शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

वाळूअभावी रखडली १० हजार घरकुलांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

परभणी : ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने रमाई आवस, पंतप्रधान आवास आदी योजनांच्या माध्यमातून घरकूलांचा लाभ ...

परभणी : ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने रमाई आवस, पंतप्रधान आवास आदी योजनांच्या माध्यमातून घरकूलांचा लाभ दिला जातो. मात्र मागील दोन वर्षापासून वाळूअभावी जिल्ह्यातील १० हजार घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळणे लांबणीवर पडत आहे.

रमाई आवास व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कच्चे घर असणाऱ्या कुटूंबिबयांना नवीन पक्के घर बांधकामासाठी अर्थसहाय्य केले जाते. अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील लाभार्थ्यांसाठी रमाई आवास तर दारिद्रय रेषेखालील व अल्पभूधारक घटकातील लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ दिला जातो. यासाठी जवळपास १ लाख २० हजार रुपयांपर्यंचे अर्थसहाय्य केले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळतो. रमाई आवास योजनेंतर्गत २०१०-२०२० या दहा वर्षात ३२ हजार १०६ घरकुलांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २२ हजार ३०५ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. हीच परस्थिती पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना आदी योजनांची आहे. काही ठिकाणी निधीची तर काही ठिकाणी वाळू उपलब्ध नसल्याने घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये महाआवास अभियान राबवून वाळू व निधी अभावी रखडलेली घरकुलांची कामे पूर्ण करून लाभार्थ्यांना आपल्या हक्काचा निवारा मिळून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.