शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

वाळूअभावी रखडली १० हजार घरकुलांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

परभणी : ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने रमाई आवस, पंतप्रधान आवास आदी योजनांच्या माध्यमातून घरकूलांचा लाभ ...

परभणी : ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने रमाई आवस, पंतप्रधान आवास आदी योजनांच्या माध्यमातून घरकूलांचा लाभ दिला जातो. मात्र मागील दोन वर्षापासून वाळूअभावी जिल्ह्यातील १० हजार घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळणे लांबणीवर पडत आहे.

रमाई आवास व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कच्चे घर असणाऱ्या कुटूंबिबयांना नवीन पक्के घर बांधकामासाठी अर्थसहाय्य केले जाते. अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील लाभार्थ्यांसाठी रमाई आवास तर दारिद्रय रेषेखालील व अल्पभूधारक घटकातील लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ दिला जातो. यासाठी जवळपास १ लाख २० हजार रुपयांपर्यंचे अर्थसहाय्य केले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळतो. रमाई आवास योजनेंतर्गत २०१०-२०२० या दहा वर्षात ३२ हजार १०६ घरकुलांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २२ हजार ३०५ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. हीच परस्थिती पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना आदी योजनांची आहे. काही ठिकाणी निधीची तर काही ठिकाणी वाळू उपलब्ध नसल्याने घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये महाआवास अभियान राबवून वाळू व निधी अभावी रखडलेली घरकुलांची कामे पूर्ण करून लाभार्थ्यांना आपल्या हक्काचा निवारा मिळून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.