शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

गटांसाठी २०, गणांसाठी ४५ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 14, 2017 01:59 IST

मावळ तालुक्यातील माघारीच्या अखेरच्या दिवशी सोमवारी जिल्हा परिषद पाच गटांतील ३५ पैकी १५ जणांनी माघार घेतल्याने आता

वडगाव मावळ/लोणावळा : मावळ तालुक्यातील माघारीच्या अखेरच्या दिवशी सोमवारी जिल्हा परिषद पाच गटांतील ३५ पैकी १५ जणांनी माघार घेतल्याने आता २० उमेदवार रिंगणात असून, पंचायत समिती १० गणातून ७६ उमेदवारांपैकी ३१ जणांनी माघार घेतली असून, आता ४५ जण रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.काही मतदारसंघांत चौरंगी, तर काही मतदारसंघांत पंचरंगी लढती होत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पाच बंडखोर अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे.पंचायत समितीवर मागील काही वर्षापासून भाजपाचे कमळ फुलत आहे. कमळाच्या जागेवर घड्याळाची रिंग वाजावी याकरिता सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीचे सर्व नेते एका व्यासपीठावर आले. पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठिशी उभे राहण्याचा चंग माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बांधला. मात्र, उमेदवारी देतांना ठराविक गटांच्या नेत्यांच्या नातेवाईक व कार्यकर्त्यांनाच उमेदवारी बहाल केल्याने नाराज नेत्यांनी एकजुटीला तिलांजली देत बंडखोरींला खतपाणी घातल्याने पुन्हा एकदा मावळातील राष्ट्रवादीला बंडखोरीची घरघर लागली आहे. उमेदवार निवडताना घराणेशाहीचा विचार मारक ठरला. बंडखोरांची मनधरणी करण्यात पक्षाला अपयश आले. पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादीचे बंडखोर मावळ ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष बाबूराव वायकर, सरपंच संघटनेचे मावळ अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, आंदर मावळ विभाग अध्यक्ष नारायण ठाकर, वडगाव शहराध्यक्ष राजेंद्र कुडे, ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष तुकाराम आसवले यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे ढोरे व नेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहिर केले. आंदर मावळ अध्यक्ष मंगेश ढोरे, महिलाध्यक्षा शुभांगी राक्षे, युवाध्यक्ष रमेश गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष अमोल केदारी उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या नाराज गटाला एकत्र करत राष्ट्रवादीला समांतर अशी समांतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांची स्थापना करत वरील सर्व उमेदवार निवडून आणण्याचा चंग ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी बांधला आहे. बंडखोरी रोखण्यात भाजप श्रेष्ठींना यश आले आहे. शिवसेनेने अधिकृत उमेदवाराची माघार घेत अपक्ष बाबूराव वायकर यांना पुरस्कृत केले आहे. निवडून येण्याची क्षमता पाहून हे बेरजेचे राजकारण खेळल्याचे शिवसेना सांगत असली तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची माघार व त्या जागी आयात उमेदवार हा चर्चेचा विषय ठरला आहे. मनसेने कोणालाही उमेदवारी दिली नसून सध्या तरी तटस्त भूमिका घेतली आहे. (वार्ताहर)