शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

परभणीतील नाले का तुंबले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

परभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा परभणी शहरातील नाले तुंबून रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी तर काही वसाहतींमध्ये ...

परभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा परभणी शहरातील नाले तुंबून रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी तर काही वसाहतींमध्ये ही घरात पाणी शिरल्याने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली नाही. अनेक वेळा ओरड करुन ही सांडपाणी वाहून जाण्याचे नियोजन न केल्याने परभणीकरांचे तारांबळ उडत आहे. मनपाच्या उदासीनतेचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या संसर्ग काळानंतर महापालिकेचा कारभार रामभरोसे झाला आहे. अनेक कामे पैशांविना ही होऊ शकतात. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. शहर विकासाच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. मनपा लक्ष देत नाही आणि नागरिक मनमानेल त्याप्रमाणे स्वत:पुरती उपाययोजना करतात परिणामी शहराच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे मागच्या काही ११ जुलै रोजी शहराच्या हद्दीत अतिवृष्टी झाली. या पहिल्याच अतिवृष्टीत अनेक वसाहतीत पाणी शिरले. बसस्थानक ते रेल्वेस्थानक रस्त्यावर गुडघ्याएवढे पाणी साचल्याने हा मार्ग बंद झाला. तर प्रथमच वसमत रस्ताही पाण्याखाली गेला होता. त्यावेळी शहरातील पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली. मात्र मनपाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा परभणीतील रस्ते तुंबले.

मंगळवारी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते अक्षरशः पाण्याखाली होते. मुख्य रस्त्याने पाण्याचे लोंढे वाहत होते. त्यामुळे वाहनधारकांची गैरसाेय झाली. मागील वेळे प्रमाणेच वसमत रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी होते. त्याचप्रमाणे शहरातील कच्छीबाजार, जनता मार्केट, गांधी पार्क, जिल्हा स्टेडियम परिसरात पाणीच पाणी झाले होते. नाल्या का तुंबल्या ? याचे आत्मपरीक्षण करुन मनपानेच आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

परस्पर अनेकांनी बुजविलेल्या नाल्या

शहरातील नागरिकांनीही परस्पर नाल्या बुजविलेल्या आहेत. तर काही जणांनी नाल्याचे पाणी मनाला वाटेल त्याप्रमाणे वळविले आहे. प्रशासकीय, वकील कॉलनी, देशमुख गल्ली, बसस्थानक परिसर, डॉक्टर लेन, जिल्हा स्टेडियम भागातील काही नाल्या बंद करण्यात आल्या आहेत तर नाल्यांचे पाणी विरुद्ध मार्गाने वळविले आहे. तसेच उघडा महादेव ते एमआयडीसी., ममता कॉलनी, वृंदावन कॉलनी, या भागात नालेच नसल्याने पाणी मुख्य रस्त्यावर येते.

नाल्यांवर ही अतिक्रमणे

शहरातील मोठ्या नाल्यांवर ही बिनधास्तपणे अतिक्रमणे झाली आहेत. विशेष म्हणजे, शासकीय जागांवर ही अतिक्रमणे करण्यात आली. काही जणांनी नाल्यांची रुंदी कमी केली असून, काहींनी तर चक्क नाल्या बुजविलेल्या आहेत. तर मुख्य बाजारपेठ भागात नाल्यांवर दुकाने थाटली आहेत. बसस्थानकासमोरील डिग्गी नाला तसेच वसमत रस्त्यावरील प्रमुख नाल्यावर अतिक्रमण झाल्याने पाणी वाहून जात नाही. त्यामुळे थोडाही पाऊस झाल्यास शहरातील रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी होत आहे.