शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

स्टॅन्डअप इंडियामध्ये महिलांचा डंका; राज्यात ६५९८ उद्योजक महिलांना लाभ

By मारोती जुंबडे | Updated: April 14, 2023 18:53 IST

अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती आणि महिलांना सक्षम करत त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१६ पासून स्टॅन्ड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे.

परभणी: केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत राज्यभरात ५ वर्षात ६५९८ महिला उद्योजकांना व्यवसाय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिलांसाठी राबवली जाते. या योजनेचा ग्रामीण भागात अपेक्षित प्रचार व प्रसार झाल्या नसल्याने ग्रामीण भागातील उद्योजक महिला या स्टँड अप इंडिया योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली.

अनुसूचित जाती, जमातीच्या व्यक्ती आणि महिलांना सक्षम करत त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१६ पासून स्टॅन्ड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन उद्योग उभारण्यासाठी कर्ज देण्यात येते, सेवा किंवा व्यापार आणि कृषी संलग्न उद्योग क्षेत्रात ग्रीन फील्ड कंपन्या सुरू करण्यासाठी मदत करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या महिला किंवा पुरुषाला बँकेच्या प्रत्येक शाखेतून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाख ते १ कोटीपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. तळागाळातील समाजापर्यंत उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याबरोबर त्यांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेला २०२५ पर्यंत केंद्र शासनाच्या वतीने मुद्दत वाढ देण्यात आली आहे. २०१६ ते २०२२ पर्यंत या योजनेअंतर्गत राज्यभरात ६५९८ महिलांना ११९९ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्जातून महिलांना आपला उद्योग उभारून आर्थिक सक्षम होण्यासाठी बळ मिळाले आहे.

११९९ कोटींचे मिळाले बळकेंद्र सरकारच्या मार्जिन मनी योजनेअंतर्गत पात्र अनुसूचित जाती व मागासवर्गीय घटकातील नव उद्योजक अर्जदार स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, मागासवर्गीय घटकांमधील उद्योजकांना उभारी देण्यासाठी मार्जिन मनी योजना राबवली जाते. बेरोजगार तरुणांना व्यवसायातून सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. नव उद्योजकांनी १० टक्के व सोयीचा भरणा केल्यानंतर बँकेने अर्जदारास योजनेअंतर्गत ७५ टक्के अर्ज मंजुरीनंतर १५ टक्के सबसिडी शासन देते. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत आतापर्यंत राज्यभरात ६५९८ महिलांना ११९९ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्ज विविध बँक शाखेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे.

मुंबई पहिल्या स्थानावरकेंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत महिलांना उद्योजकांसाठी मदत करून त्यांना उभारी देण्यासाठी २०१६ पासून प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत सर्वाधिक मुंबई मध्ये १०३० त्यानंतर नागपूर ६३५, पुणे ९३४ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रशासनाने २३७ महिलांना स्टँड अप योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले आहे.

परभणी सापडेना लाभार्थीकेंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत महिला उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून त्यांच्या उद्योगांना उभारी देण्यासाठी ही योजना आहे. परंतु, आतापर्यंत परभणी जिल्ह्यात २५६ महिला लाभार्थ्यांची उद्दिष्ट असताना केवळ १८ महिलांना १ कोटी ९६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे अनुसूचित जाती व जमाती मधील एकही महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे परभणीत महिला लाभार्थी सापडत नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जिल्हा महिलांची संख््यामुंबई १०३०नागपूर ६३५पुणे ९३४छत्रपती संभाजीनगर २३७बिड ३२परभणी १८

टॅग्स :parabhaniपरभणीCentral Governmentकेंद्र सरकार