1 / 12इमारतीमध्ये पुराचे पाणी घुसले अडकलेल्या नागरीकांच्या सुटकेसाठी बोटी बोलवल्या2 / 12 चेन्नईतील उपनगर तंबाराममध्ये सर्वाधिक ४९ मिमी पाऊस3 / 12राज्य आपत्ती मदत निधीतून तामिळनाडूला ५०९ कोटी मंजूर केल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती. 4 / 12बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टयामुळे तामिळनाडूमध्ये पुढचे २४ तास पावसाची संततधार कायम रहाणार. पुडूचेरीमध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. 5 / 12समुद्र किनाऱ्यावरील शांतता सर्व काही सांगून जाते6 / 12अनेक धरणांच्या पाणीसाठ्यानेही आता धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थितीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.7 / 12पुराच्या पाण्याचा फटका आता चेन्नई विमानतळालाही बसला आहे. रन वेवर पाणी आल्याने विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.8 / 1216 नोव्हेंबरपासून शाळा बंद असून सहामाही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.9 / 12महिन्याभरापूर्वी आलेल्या रोआनू वादळानंतर चेन्नईत पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सतत पडत असणाऱ्या पावसाने चेन्नईचे जनजीवन ठप्प झालं आहे. किनाऱ्यालगत असलेल्या सर्व भागात सध्या पुराच्या पाण्याचं साम्राज्य पसरलेलं आहे.10 / 12रुळावर पाणी आल्याने रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर रस्त्यावरही पाणी साचलं आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याचंही समोर आलं आहे.11 / 12मदतीसाठी लष्कर नौदलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं असून एनडीआरएफची दहा पथकांचं बचावकार्यही युद्धपातळीवर सुरु आहे.12 / 12तामिळनाडूत पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील महिन्याभरापासून सुरु असलेल्या पावसाने चेन्नईसह राज्यात आतापर्यंत १८९ जणांचा बळी घेतला आहे. तेथिल काही क्षणचित्रे आम्ही येथे देत आहोत पाहण्यासाठी पुढील स्लाईड क्लिक करा....