शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

पंच्चाहत्तर दिवसांनंतर सर्वपक्षीय समिती ढिम्म, प्रश्न अद्याप ‘जैसे-थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 04:10 IST

रिंगरोड बाधितांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्यात आली़ त्या समितीला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत़ तरीही समितीने प्रश्न सोडविण्यासाठी कोणात्याही प्रकारची हालचाल केली नाही़ त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

रावेत : रिंगरोड बाधितांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्यात आली़ त्या समितीला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत़ तरीही समितीने प्रश्न सोडविण्यासाठी कोणात्याही प्रकारची हालचाल केली नाही़ त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.‘रिंगरोड आंदोलन’ तीव्र होत चालले आहे. कालबाह्य रिंगरोडमुळे हजारो कुटुंबीय बेघर होणार आहेत, अशा गुरुद्वारा रोड, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळे गुरव, कासारवाडी येथील बाधित राहिवाशांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. गेल्या १४० दिवसांपासून सदरचे आंदोलन विविध उपक्रमांनी सुरूच आहे. हा चिघळलेला प्रश्न सोडविण्याकरिता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये दिनांक १९ आॅगस्टला सर्वपक्षीय ‘अवलोकन समितीची’ स्थापना करण्यात आली. ही समिती मुख्यमंत्र्यांना भेटून रिंगरोड बाधितांचा प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्न करणार आहे. परंतु ७५ दिवस लोटूनही कोणतेही काम सदरच्या समितीने केलेले नाही.रेखा भोळे म्हणाल्या,‘‘गेल्या ७५ दिवसांत अवलोकन समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्काळ भेट घेणे आवश्यक होते. सत्य परिस्थिती त्यांना सांगितल्यास ते योग्य तोडगा काढतील.’’समन्वयक योगेश विरोळे म्हणाले, ‘‘थेरगाव या मध्यवर्ती उपनगरांचा विकास हा पहिल्यापासूनच प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे वंचित आहे. येथील राहवासी ‘एचसीएमटीआर’ रोड प्रकल्पाची टांगती तलवार गेल्या ३५ वर्षांपासून डोक्यावर घेऊन जगत आहे. या सर्व राहिवाशांची नोंद होणे आवश्यक आहे़ ह्यांना प्रॉपर्टी कार्ड प्रशासनाने देणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू करावी.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड