शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

सल्लागारांबद्दल आगपाखड

By admin | Updated: May 6, 2015 06:04 IST

शहरातील विकासकामांसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येते. मात्र, कामे कासवाच्या गतीने होत आहेत. सल्लागारांना एकूण विकासकामांच्या ३.३५ टक्के दराने कामे दिली जातात.

पिंपरी : शहरातील विकासकामांसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येते. मात्र, कामे कासवाच्या गतीने होत आहेत. सल्लागारांना एकूण विकासकामांच्या ३.३५ टक्के दराने कामे दिली जातात. सर्व कामांची जबाबदारी सोपवूनही सल्लागारांकडून कामे होत नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे. अध्यक्षस्थानी अतुल शितोळे होते. तसेच, संभाजीनगर मॉडेल वॉर्ड, रेल्वे ओव्हर ब्रीज, घरकुल, बीआरटी रस्ते, तारांगण, हॉस्पिटल उभारणी आदी मोठ्या कामांसाठी सल्लागारांची नेमणूक केलेली आहे. निविदापश्चात व निविदापूर्वीची कामे सल्लागार पार पाडतात. कामांच्या देखभाल दुरुस्तीच्या सर्व कामांच्या जबाबदारीचा विसर सल्लागारांना पडलेला आहे, असे स्थायीच्या सदस्यांनी आयुक्तांना परखडपणे सुनावले. अर्थसंकल्पातील विकासकामे कधी होणार, या प्रतीक्षेत सदस्य आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कामे व्हावीत, अशा सूचना सदस्यांनी केल्या. फायली वेळेवर येऊनही आयुक्त सह्या करीत नाहीत. याबाबत स्थायी सदस्यांनी संताप व्यक्त केला.महापालिकेच्या शाळांमध्ये तसेच महापालिकेच्या मिळकतीच्या ठिकाणी ७०० सुरक्षारक्षक पुरविण्याची निविदा चार महिन्यांपूर्वीच मंजूर झाली होती. मात्र, आयुक्तांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रस्ताव मंजूर असूनही कामे सुरू होत नाहीत. यामुळे स्थायी सदस्यांनी आयुक्तांवर आगपाखड केली. यावर आयुक्त म्हणाले, ‘‘कामाचे स्वरूप मोठे असल्याने याबाबत ठेकेदारांच्या कामाच्या वाटाघाटी सुरू आहेत.’’सर्व ठेकेदारांना कामे देण्यात येणार आहेत, असे कानी पडताच स्थायी सदस्य चपापले. स्थायी सभेत अजूनच गोंधळ उडाला. सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी याबाबत खुलासा दिला, हे कामकाज १० कोटी रुपयांचे आहे. या कामकाजात आयुक्तांनी लक्ष घालणे चुकीचे आहे, अशी चर्चा स्थायी सदस्यांनी केली. या वेळी स्थायी सदस्य विनायक गायकवाड, प्रसाद शेट्टी, धनंजय आल्हाट, सविता साळुंके, कै लास थोपटे, अनिता तापकीर उपस्थित होते.(प्रतिनिधी)४ठेकेदारांना बोलावून कामांची वाटाघाटी केल्याचे आयुक्तांनी बोलण्याच्या ओघात सांगितले. आयुक्तांनी वाटाघाटीची कबुली दिल्यामुळे स्थायी सदस्यांनी आयुक्तांना फै लावर घेतले. आयुक्त ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार पालिका चालवणार का? ठेकेदारांचा आयुक्तांशी थेट संबंध कसा येतो? असे प्रश्नही स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित केले आहेत.