शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अपहरण झालेल्या मुली अद्याप बेपत्ताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:19 IST

अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होत असून, अपहरण झालेल्या अनेक अल्पवयीन मुली अद्यापही बेपत्ताच आहेत.

पिंपरी : अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होत असून, अपहरण झालेल्या अनेक अल्पवयीन मुली अद्यापही बेपत्ताच आहेत. पळून जाऊन विवाहबद्ध होणाऱ्या मुलींमध्ये अशा अपहरण प्रकरणातील मुलींचे प्रमाण अधिक आहे.शहरातून बेपत्ता होणा-या मुलींमध्ये १५ ते १६ वर्षांच्या मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलगी घरातून निघून गेल्यानंतर पालक पोलीस ठाण्यात धाव घेतात. अपहरण झाल्याची फिर्याद दाखल करतात. अनेकदा मुलीचे अपहरण करणा-या संशयित आरोपींविषयी पालक पोलिसांकडे तक्रार करतात. या संशयित आरोपींकडे कसून चौकशी केल्यानंतर मुलगी कोठे पळवून नेली याचा तपास लागू शकतो. मात्र १६ ते १७ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत.दरम्यान, १८ वर्षे पूर्ण होताच, विवाहबद्ध होण्याच्या तयारीने अशा मुलींचे कोणीतरी अपहरण केले असावे, असा अंदाज व्यक्त करून पोलीस या प्रकरणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपहरण झालेल्या मुलींचा शोध लागण्याचे प्रमाण नगण्य आहे.>पोलिसांकडे कमी नोंदवयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणी घरातून बेपत्ता होतात, त्यांच्याबाबत पालक पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यासही धजावत नाहीत. अशा घटनांची पोलिसांकडे कमी प्रमाणात नोंद होताना दिसून येते. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. अपहरण होणा-या मुलींमध्ये शाळकरी आणि नुकतेच महाविद्यालयात पदार्पण केलेल्या मुलींचे प्रमाण अधिक आहे.>अपहरणाच्या घटनांत वाढमोशीतून अपहरण करून तरुणीचा जबरदस्तीने मुंबई येथे विवाह लावण्यात आल्याची घटना १३ एप्रिल २०१८ ला घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चार जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पिंपरीतील संजय गांधीनगर येथून १६ वर्षीय मुलीचे मागील महिन्यात अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत.