शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

राजकारण २४ तास पाण्याचे , यमुनानगर प्राधिकरण, प्रकल्प बंद केल्याने पाणीटंचाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 03:04 IST

महापालिकेने निगडी, यमुनानगरमध्ये उंचवट्यावर घरासाठी २४ तास पाणीपुरवठा रद्द केला होता. या परिसरातील उंचवट्यावर घरे असणा-या परिसरात एक तासही पाणी जात नव्हते.

पिंपरी : महापालिकेने निगडी, यमुनानगरमध्ये उंचवट्यावर घरासाठी २४ तास पाणीपुरवठा रद्द केला होता. या परिसरातील उंचवट्यावर घरे असणा-या परिसरात एक तासही पाणी जात नव्हते. त्यामुळे पालिकेतर्फे यमुनानगरमध्ये २४ तास पाण्याचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, तो सध्या बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून २४ तास पाण्याचा प्रकल्प त्वरित सुरू करावा, अशी मागणी होत आहे. ऐनदिवाळीत आणि पावसाळ्यात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. यमुनानगर परिसराचा २४ तास पाण्याचा प्रकल्प सुरू केला होता. भारतीय जनता पक्षाने हा प्रकल्प बंद केला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. याबाबत शिवसेनेने २४ तास पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासन दाद देत नाही.शिवसेनेच्या शहर संघटक सुलभा उबाळे म्हणाल्या, की त्यामुळे यमुनानगरमधील नागरिकांना पाणी मिळू लागले होते. आता तो प्रकल्प बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.यमुनानगर या परिसरात मध्यमवर्गीय नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश नोकरदार वर्ग आहे. पाणी येण्याच्या वेळेत नागरिक घरी नसतात. त्यामुळे पाणी भरणे त्यांना कठीण होत आहे. संपूर्ण शहरात २४ तास पाण्याचा प्रकल्प राबविण्याचे नियोजन पालिका करीत आहे. असे असताना यमुनानगरमधील प्रकल्प बंद करणे योग्य नाही. यमुनानगरमधील २४ तास पाण्याचा प्रकल्प त्वरित सुरू करण्यात यावा.’’महापालिकेतील सत्तांतराचा परिणाममहापालिकेत सत्तांतर झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे प्राधिकरणातील चोविस तास पाणीपुरवठा योजना गुंडळाली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाने विनाटाकीचे गृहप्रकल्प यमुनानगर येथे बांधले आहेत. तसेच यमुनानगरमध्ये अनेक घरे उंचावर आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. घरामध्ये पाणी वरती चढत नव्हते. त्यासाठी तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा यांनी २४ तास पाण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी यमुनानगरची निवड केली होती. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता.यमुनानगर, प्राधिकरण परिसरात सुमारे वीस हजार नागरिक वास्तव्यास आहे. कामगार, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गी अशा विविध स्तरांतील नागरिक वास्तव्यास आहे. त्यांना समस्येचा सामना करावा लागत आहे.ऐनदिवाळीचा सण तोंडावर आला आहे. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पावसाळा असतानाही पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरूळीत न केल्यास आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड