शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

नववीच्या वर्गातील ६ हजार विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

मागील वर्षीपासून राज्यभरात कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली नाही. सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय ...

मागील वर्षीपासून राज्यभरात कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली नाही. सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे नववी वर्गात शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी दहावी वर्गासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

दरवर्षीच नववीतून दहावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होतेे, असा अनुभव आहे. मात्र यावर्षी ही संख्या साडेसहा हजारांपर्यंत पोहोचल्याने या विद्यार्थ्यांची संख्या का कमी झाली, याबाबत मात्र गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर...

n जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. काही बालविवाह रोखल्याचेही प्रकार समोर आले आहेत. बालविववाह हेदेखील एक कारण विद्यार्थी संख्या कमी होण्यासाठी असू शकते.

n परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थी जिल्ह्यात निवासी स्वरूपात शिक्षण घेत होते.

n कोरोना संसर्गामुळे हे विद्यार्थी परत दहावीच्या प्रवेशासाठी आले नसावेत.

ग्रामीण भागात संसर्ग वाढल्याचा परिणाम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या शहरातून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांची संख्या अधिक असली या मजुरांचे पाल्य शैक्षणिक प्रवाहात येण्याची प्रक्रिया संथगतीने झाली.

त्याचप्रमाणे मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग असल्याने अनेक विद्यार्थी शैक्षिणक प्रवाहापासून दूर राहिले. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले नाहीत.

विद्यार्थी संख्या कमी होण्यासाठी ही कारणे असू, शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

हिंगोली, नांदेड, बुलडाणा, जालना आदी जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात निवासी स्वरूपात शिक्षण घेत होते. कोरोनाच्या संसर्गामुळे हे विद्यार्थी गावाकडे परतल्यानंतर पुन्हा दहावी प्रवेशासाठी आले नसावेत. त्याचप्रमाणे कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळेही विद्यार्थी संख्या कमी झाली असावी.

विठ्ठल भुसारे, प्रभारी शिक्षणाधिकारी