शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

आळंदीच्या विकास आराखड्यास ४ महिन्यांत मंजुरी

By admin | Updated: March 2, 2015 04:07 IST

आळंदी नगरपरिषदेने सादर केलेल्या शहर विकास आराखड्यास राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यातील ईपीबाबतची सुनावणी नगररचना विभाग संचालकांकडे

पुणे : आळंदी नगरपरिषदेने सादर केलेल्या शहर विकास आराखड्यास राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यातील ईपीबाबतची सुनावणी नगररचना विभाग संचालकांकडे सुरू असून, ती पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर एका महिन्यात त्याची छाननी करून मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.आळंदी येथे रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने बांधण्यात आलेल्या वारकरी संप्रदाय प्रशिक्षण केंद्र, भक्तनिवास व सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, गोविंदगिरी महाराज, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, सुरेश गोरे, शरद सोनवणे, लक्ष्मण जगताप, मंदा म्हात्रे, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, फाउंडेशनचे अध्यक्ष रसिकलाल धारिवाल, उपाध्यक्षा शोभा धारिवाल, जान्हवी धारिवाल, मुंबई मराठी ज्ञातीच्या फळ व्यापार धर्मदाय ट्रस्टचे अध्यक्ष भगवान थोरात आदी व्यासपीठावर उपस्थित होते. रसिकलाल धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.मुख्यमंत्री म्हणाले, की आळंदी नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर एका आठवड्यात निर्णय घेऊ. आळंदीच्या पाण्याच्या प्रश्न लक्षात घेऊन त्यासाठी काय प्रयत्न करता येईल यावर विचार सुरू आहे. आगामी अधिवेशनात त्यावर बैठक बोलवून भामा आसखेड धरणातून किंवा पुण्यातून आळंदीला पाणी कसे देता येईल, याचा प्रश्न मार्गी लावू आणि त्यासाठी निधीही देऊ. त्याचबरोबर आळंदीला यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या ६५ लाख रुपये अनुदानात वाढ करून तो २ कोटी करण्याचा निर्णयही लवकरच घेऊ.इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत ते म्हणाले, राज्यातील नद्यांचे ९० टक्के प्रदूषण हे महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडून नदीत सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे होत आहे. जोपर्यंत नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जात नाहीत तोपर्यंत नद्या प्रदूषणमुक्त करणे अशक्य आहे. हे करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल. वारकरी संप्रदायाने समाजाला ऊर्जित अवस्थेत ठेवण्याचे काम केले आहे. त्या परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन वैभवात भर टाकण्याचे काम या वास्तूने केले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.रसिकलाल धारिवाल म्हणाले, समाजात काम करत असताना त्याचे आपण काहीतरी देणे लागतो, या विचारानेच आम्ही कामे करीत आहोत. आळंदीत इंग्लिश मीडियम स्कूल आणि पंढरपूरमध्ये भक्तनिवास उभारण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. शोभा धारिीाल यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि विविध क्षेत्रांत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्री इतक्या दूरवरून प्रथमच आळंदीत आले, पण माऊलींचे दर्शन न घेता गेल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजी होती. याबाबत त्यांची इच्छा असतानाही पावसामुळे थांबता आले नसल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)