शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कामगारांना लॉकडाऊनची तर उद्योजकांना कामगार गावी जाण्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील परप्रांतीय कामगारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे ...

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील परप्रांतीय कामगारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय ठप्प होण्याची धास्ती उद्योजकांमध्ये आहे.

परभणी जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागण्याची चिन्हे असून, या शक्यतेमुळे कामगारांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. जिल्ह्यात विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आदी भागातील कामगार परभणीत रोजगारासाठी आले आहेत. लॉकडाऊन लागल्यास अडकून पडण्याची भीती असल्याने या कामगारांमध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे. लॉकडाऊन लागण्यापूर्वी गावाकडे परत जाण्याची तयारी काही जणांनी केली आहे. एकदा कामगार गावाकडे परतला की उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी किमान पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे उद्योजकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पंधरा दिवसांचे लॉकडाऊन असले तरी कामगार गावाकडून परत येणे, व्यवसाय पूर्वपदावर येणे यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याने उद्योजकांना लॉकडाऊनची सर्वाधिक झळ सहन करावी लागणार आहे. येथील एमआयडीसी इतर औद्योगिक व्यवसायात यामुळेच चलबिचल निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे ठप्प झालेला व्यवसाय कसातरी पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याने उद्योजक मंडळी देखील चिंतेत आहेत. काही जणांनी कामगारांच्या राहण्याची सुविधा करून त्यांना येथेच राहावे, अशी विनंती केली आहे; परंतु ही बाब सर्वांना शक्य नाही. त्यामुळे लॉकडाऊनची चिंता कामगारांबरोबर उद्योजकांमध्ये ही वाढू लागली आहे.