शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

मूलभूत सुविधांपासून वंचित राजमाची, स्वातंत्र मिळून ७० वर्षांनंतरही प्रश्न ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 03:13 IST

पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा व खंडाळा या शहरापासून अवघ्या २० किमी अंतरावर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या राजमाची हे गाव देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असताना आजही पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. शासनाची उदासीनता व स्थानिक नेत्यांचा पाठपुराव्याचा अभाव ह्या गोष्टी गावाच्या दुर्लक्षितपणामुळे अधोरेखित होत आहे.

लोणावळा : पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा व खंडाळा या शहरापासून अवघ्या २० किमी अंतरावर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या राजमाची हे गाव देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असताना आजही पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. शासनाची उदासीनता व स्थानिक नेत्यांचा पाठपुराव्याचा अभाव ह्या गोष्टी गावाच्या दुर्लक्षितपणामुळे अधोरेखित होत आहे.स्वराज्याचे टेहाळणी किल्ले अशी ओळख असलेल्या राजमाची येथील श्रीवर्धन व मनोरंजन या दोन किल्ल्यांच्या पायथ्याला राजमाची हे दोनशे ते सव्वादोनशे नागरीवस्ती असलेले गाव आहे. गावात २३ घरे आहेत़ तर शेजारी असलेल्या वळवंडे गावात सात ते आठ घरे व फणसराई येथे पंधरा ते वीस आदिवासी लोकांच्या झोपड्या आहेत. राजमाची किल्ला हा ट्रेकर व पर्यटक यांचे आकर्षण असल्याने वर्षभर याठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. तोच येथील नागरिकांचा रोजगाराचा मार्ग असल्याने आलेल्या पर्यटकांची घरगुती पद्धतीने राहण्याची व जेवणाची सोय करत दोन पैसे हे ग्रामस्थ कमवितात. रस्त्याअभावी होणारी गैरसोय टाळण्याकरिता मावळचे आमदार संजय भेगडे यांच्या निधीमधून या गावाला जाणाºया कच्च्या दगडी व माताड रस्त्यावर चार मोठे पूल व तीन साकव पूल बांधण्यात आले आहेत.गाव अंधारातच : अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही]मागील काळात पंचायत समितीच्या माध्यमातून गावाला सौरदिवे देण्यात आले होते. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत बेसाल्ट पद्धतीचा दगड असल्याने या भागात विहिरीला अथवा बोरिंगला देखील पाणी लागत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावाच्या खालील बाजूला असलेल्या एका तळ्यातून अथवा किल्ल्यावर असलेल्या खळग्यांमधून नागरिकांना पिण्याचे पाणी आणावे लागते. गावामध्ये सात सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. मात्र ग्रामपंचायतीला गावातील नागरिकांचा मिळणारा कर वगळता कसलेही उत्पन्न नसल्याने गावात कोणतीही विकासाची कामे झालेली नाहीत. गावात आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के कर वसुली केली जाते. तंटामुक्त गाव, पर्यावरणपूरक गाव असे अनेक पुरस्कार या गावाने मिळविले आहेत. या परिसरात वन विभाग रस्ता करण्यास मान्यता देत नसल्याने येथे अद्याप पक्के रस्ते झालेले नाहीत. शहरापासून २० किमी अंतरावर हे गाव असूनही येथे अद्याप वीज पोहोचलेली नाही. आजही गावात तेलाचे किंवा रॉकेलचे दिवे लावले जातात.रस्ता बनविण्यात आडकाठी नसावीवन विभागाच्या आडमुठेपणामुळे राजमाची गावाचा रस्ता व पर्यायाने विकास रखडलेला आहे. राजमाची गावाला रस्ता झाल्यास त्याच्या मागोमाग या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र या ठिकाणी रस्ता झाल्यास स्थानिकांच्या पर्यटन व्यवसायावर गदा येईल, अशी येथील काही नागरिकांची धारणा असल्याने गावातील काही मंडळींचा देखील रस्ता होण्यास विरोध आहे.या दुहेरी पेचाचा त्रास मात्र निष्पाप ग्रामस्थांना भोगावा लागतो आहे. गावात कोणी आजारी पडले अथवा काही घटना घडल्यास मोठी समस्या निर्माण होते. पावसाळ्यात तर या गावात गाडी जाऊ शकत नसल्याने नागरिकांना चार महिन्यांचा किराणा घरात भरावा लागतो. कोणी आजारी पडल्यास झोळी करुन त्याला लोणावळ्यात घेऊन यावे लागते़ गावाच्या या समस्याचा विचार करता राजमाची गावाचा रस्ता होण्यास किमान कोणी आडकाठी करू नये अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड