विचार त ेकरीतच नाहीत.विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट बसणे, जोरजोरात व कर्कश हॉर्न वाजवणे, शाळा परिसर व गर्दीच्या ठिकाणी वेगात वाहन चालवणे, रस्त्यावरील वाहन व पादचाºयांना कट मारणे आदी प्रकार या अल्पवयीन व हुल्लडबाज मुलांकडून होत असतात.याकडे त्यांच्या पालकांबरोबरच पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्याने शहर व परिसरात किरकोळअपघात घडत आहेत. यातूनच एखादा मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.अल्पवयीन मुलांचे वाहन चालवणे अनेक पालकांना भूषणाचे वाटत असून, काही पालक तर आपल्या मुलांकडे दुचाकी वाहन देऊन त्याच्या मागे ऐटीत बसत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक अल्पवयीन मुले आपल्या पालकांना रेल्वे स्टेशन व इतरत्र सोडवताना दिसत आहेत.कामशेतच्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून जोरात गाडी चालवून पायी चालणाºया नागरिक, महिला व मुलींच्या अंगावर पाणी उडवणे सर्रास होत आहे. काही हुल्लडबाज तरुण वाहनाच्या सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून फटाक्याच्या स्फोटाचे आवाज काढतात. तरगाडीच्या हेडलाइटमध्ये झगमगाटाचे दिवे रात्रीच्या वेळी लावून इतरवाहन चालकांना त्रासदायक ठरत असून समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका आहे. पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.अशा बेफाम चालकांवर जरब बसविण्यासाठी नियमितपणेकसून तपासणी आणि दोषींवरकठोर कारवाई करावी. कोणालाही पाठीशी घालू नये अशी मागणीहोत आहे.