शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

परभणीतील नाले का तुंबले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

परभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा परभणी शहरातील नाले तुंबून रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी तर काही वसाहतींमध्ये ...

परभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा परभणी शहरातील नाले तुंबून रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी तर काही वसाहतींमध्ये ही घरात पाणी शिरल्याने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली नाही. अनेक वेळा ओरड करुन ही सांडपाणी वाहून जाण्याचे नियोजन न केल्याने परभणीकरांचे तारांबळ उडत आहे. मनपाच्या उदासीनतेचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या संसर्ग काळानंतर महापालिकेचा कारभार रामभरोसे झाला आहे. अनेक कामे पैशांविना ही होऊ शकतात. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. शहर विकासाच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. मनपा लक्ष देत नाही आणि नागरिक मनमानेल त्याप्रमाणे स्वत:पुरती उपाययोजना करतात परिणामी शहराच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे मागच्या काही ११ जुलै रोजी शहराच्या हद्दीत अतिवृष्टी झाली. या पहिल्याच अतिवृष्टीत अनेक वसाहतीत पाणी शिरले. बसस्थानक ते रेल्वेस्थानक रस्त्यावर गुडघ्याएवढे पाणी साचल्याने हा मार्ग बंद झाला. तर प्रथमच वसमत रस्ताही पाण्याखाली गेला होता. त्यावेळी शहरातील पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली. मात्र मनपाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा परभणीतील रस्ते तुंबले.

मंगळवारी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते अक्षरशः पाण्याखाली होते. मुख्य रस्त्याने पाण्याचे लोंढे वाहत होते. त्यामुळे वाहनधारकांची गैरसाेय झाली. मागील वेळे प्रमाणेच वसमत रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी होते. त्याचप्रमाणे शहरातील कच्छीबाजार, जनता मार्केट, गांधी पार्क, जिल्हा स्टेडियम परिसरात पाणीच पाणी झाले होते. नाल्या का तुंबल्या ? याचे आत्मपरीक्षण करुन मनपानेच आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

परस्पर अनेकांनी बुजविलेल्या नाल्या

शहरातील नागरिकांनीही परस्पर नाल्या बुजविलेल्या आहेत. तर काही जणांनी नाल्याचे पाणी मनाला वाटेल त्याप्रमाणे वळविले आहे. प्रशासकीय, वकील कॉलनी, देशमुख गल्ली, बसस्थानक परिसर, डॉक्टर लेन, जिल्हा स्टेडियम भागातील काही नाल्या बंद करण्यात आल्या आहेत तर नाल्यांचे पाणी विरुद्ध मार्गाने वळविले आहे. तसेच उघडा महादेव ते एमआयडीसी., ममता कॉलनी, वृंदावन कॉलनी, या भागात नालेच नसल्याने पाणी मुख्य रस्त्यावर येते.

नाल्यांवर ही अतिक्रमणे

शहरातील मोठ्या नाल्यांवर ही बिनधास्तपणे अतिक्रमणे झाली आहेत. विशेष म्हणजे, शासकीय जागांवर ही अतिक्रमणे करण्यात आली. काही जणांनी नाल्यांची रुंदी कमी केली असून, काहींनी तर चक्क नाल्या बुजविलेल्या आहेत. तर मुख्य बाजारपेठ भागात नाल्यांवर दुकाने थाटली आहेत. बसस्थानकासमोरील डिग्गी नाला तसेच वसमत रस्त्यावरील प्रमुख नाल्यावर अतिक्रमण झाल्याने पाणी वाहून जात नाही. त्यामुळे थोडाही पाऊस झाल्यास शहरातील रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी होत आहे.