शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपूनही पूर्ण होईना आरोग्य केंद्राचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:15 IST

तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या या बनवस गावांमध्ये आतापर्यंत उपकेंद्रात आरोग्य सुविधा दिल्या जातात.चाटोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बनवस येथे उपकेंद्र ...

तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या या बनवस गावांमध्ये आतापर्यंत उपकेंद्रात आरोग्य सुविधा दिल्या जातात.चाटोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बनवस येथे उपकेंद्र कार्यरत आहे. या गावची वाढती लोकसंख्या आणि आरोग्य सुविधेसाठी होणारी तारांबळ लक्षात घेऊन या ठिकाणी आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली. त्याचबरोबर केंद्राच्या इमारतीलाही निधी उपलब्ध झाल्याने इमारत बांधकाम सुरू झाले. १० जानेवारी २०१७ रोजी प्रत्यक्ष इमारत बांधकामाला सुरुवात झाली. जानेवारी २०१९ पर्यंत या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला दिली होती; मात्र मुदत संपून दोन वर्षे उलटले तरीही या इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या भागातील आरोग्याची सुविधा ग्रामस्थांना अद्याप उपलब्ध झाली नाही. उपकेंद्र कार्यरत असले तरी त्या ठिकाणी पुरेसे कर्मचारी, औषध साठा उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर आजारावर आणि तातडीने उपचार घेण्यासाठी येथील ग्रामस्थांना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर गाठावे लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पावले उचलली; मात्र प्रशासकीय दप्तर दिरंगाई येथील आरोग्य केंद्राची इमारत रखडली आहे. अद्याप इमारतच बांधून पूर्ण झाली नसल्याने आरोग्य केंद्र अंतर्गत मंजूर पदे कर्मचाऱ्यांची नियुक्ती व इतर भौतिक सुविधांसंदर्भात कोणतीही पावले उचलली नाहीत. परिणामी, बनवससह परिसरातील इतर गावातील जवळपास २५ हजार ग्रामस्थांच्या आरोग्य सुविधा अजूनही टांगणीला आहेत.

लेखी आश्वासन देऊनही दोन वर्षांचा कालावधी उलटला

बनवस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डेबिटवार यांनी जानेवारी २०१९ पर्यंत बांधकाम पूर्ण केले जाईल, असे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले होते; मात्र बनवस ग्रामस्थांना अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनालाही आज दोन वर्षे पूर्ण झाले आहेत; मात्र अद्यापही याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी, चार ते पाच महिन्यांपासून छोट्याशा उपकेंद्रांमध्ये हे आरोग्य केंद्र चालविले जात आहे.

सुविधांअभावी शहरांकडे धाव

बनवस हे गाव तीन जिल्ह्याच्या सीमेवरील गाव आहे. या गावापासून पालम २५ किमी, गंगाखेड ३० किमी, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर २८ किमी आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका ३० किमी अंतरावर आहे. गंभीर आजाराच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी या गावातून रुग्ण शहराकडे धाव घेतात.