शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    डाळींना भुंगा लागतो, तांदुळात अळ्या होतात? ४ टिप्स- धान्य अजिबात खराब होणार नाही

    By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2025 18:13 IST

    1 / 6
    वारंवार बाजारात जाऊन आणायला नको म्हणून आपण डाळ, तांदूळ एकदाच घेऊन साठवून ठेवतो. पण त्याचा नेमका उलटाच परिणाम होतो आणि डाळींना भुंगा लागतो तर तांदळात किडे, अळ्या होऊ लागतात.
    2 / 6
    असं होऊ नये म्हणून नेमकं काय करायचं आणि कोणत्या डाळीमध्ये कोणते पदार्थ घालून ठेवायचे, याविषयीची माहिती आता पाहूया.. ही माहिती homestylebysheela या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
    3 / 6
    यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तांदळात किडे होऊ नये म्हणून तांदळाच्या बरणीमध्ये तेजपान घालून ठेवावे.
    4 / 6
    हरबऱ्याच्या डाळीमध्ये किडे होऊ नयेत म्हणून बरणीमध्ये डाळ भरताना त्यात थोड्या वाळलेल्या लाल मिरच्या टाकून ठेवा.
    5 / 6
    मसूर डाळीच्या डब्यात लसूण पाकळ्या घालून ठेवल्याने डाळीला भुंगे होणार नाहीत.
    6 / 6
    उडीद किंवा तूर डाळीला किडे लागू नये म्हणून बरणीमध्ये हळकुंड घालून ठेवावे. धान्य जास्त दिवस साठवून ठेवण्यासाठी हे उपाय तुमच्या नक्कीच उपयोगी येऊ शकतात.
    टॅग्स :foodअन्नkitchen tipsकिचन टिप्सCleaning tipsस्वच्छता टिप्सHome remedyहोम रेमेडी