शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वाळूअभावी रखडली १० हजार घरकुलांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

परभणी : ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने रमाई आवस, पंतप्रधान आवास आदी योजनांच्या माध्यमातून घरकूलांचा लाभ ...

परभणी : ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने रमाई आवस, पंतप्रधान आवास आदी योजनांच्या माध्यमातून घरकूलांचा लाभ दिला जातो. मात्र मागील दोन वर्षापासून वाळूअभावी जिल्ह्यातील १० हजार घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळणे लांबणीवर पडत आहे.

रमाई आवास व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कच्चे घर असणाऱ्या कुटूंबिबयांना नवीन पक्के घर बांधकामासाठी अर्थसहाय्य केले जाते. अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील लाभार्थ्यांसाठी रमाई आवास तर दारिद्रय रेषेखालील व अल्पभूधारक घटकातील लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ दिला जातो. यासाठी जवळपास १ लाख २० हजार रुपयांपर्यंचे अर्थसहाय्य केले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळतो. रमाई आवास योजनेंतर्गत २०१०-२०२० या दहा वर्षात ३२ हजार १०६ घरकुलांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २२ हजार ३०५ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. हीच परस्थिती पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना आदी योजनांची आहे. काही ठिकाणी निधीची तर काही ठिकाणी वाळू उपलब्ध नसल्याने घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये महाआवास अभियान राबवून वाळू व निधी अभावी रखडलेली घरकुलांची कामे पूर्ण करून लाभार्थ्यांना आपल्या हक्काचा निवारा मिळून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.