शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

स्टॅन्डअप इंडियामध्ये महिलांचा डंका; राज्यात ६५९८ उद्योजक महिलांना लाभ

By मारोती जुंबडे | Updated: April 14, 2023 18:53 IST

अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती आणि महिलांना सक्षम करत त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१६ पासून स्टॅन्ड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे.

परभणी: केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत राज्यभरात ५ वर्षात ६५९८ महिला उद्योजकांना व्यवसाय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिलांसाठी राबवली जाते. या योजनेचा ग्रामीण भागात अपेक्षित प्रचार व प्रसार झाल्या नसल्याने ग्रामीण भागातील उद्योजक महिला या स्टँड अप इंडिया योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली.

अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती आणि महिलांना सक्षम करत त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१६ पासून स्टॅन्ड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन उद्योग उभारण्यासाठी कर्ज देण्यात येते, सेवा किंवा व्यापार आणि कृषी संलग्न उद्योग क्षेत्रात ग्रीन फील्ड कंपन्या सुरू करण्यासाठी मदत करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या महिला किंवा पुरुषाला बँकेच्या प्रत्येक शाखेतून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाख ते १ कोटीपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. तळागाळातील समाजापर्यंत उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याबरोबर त्यांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेला २०२५ पर्यंत केंद्र शासनाच्या वतीने मुद्दत वाढ देण्यात आली आहे. २०१६ ते २०२२ पर्यंत या योजनेअंतर्गत राज्यभरात ६५९८ महिलांना ११९९ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्जातून महिलांना आपला उद्योग उभारून आर्थिक सक्षम होण्यासाठी बळ मिळाले आहे.

११९९ कोटींचे मिळाले बळकेंद्र सरकारच्या मार्जिन मनी योजनेअंतर्गत पात्र अनुसूचित जाती व मागासवर्गीय घटकातील नव उद्योजक अर्जदार स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, मागासवर्गीय घटकांमधील उद्योजकांना उभारी देण्यासाठी मार्जिन मनी योजना राबवली जाते. बेरोजगार तरुणांना व्यवसायातून सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. नव उद्योजकांनी १० टक्के व सोयीचा भरणा केल्यानंतर बँकेने अर्जदारास योजनेअंतर्गत ७५ टक्के अर्ज मंजुरीनंतर १५ टक्के सबसिडी शासन देते. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत आतापर्यंत राज्यभरात ६५९८ महिलांना ११९९ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्ज विविध बँक शाखेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे.

मुंबई पहिल्या स्थानावरकेंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत महिलांना उद्योजकांसाठी मदत करून त्यांना उभारी देण्यासाठी २०१६ पासून प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत सर्वाधिक मुंबई मध्ये १०३० त्यानंतर नागपूर ६३५, पुणे ९३४ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रशासनाने २३७ महिलांना स्टँड अप योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले आहे.

परभणी सापडेना लाभार्थीकेंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत महिला उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून त्यांच्या उद्योगांना उभारी देण्यासाठी ही योजना आहे. परंतु, आतापर्यंत परभणी जिल्ह्यात २५६ महिला लाभार्थ्यांची उद्दिष्ट असताना केवळ १८ महिलांना १ कोटी ९६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे अनुसूचित जाती व जमाती मधील एकही महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे परभणीत महिला लाभार्थी सापडत नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जिल्हा महिलांची संख््यामुंबई १०३०नागपूर ६३५पुणे ९३४छत्रपती संभाजीनगर २३७बिड ३२परभणी १८

टॅग्स :parabhaniपरभणीCentral Governmentकेंद्र सरकार