शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

राजकारण २४ तास पाण्याचे , यमुनानगर प्राधिकरण, प्रकल्प बंद केल्याने पाणीटंचाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 03:04 IST

महापालिकेने निगडी, यमुनानगरमध्ये उंचवट्यावर घरासाठी २४ तास पाणीपुरवठा रद्द केला होता. या परिसरातील उंचवट्यावर घरे असणा-या परिसरात एक तासही पाणी जात नव्हते.

पिंपरी : महापालिकेने निगडी, यमुनानगरमध्ये उंचवट्यावर घरासाठी २४ तास पाणीपुरवठा रद्द केला होता. या परिसरातील उंचवट्यावर घरे असणा-या परिसरात एक तासही पाणी जात नव्हते. त्यामुळे पालिकेतर्फे यमुनानगरमध्ये २४ तास पाण्याचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, तो सध्या बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून २४ तास पाण्याचा प्रकल्प त्वरित सुरू करावा, अशी मागणी होत आहे. ऐनदिवाळीत आणि पावसाळ्यात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. यमुनानगर परिसराचा २४ तास पाण्याचा प्रकल्प सुरू केला होता. भारतीय जनता पक्षाने हा प्रकल्प बंद केला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. याबाबत शिवसेनेने २४ तास पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासन दाद देत नाही.शिवसेनेच्या शहर संघटक सुलभा उबाळे म्हणाल्या, की त्यामुळे यमुनानगरमधील नागरिकांना पाणी मिळू लागले होते. आता तो प्रकल्प बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.यमुनानगर या परिसरात मध्यमवर्गीय नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश नोकरदार वर्ग आहे. पाणी येण्याच्या वेळेत नागरिक घरी नसतात. त्यामुळे पाणी भरणे त्यांना कठीण होत आहे. संपूर्ण शहरात २४ तास पाण्याचा प्रकल्प राबविण्याचे नियोजन पालिका करीत आहे. असे असताना यमुनानगरमधील प्रकल्प बंद करणे योग्य नाही. यमुनानगरमधील २४ तास पाण्याचा प्रकल्प त्वरित सुरू करण्यात यावा.’’महापालिकेतील सत्तांतराचा परिणाममहापालिकेत सत्तांतर झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे प्राधिकरणातील चोविस तास पाणीपुरवठा योजना गुंडळाली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाने विनाटाकीचे गृहप्रकल्प यमुनानगर येथे बांधले आहेत. तसेच यमुनानगरमध्ये अनेक घरे उंचावर आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. घरामध्ये पाणी वरती चढत नव्हते. त्यासाठी तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा यांनी २४ तास पाण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी यमुनानगरची निवड केली होती. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता.यमुनानगर, प्राधिकरण परिसरात सुमारे वीस हजार नागरिक वास्तव्यास आहे. कामगार, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गी अशा विविध स्तरांतील नागरिक वास्तव्यास आहे. त्यांना समस्येचा सामना करावा लागत आहे.ऐनदिवाळीचा सण तोंडावर आला आहे. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पावसाळा असतानाही पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरूळीत न केल्यास आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड