शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

मतदारयादीला आधार कार्डचा नंबर जोडावा

By admin | Updated: March 27, 2017 02:51 IST

भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या घटनेनुसार मतदानाचा अधिकार

पिंपरी : भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या घटनेनुसार मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आज बहुतांशी व्यवहार हे आधार कार्ड या ओळखपत्राला प्रमाण मानून केले जात आहेत. म्हणूनच मतदारयादी व आधार कार्ड नंबर यांना एकत्रित करून देशातील निवडणुकीची प्रक्रिया राबवली जावी, अशी मागणी आज लोकसभेच्या शून्य काळाच्या तासामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.लोकसभेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, की देशातील लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानीय स्वराज्य संस्था या प्रत्येक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी केवळ ५० ते ६० टक्के मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत असतात. देशात मतदान न करणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. तर असेही काही मतदार आहेत जे व्यवसाय अथवा नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांत व जिल्ह्यांत जातात. त्यामुळे  त्यांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारयादीत समाविष्ट झाली  आहेत. (प्रतिनिधी)प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असताना प्रत्येकाचे नाव हे केवळ एकदाच मतदारयादीत असावे व त्या मतदाराने एकाच ठिकाणी मतदान केले पाहिजे. त्यामुळे बोगस मतदानावर अंकुश ठेवता येईल. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे नाव हे मतदारयादीत असलेच पाहिजे व प्रत्येक मतदाराचे नाव हे त्याच्या आधार नंबरने जोडले गेले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मतदाराचे नाव हे एकाच मतदारयादीत दिसेल व बोगस मतदानावर पूर्णत: नियंत्रण मिळवता येईल. ही यंत्रणा केंद्र सरकारने लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी बारणे यांनी केली.