शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
2
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
3
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
4
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
6
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
7
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
8
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
9
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
10
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
11
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
12
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
13
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
14
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
15
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
16
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
17
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
18
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
19
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
20
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी

आळंदीच्या विकास आराखड्यास ४ महिन्यांत मंजुरी

By admin | Updated: March 2, 2015 04:07 IST

आळंदी नगरपरिषदेने सादर केलेल्या शहर विकास आराखड्यास राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यातील ईपीबाबतची सुनावणी नगररचना विभाग संचालकांकडे

पुणे : आळंदी नगरपरिषदेने सादर केलेल्या शहर विकास आराखड्यास राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यातील ईपीबाबतची सुनावणी नगररचना विभाग संचालकांकडे सुरू असून, ती पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर एका महिन्यात त्याची छाननी करून मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.आळंदी येथे रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने बांधण्यात आलेल्या वारकरी संप्रदाय प्रशिक्षण केंद्र, भक्तनिवास व सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, गोविंदगिरी महाराज, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, सुरेश गोरे, शरद सोनवणे, लक्ष्मण जगताप, मंदा म्हात्रे, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, फाउंडेशनचे अध्यक्ष रसिकलाल धारिवाल, उपाध्यक्षा शोभा धारिवाल, जान्हवी धारिवाल, मुंबई मराठी ज्ञातीच्या फळ व्यापार धर्मदाय ट्रस्टचे अध्यक्ष भगवान थोरात आदी व्यासपीठावर उपस्थित होते. रसिकलाल धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.मुख्यमंत्री म्हणाले, की आळंदी नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर एका आठवड्यात निर्णय घेऊ. आळंदीच्या पाण्याच्या प्रश्न लक्षात घेऊन त्यासाठी काय प्रयत्न करता येईल यावर विचार सुरू आहे. आगामी अधिवेशनात त्यावर बैठक बोलवून भामा आसखेड धरणातून किंवा पुण्यातून आळंदीला पाणी कसे देता येईल, याचा प्रश्न मार्गी लावू आणि त्यासाठी निधीही देऊ. त्याचबरोबर आळंदीला यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या ६५ लाख रुपये अनुदानात वाढ करून तो २ कोटी करण्याचा निर्णयही लवकरच घेऊ.इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत ते म्हणाले, राज्यातील नद्यांचे ९० टक्के प्रदूषण हे महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडून नदीत सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे होत आहे. जोपर्यंत नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जात नाहीत तोपर्यंत नद्या प्रदूषणमुक्त करणे अशक्य आहे. हे करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल. वारकरी संप्रदायाने समाजाला ऊर्जित अवस्थेत ठेवण्याचे काम केले आहे. त्या परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन वैभवात भर टाकण्याचे काम या वास्तूने केले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.रसिकलाल धारिवाल म्हणाले, समाजात काम करत असताना त्याचे आपण काहीतरी देणे लागतो, या विचारानेच आम्ही कामे करीत आहोत. आळंदीत इंग्लिश मीडियम स्कूल आणि पंढरपूरमध्ये भक्तनिवास उभारण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. शोभा धारिीाल यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि विविध क्षेत्रांत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्री इतक्या दूरवरून प्रथमच आळंदीत आले, पण माऊलींचे दर्शन न घेता गेल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजी होती. याबाबत त्यांची इच्छा असतानाही पावसामुळे थांबता आले नसल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)