शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीला आधार कार्डचा नंबर जोडावा

By admin | Updated: March 27, 2017 02:51 IST

भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या घटनेनुसार मतदानाचा अधिकार

पिंपरी : भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या घटनेनुसार मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आज बहुतांशी व्यवहार हे आधार कार्ड या ओळखपत्राला प्रमाण मानून केले जात आहेत. म्हणूनच मतदारयादी व आधार कार्ड नंबर यांना एकत्रित करून देशातील निवडणुकीची प्रक्रिया राबवली जावी, अशी मागणी आज लोकसभेच्या शून्य काळाच्या तासामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.लोकसभेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, की देशातील लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानीय स्वराज्य संस्था या प्रत्येक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी केवळ ५० ते ६० टक्के मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत असतात. देशात मतदान न करणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. तर असेही काही मतदार आहेत जे व्यवसाय अथवा नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांत व जिल्ह्यांत जातात. त्यामुळे  त्यांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारयादीत समाविष्ट झाली  आहेत. (प्रतिनिधी)प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असताना प्रत्येकाचे नाव हे केवळ एकदाच मतदारयादीत असावे व त्या मतदाराने एकाच ठिकाणी मतदान केले पाहिजे. त्यामुळे बोगस मतदानावर अंकुश ठेवता येईल. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे नाव हे मतदारयादीत असलेच पाहिजे व प्रत्येक मतदाराचे नाव हे त्याच्या आधार नंबरने जोडले गेले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मतदाराचे नाव हे एकाच मतदारयादीत दिसेल व बोगस मतदानावर पूर्णत: नियंत्रण मिळवता येईल. ही यंत्रणा केंद्र सरकारने लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी बारणे यांनी केली.