शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

राजकारण २४ तास पाण्याचे , यमुनानगर प्राधिकरण, प्रकल्प बंद केल्याने पाणीटंचाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 03:04 IST

महापालिकेने निगडी, यमुनानगरमध्ये उंचवट्यावर घरासाठी २४ तास पाणीपुरवठा रद्द केला होता. या परिसरातील उंचवट्यावर घरे असणा-या परिसरात एक तासही पाणी जात नव्हते.

पिंपरी : महापालिकेने निगडी, यमुनानगरमध्ये उंचवट्यावर घरासाठी २४ तास पाणीपुरवठा रद्द केला होता. या परिसरातील उंचवट्यावर घरे असणा-या परिसरात एक तासही पाणी जात नव्हते. त्यामुळे पालिकेतर्फे यमुनानगरमध्ये २४ तास पाण्याचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, तो सध्या बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून २४ तास पाण्याचा प्रकल्प त्वरित सुरू करावा, अशी मागणी होत आहे. ऐनदिवाळीत आणि पावसाळ्यात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. यमुनानगर परिसराचा २४ तास पाण्याचा प्रकल्प सुरू केला होता. भारतीय जनता पक्षाने हा प्रकल्प बंद केला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. याबाबत शिवसेनेने २४ तास पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासन दाद देत नाही.शिवसेनेच्या शहर संघटक सुलभा उबाळे म्हणाल्या, की त्यामुळे यमुनानगरमधील नागरिकांना पाणी मिळू लागले होते. आता तो प्रकल्प बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.यमुनानगर या परिसरात मध्यमवर्गीय नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश नोकरदार वर्ग आहे. पाणी येण्याच्या वेळेत नागरिक घरी नसतात. त्यामुळे पाणी भरणे त्यांना कठीण होत आहे. संपूर्ण शहरात २४ तास पाण्याचा प्रकल्प राबविण्याचे नियोजन पालिका करीत आहे. असे असताना यमुनानगरमधील प्रकल्प बंद करणे योग्य नाही. यमुनानगरमधील २४ तास पाण्याचा प्रकल्प त्वरित सुरू करण्यात यावा.’’महापालिकेतील सत्तांतराचा परिणाममहापालिकेत सत्तांतर झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे प्राधिकरणातील चोविस तास पाणीपुरवठा योजना गुंडळाली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाने विनाटाकीचे गृहप्रकल्प यमुनानगर येथे बांधले आहेत. तसेच यमुनानगरमध्ये अनेक घरे उंचावर आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. घरामध्ये पाणी वरती चढत नव्हते. त्यासाठी तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा यांनी २४ तास पाण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी यमुनानगरची निवड केली होती. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता.यमुनानगर, प्राधिकरण परिसरात सुमारे वीस हजार नागरिक वास्तव्यास आहे. कामगार, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गी अशा विविध स्तरांतील नागरिक वास्तव्यास आहे. त्यांना समस्येचा सामना करावा लागत आहे.ऐनदिवाळीचा सण तोंडावर आला आहे. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पावसाळा असतानाही पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरूळीत न केल्यास आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड