शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

मतदारयादीला आधार कार्डचा नंबर जोडावा

By admin | Updated: March 27, 2017 02:51 IST

भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या घटनेनुसार मतदानाचा अधिकार

पिंपरी : भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या घटनेनुसार मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आज बहुतांशी व्यवहार हे आधार कार्ड या ओळखपत्राला प्रमाण मानून केले जात आहेत. म्हणूनच मतदारयादी व आधार कार्ड नंबर यांना एकत्रित करून देशातील निवडणुकीची प्रक्रिया राबवली जावी, अशी मागणी आज लोकसभेच्या शून्य काळाच्या तासामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.लोकसभेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, की देशातील लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानीय स्वराज्य संस्था या प्रत्येक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी केवळ ५० ते ६० टक्के मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत असतात. देशात मतदान न करणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. तर असेही काही मतदार आहेत जे व्यवसाय अथवा नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांत व जिल्ह्यांत जातात. त्यामुळे  त्यांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारयादीत समाविष्ट झाली  आहेत. (प्रतिनिधी)प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असताना प्रत्येकाचे नाव हे केवळ एकदाच मतदारयादीत असावे व त्या मतदाराने एकाच ठिकाणी मतदान केले पाहिजे. त्यामुळे बोगस मतदानावर अंकुश ठेवता येईल. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे नाव हे मतदारयादीत असलेच पाहिजे व प्रत्येक मतदाराचे नाव हे त्याच्या आधार नंबरने जोडले गेले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मतदाराचे नाव हे एकाच मतदारयादीत दिसेल व बोगस मतदानावर पूर्णत: नियंत्रण मिळवता येईल. ही यंत्रणा केंद्र सरकारने लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी बारणे यांनी केली.