शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नववीच्या वर्गातील ६ हजार विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

मागील वर्षीपासून राज्यभरात कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली नाही. सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय ...

मागील वर्षीपासून राज्यभरात कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली नाही. सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे नववी वर्गात शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी दहावी वर्गासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

दरवर्षीच नववीतून दहावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होतेे, असा अनुभव आहे. मात्र यावर्षी ही संख्या साडेसहा हजारांपर्यंत पोहोचल्याने या विद्यार्थ्यांची संख्या का कमी झाली, याबाबत मात्र गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर...

n जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. काही बालविवाह रोखल्याचेही प्रकार समोर आले आहेत. बालविववाह हेदेखील एक कारण विद्यार्थी संख्या कमी होण्यासाठी असू शकते.

n परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थी जिल्ह्यात निवासी स्वरूपात शिक्षण घेत होते.

n कोरोना संसर्गामुळे हे विद्यार्थी परत दहावीच्या प्रवेशासाठी आले नसावेत.

ग्रामीण भागात संसर्ग वाढल्याचा परिणाम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या शहरातून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांची संख्या अधिक असली या मजुरांचे पाल्य शैक्षणिक प्रवाहात येण्याची प्रक्रिया संथगतीने झाली.

त्याचप्रमाणे मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग असल्याने अनेक विद्यार्थी शैक्षिणक प्रवाहापासून दूर राहिले. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले नाहीत.

विद्यार्थी संख्या कमी होण्यासाठी ही कारणे असू, शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

हिंगोली, नांदेड, बुलडाणा, जालना आदी जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात निवासी स्वरूपात शिक्षण घेत होते. कोरोनाच्या संसर्गामुळे हे विद्यार्थी गावाकडे परतल्यानंतर पुन्हा दहावी प्रवेशासाठी आले नसावेत. त्याचप्रमाणे कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळेही विद्यार्थी संख्या कमी झाली असावी.

विठ्ठल भुसारे, प्रभारी शिक्षणाधिकारी