शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पंच्चाहत्तर दिवसांनंतर सर्वपक्षीय समिती ढिम्म, प्रश्न अद्याप ‘जैसे-थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 04:10 IST

रिंगरोड बाधितांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्यात आली़ त्या समितीला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत़ तरीही समितीने प्रश्न सोडविण्यासाठी कोणात्याही प्रकारची हालचाल केली नाही़ त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

रावेत : रिंगरोड बाधितांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्यात आली़ त्या समितीला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत़ तरीही समितीने प्रश्न सोडविण्यासाठी कोणात्याही प्रकारची हालचाल केली नाही़ त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.‘रिंगरोड आंदोलन’ तीव्र होत चालले आहे. कालबाह्य रिंगरोडमुळे हजारो कुटुंबीय बेघर होणार आहेत, अशा गुरुद्वारा रोड, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळे गुरव, कासारवाडी येथील बाधित राहिवाशांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. गेल्या १४० दिवसांपासून सदरचे आंदोलन विविध उपक्रमांनी सुरूच आहे. हा चिघळलेला प्रश्न सोडविण्याकरिता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये दिनांक १९ आॅगस्टला सर्वपक्षीय ‘अवलोकन समितीची’ स्थापना करण्यात आली. ही समिती मुख्यमंत्र्यांना भेटून रिंगरोड बाधितांचा प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्न करणार आहे. परंतु ७५ दिवस लोटूनही कोणतेही काम सदरच्या समितीने केलेले नाही.रेखा भोळे म्हणाल्या,‘‘गेल्या ७५ दिवसांत अवलोकन समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्काळ भेट घेणे आवश्यक होते. सत्य परिस्थिती त्यांना सांगितल्यास ते योग्य तोडगा काढतील.’’समन्वयक योगेश विरोळे म्हणाले, ‘‘थेरगाव या मध्यवर्ती उपनगरांचा विकास हा पहिल्यापासूनच प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे वंचित आहे. येथील राहवासी ‘एचसीएमटीआर’ रोड प्रकल्पाची टांगती तलवार गेल्या ३५ वर्षांपासून डोक्यावर घेऊन जगत आहे. या सर्व राहिवाशांची नोंद होणे आवश्यक आहे़ ह्यांना प्रॉपर्टी कार्ड प्रशासनाने देणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू करावी.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड