शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जंतनाशक गोळ्या दिल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST

परभणी : २८ टक्के मुलांमध्ये जंतदोष असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे प्रत्येक मुलांनी जंतनाशक गोळ्या घेणे ...

परभणी : २८ टक्के मुलांमध्ये जंतदोष असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे प्रत्येक मुलांनी जंतनाशक गोळ्या घेणे बंधनकारक आहे. मात्र सध्या शाळा बंद असल्याने या गोळ्यांचे अद्याप वाटप झाले नसून, २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी ही मोहीम राबविली जाणार आहे.

बालकांमध्ये जंतदोष होण्याचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी जंतनाशक गोळ्या घेणे आवश्यक आहे. लहान मुलांमध्ये अस्वच्छता तसेच खाद्यपदार्थांतून होणाऱ्या इन्फेक्शनमुळे पोटात जंत होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मुलांना या गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.

काय आहे जंतदोष

अस्वच्छता आणि विविध प्रकारच्या इन्फेक्शनमुळे पोटात जंत होतात. त्यामुळे भूक न लागणे, कुपोषण, रक्तक्षय यासारखे आजार जडतात. जंतदोषामुळे मुलांचे अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे या मुलांना जंतनाशक गोळ्या देणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.

वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या

जंतदोष होऊ नये यासाठी वयाच्या १९ वर्षांपर्यंत जंतनाशक गोळ्या द्याव्या लागतात. १ ते २ वर्षांपर्यंतच्या बालकांना अर्धी गोळी आणि २ वर्षांपुढील मुलांना १ गोळी पाण्यात विरघळून दिली जाते.

गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा

जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये या गोळ्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालय, मनपाचे आरोग्य केंद्र, ग्रामीण भागात उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात या गोळ्या उपलब्ध असतील.

२१ सप्टेंबर रोजी मोहीम

२१ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी आशा स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे, तसेच या मोहिमेत वंचित राहिलेल्या बालकांसाठी २८ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.