शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. इमारतीचे काम थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST

आरोग्य केंद्रांत स्वॅब तपासणी परभणी : जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासण्याच्या वाढविण्यासाठी आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅब नमुने घेण्याची सुविधा ...

आरोग्य केंद्रांत स्वॅब तपासणी

परभणी : जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासण्याच्या वाढविण्यासाठी आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वॅब नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून स्वॅब नमुन्यांची संख्या वाढली आहे. मात्र ज्या रुग्णांना लक्षणे जाणवत आहेत, ते प्रत्यक्ष तपासणी करीत नसल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अनुभव आहे. केवळ तपासण्या वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे.

खासगी वाहतुकीवर भिस्त

परभणी : जिल्ह्यात ग्रामीण भागात अद्यापही बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे ठिकाण गाठण्यासाठी खासगी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागत आहे. प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत एसटी. महामंडळाने ही सेवा बंद केली आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, ग्रामीण भागातील सर्व बसफेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे.

कर्मचाऱ्यांचा मनमानीपणा

परभणी : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरू झाले असले तरी अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत इतरत्र फिरत असल्याने नागरिकांची कामे रखडत आहेत. विशेषत: पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका कार्यालयांत हा अनुभव वारंवार येत आहे. बायोमॅट्रिक हजेरी नसल्याने उशिराने येणे, कार्यालयात प्रवेश केल्यानंतरही इतर ठिकाणी फिरणे असे प्रकार होत आहे. कार्यालय प्रमुखांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

बगीचाची अवस्था बकाल

परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरातील बगीचाची बकाल अवस्था झाली आहे. या ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावून परिसर सुशोभित करण्यासाठी जागा आखण्यात आली आहे. त्यास छोटेखानी संरक्षक भिंतही बांधली आहे. मात्र अधिकाऱ्यांचे या बगीचाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सध्या या भागात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, परिसर अस्वच्छ झाला आहे.

घरकुलांची बांधकामे रखडली

परभणी : शहरातील रमाई आवास आणि पंतप्रधान आवस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम रखडले आहे. काही लाभार्थ्यांना वाळूची समस्या निर्माण झाली आहे. तर काही जणांना वेळेवर हप्ता मिळाला नसल्याने बांधकाम बंद ठेवावे लागत आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे लाभार्थी अडचणीत आहेत.