शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मूलभूत सुविधांपासून वंचित राजमाची, स्वातंत्र मिळून ७० वर्षांनंतरही प्रश्न ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 03:13 IST

पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा व खंडाळा या शहरापासून अवघ्या २० किमी अंतरावर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या राजमाची हे गाव देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असताना आजही पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. शासनाची उदासीनता व स्थानिक नेत्यांचा पाठपुराव्याचा अभाव ह्या गोष्टी गावाच्या दुर्लक्षितपणामुळे अधोरेखित होत आहे.

लोणावळा : पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा व खंडाळा या शहरापासून अवघ्या २० किमी अंतरावर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या राजमाची हे गाव देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असताना आजही पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. शासनाची उदासीनता व स्थानिक नेत्यांचा पाठपुराव्याचा अभाव ह्या गोष्टी गावाच्या दुर्लक्षितपणामुळे अधोरेखित होत आहे.स्वराज्याचे टेहाळणी किल्ले अशी ओळख असलेल्या राजमाची येथील श्रीवर्धन व मनोरंजन या दोन किल्ल्यांच्या पायथ्याला राजमाची हे दोनशे ते सव्वादोनशे नागरीवस्ती असलेले गाव आहे. गावात २३ घरे आहेत़ तर शेजारी असलेल्या वळवंडे गावात सात ते आठ घरे व फणसराई येथे पंधरा ते वीस आदिवासी लोकांच्या झोपड्या आहेत. राजमाची किल्ला हा ट्रेकर व पर्यटक यांचे आकर्षण असल्याने वर्षभर याठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. तोच येथील नागरिकांचा रोजगाराचा मार्ग असल्याने आलेल्या पर्यटकांची घरगुती पद्धतीने राहण्याची व जेवणाची सोय करत दोन पैसे हे ग्रामस्थ कमवितात. रस्त्याअभावी होणारी गैरसोय टाळण्याकरिता मावळचे आमदार संजय भेगडे यांच्या निधीमधून या गावाला जाणाºया कच्च्या दगडी व माताड रस्त्यावर चार मोठे पूल व तीन साकव पूल बांधण्यात आले आहेत.गाव अंधारातच : अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही]मागील काळात पंचायत समितीच्या माध्यमातून गावाला सौरदिवे देण्यात आले होते. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत बेसाल्ट पद्धतीचा दगड असल्याने या भागात विहिरीला अथवा बोरिंगला देखील पाणी लागत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावाच्या खालील बाजूला असलेल्या एका तळ्यातून अथवा किल्ल्यावर असलेल्या खळग्यांमधून नागरिकांना पिण्याचे पाणी आणावे लागते. गावामध्ये सात सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. मात्र ग्रामपंचायतीला गावातील नागरिकांचा मिळणारा कर वगळता कसलेही उत्पन्न नसल्याने गावात कोणतीही विकासाची कामे झालेली नाहीत. गावात आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के कर वसुली केली जाते. तंटामुक्त गाव, पर्यावरणपूरक गाव असे अनेक पुरस्कार या गावाने मिळविले आहेत. या परिसरात वन विभाग रस्ता करण्यास मान्यता देत नसल्याने येथे अद्याप पक्के रस्ते झालेले नाहीत. शहरापासून २० किमी अंतरावर हे गाव असूनही येथे अद्याप वीज पोहोचलेली नाही. आजही गावात तेलाचे किंवा रॉकेलचे दिवे लावले जातात.रस्ता बनविण्यात आडकाठी नसावीवन विभागाच्या आडमुठेपणामुळे राजमाची गावाचा रस्ता व पर्यायाने विकास रखडलेला आहे. राजमाची गावाला रस्ता झाल्यास त्याच्या मागोमाग या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र या ठिकाणी रस्ता झाल्यास स्थानिकांच्या पर्यटन व्यवसायावर गदा येईल, अशी येथील काही नागरिकांची धारणा असल्याने गावातील काही मंडळींचा देखील रस्ता होण्यास विरोध आहे.या दुहेरी पेचाचा त्रास मात्र निष्पाप ग्रामस्थांना भोगावा लागतो आहे. गावात कोणी आजारी पडले अथवा काही घटना घडल्यास मोठी समस्या निर्माण होते. पावसाळ्यात तर या गावात गाडी जाऊ शकत नसल्याने नागरिकांना चार महिन्यांचा किराणा घरात भरावा लागतो. कोणी आजारी पडल्यास झोळी करुन त्याला लोणावळ्यात घेऊन यावे लागते़ गावाच्या या समस्याचा विचार करता राजमाची गावाचा रस्ता होण्यास किमान कोणी आडकाठी करू नये अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड