शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

शहरात १५ टक्के पाणीकपातीचा निर्णय

By admin | Updated: March 10, 2016 00:42 IST

पवना धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली.

पिंपरी : पवना धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. शुक्रवारपासून १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.गतवर्षीच्या तुलनेत पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपात होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने हॅलो पिंपरी-चिंचवडच्या अंकात ४ मार्चच्या अंकात केले होते. कमी पाऊस, धरणातील कमी पाणी साठा आणि जलसंपदा विभागाकडून केलेली पाणीकपात या पार्श्वभूमीवर आठ मार्चला बैठक झाली. त्या वेळी सगळीकडे एक वेळ पाणीपुरवठा आणि १० टक्के पाणीकपात करावी, असा विषय झाला. त्यानंतर आज आयुक्तांच्या कक्षात बैठक झाली. या वेळी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, आरपीआय आठवले गटाच्या प्रमुख चंद्रकांता सोनकांबळे, अपक्षांचे गटनेते सुरेश म्हेत्रे, ज्येष्ठ नगरसेविका शमीम पठाण, शहर अभियंता महावीर कांबळे या वेळी उपस्थित होते.याबाबत आयुक्त म्हणाले, ‘‘पाटबंधारे विभागाने केलेल्या सूचनेनुसार सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा झाली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाशी चर्चा करून आढावा घेऊन कपातीचा निर्णय घेतला आहे. शहरातील रहिवासी भागात मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, व्यावसायिक वापरासाठी शहराबाहेर टँकर पाठविणार नाही. (प्रतिनिधी)