शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

प्रशासन-शाळांच्या वादात रखडले प्रवेश

By admin | Updated: April 2, 2016 03:35 IST

आरटीई २५ टक्के परतावा व काही शाळांचा आरटीई प्रवेशास नकार असल्याने शिक्षण मंडळ प्रशासनाने शाळांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे काही शाळांची मान्यता रद्द होण्याची

पिंपरी : आरटीई २५ टक्के परतावा व काही शाळांचा आरटीई प्रवेशास नकार असल्याने शिक्षण मंडळ प्रशासनाने शाळांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे काही शाळांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. आरटीई प्रवेशासाठी युडायसच्या रिपोर्टप्रमाणे एकूण १५० शाळा पात्र आहेत. अद्यापपर्यंत १५० शाळांपैकी १२ शाळांनी आरटीई २५ टक्के आरक्षणासाठी वेबसाइटवर नोंद केलेली नाही. त्यामुळे पालकांची मात्र प्रवेशासाठी धावपळ उडाली आहे. पालकवर्ग मात्र आरटीई प्रवेशासाठी प्रशासनाकडे चौकशी करीत आहेत. शहरातील १० ते २० हजार पालक आरटीई प्रवेशाकडे डोळे लावून बसले आहेत. इकडे मात्र प्रशासन, विविध संघटना, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये वाद सुरू आहेत. प्रवेशासाठी एप्रिल उजाडला, तरीही शाळा नोंदणीच पूर्ण नाही. आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी १६ ते २२ मार्चपर्यंत ठेवण्यात आली होती. त्यानंतर एक आठवडा पुन्हा २४ एप्रिल पर्यंत शाळा नोंदणीची मुदत वाढविण्यात आली. त्यानंतर त्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू केले जाणार होते. मात्र, अद्यापपर्यंत शाळा नोंदणीच पूर्ण झालेली नसल्याने आरटीई २५ टक्के प्रवेशास सुरुवात झाली नाही. (प्रतिनिधी)२०१३-१४ या वर्षातील आरटीईचा परतावा चार महिन्यांपूर्वी मिळाला आहे. मात्र, या वर्षामधील ३४ टक्के परतावा बाकी आहे. तसेच २०१४-१५ या वर्षातील ४० टक्के रक्कम मिळाली आहे. उर्वरित परतावा शिल्लक आहे. याबद्दल शासनाने अद्यापपर्यंत काहीच ठोस माहिती न दिल्याने आरटीई शाळा प्रवेश केलेला नाही. वेबसाइटही वारंवार बंद असते.- राजेंद्र दायमा, उपाध्यक्ष, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन दोन ते तीन दिवसांत शाळा नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर त्वरित आरटीई प्रवेश सुरू होतील. याबाबत आयुक्तांसोबत बैठक झाली आहे. शाळांचा शिल्लक आरटीई परतावा शाळांसोबत बैठक घेऊन तो विषय सोडविण्यात आला आहे. - बी. सी. कारेकर, प्रशासन अधिकारी