शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शहरात उद्यापासून १० टक्के पाणीकपात

By admin | Updated: December 9, 2015 00:18 IST

पावसाने ओढ दिल्याने शहरातील पिण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय आयुक्त राजीव जाधव यांच्या समवेत झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

पिंपरी : पावसाने ओढ दिल्याने शहरातील पिण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय आयुक्त राजीव जाधव यांच्या समवेत झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. गुरुवारपासून एक वेळ पाणीपुरवठा आणि दहा टक्के पाणीकपात केली जाणार असून, नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. डिसेंबर उजाडला, तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने, पावसाने ओढ दिल्याने, पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मागील महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी केली होती. तसेच शहरात होणाऱ्या पाण्याच्या असमान वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली होती. काही भागात २४ तास, काही भागात एक वेळ, काही भागात दोन वेळ पाणीपुरवठा होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे पाणीकपात होणार, याबाबतचे संकेत आयुक्तांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर आयुक्तांनी गटनेत्यांची बैठक बोलावली होती. ‘लोकमत’ने मंगळवारच्या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय होणार, याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीस उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे सभापती अतुल शितोळे, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, भाजपाच्या गटनेत्या वर्षा मडेगिरी, मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, शहर अभियंता महावीर कांबळे, अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे, स्थायी समितीच्या माजी सभापती, नगरसेविका शमीम पठाण आदी उपस्थित होते. बैठकीत पाण्याविषयी नियोजन करण्यात आले. आयुक्त जाधव म्हणाले, ‘‘यापुढील काळात शहरातील सर्वच भागांत एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे. एक वेळ पाणी आणि पाणीकपात होत असली, तरी पाण्याचा दाब कमी होणार नाही. ज्या ठिकाणी अडीच ते तीन तास पाणीपुरवठा होणार होता, तिथे २० मिनिटे पाणी कमी येणार आहे. जलसंपदा विभागाने पिंपरी-चिंचवड शहरास पुरविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात केली आहे. शहरास मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरणात सध्या ६६ टक्के साठा आहे. दररोज आपणास ४५० दलघमी पाणीपुरवठा होतो. त्यात कपात करून ४०५ दलघमी पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. ही कपात जुलै २०१६पर्यंत कायम राहणार आहे.’’आयुक्त जाधव म्हणाले, ‘‘पाणीकपातीच्या कालखंडात नवीन नळजोड देण्यात येणार नाहीत. तसेच पाणीपुवठा करणाऱ्या टँकरवरही लक्ष असणार आहे. पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी २४ तास उपलब्ध असणार आहेत. तसेच त्यांच्या दीर्घ मुदतीच्या रजा रद्द केल्या आहेत.’’पाण्यासाठी उपाययोजना सुरूशहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्येचा विचार करून तीन पाणी योजनांचे नियोजन महापालिकेने केले आहे, असे सांगून आयुक्त म्हणाले, ‘‘अमृत योजनेत यातील काही योजनांना गती मिळेल. या योजना मार्गी लागल्यास पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही.’’(प्रतिनिधी) पाणीकपात कालावधीत बांधकाम व्यावसायिकांनी पिण्याचे पाणी वापरू नये, यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. बांधकाम व्यावसायिकांनी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच जे अधिकारी तक्रारी आल्यानंतर कारवाई करणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनीही पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई केली जाणार आहे. पाणीकपातीच्या कालखंडात नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर जपुन करावा. पाणीपुरवठ्यात अडचण येणार नाही याची दक्षता महापालिका घेणार आहे. पाणीपुरवठा विभाग नागरिकांना सेवा देण्यासाठी दक्ष असणार आहे. टँकर पुरवठा करणाऱ्यांना लॉग बुक देण्यात येणार असून, कोणता टँकर कोठे जातो, यांच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना अभियंत्यांना केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनीही काटकसरीने पाणी वापरावे. - राजीव जाधव, आयुक्त