शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

मतदारयादीला आधार कार्डचा नंबर जोडावा

By admin | Updated: March 27, 2017 02:51 IST

भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या घटनेनुसार मतदानाचा अधिकार

पिंपरी : भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या घटनेनुसार मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आज बहुतांशी व्यवहार हे आधार कार्ड या ओळखपत्राला प्रमाण मानून केले जात आहेत. म्हणूनच मतदारयादी व आधार कार्ड नंबर यांना एकत्रित करून देशातील निवडणुकीची प्रक्रिया राबवली जावी, अशी मागणी आज लोकसभेच्या शून्य काळाच्या तासामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.लोकसभेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, की देशातील लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानीय स्वराज्य संस्था या प्रत्येक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी केवळ ५० ते ६० टक्के मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत असतात. देशात मतदान न करणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. तर असेही काही मतदार आहेत जे व्यवसाय अथवा नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांत व जिल्ह्यांत जातात. त्यामुळे  त्यांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारयादीत समाविष्ट झाली  आहेत. (प्रतिनिधी)प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असताना प्रत्येकाचे नाव हे केवळ एकदाच मतदारयादीत असावे व त्या मतदाराने एकाच ठिकाणी मतदान केले पाहिजे. त्यामुळे बोगस मतदानावर अंकुश ठेवता येईल. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे नाव हे मतदारयादीत असलेच पाहिजे व प्रत्येक मतदाराचे नाव हे त्याच्या आधार नंबरने जोडले गेले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मतदाराचे नाव हे एकाच मतदारयादीत दिसेल व बोगस मतदानावर पूर्णत: नियंत्रण मिळवता येईल. ही यंत्रणा केंद्र सरकारने लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी बारणे यांनी केली.