शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

नववीच्या वर्गातील ६ हजार विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

मागील वर्षीपासून राज्यभरात कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली नाही. सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय ...

मागील वर्षीपासून राज्यभरात कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली नाही. सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे नववी वर्गात शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी दहावी वर्गासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

दरवर्षीच नववीतून दहावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होतेे, असा अनुभव आहे. मात्र यावर्षी ही संख्या साडेसहा हजारांपर्यंत पोहोचल्याने या विद्यार्थ्यांची संख्या का कमी झाली, याबाबत मात्र गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर...

n जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. काही बालविवाह रोखल्याचेही प्रकार समोर आले आहेत. बालविववाह हेदेखील एक कारण विद्यार्थी संख्या कमी होण्यासाठी असू शकते.

n परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थी जिल्ह्यात निवासी स्वरूपात शिक्षण घेत होते.

n कोरोना संसर्गामुळे हे विद्यार्थी परत दहावीच्या प्रवेशासाठी आले नसावेत.

ग्रामीण भागात संसर्ग वाढल्याचा परिणाम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या शहरातून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांची संख्या अधिक असली या मजुरांचे पाल्य शैक्षणिक प्रवाहात येण्याची प्रक्रिया संथगतीने झाली.

त्याचप्रमाणे मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग असल्याने अनेक विद्यार्थी शैक्षिणक प्रवाहापासून दूर राहिले. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले नाहीत.

विद्यार्थी संख्या कमी होण्यासाठी ही कारणे असू, शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

हिंगोली, नांदेड, बुलडाणा, जालना आदी जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात निवासी स्वरूपात शिक्षण घेत होते. कोरोनाच्या संसर्गामुळे हे विद्यार्थी गावाकडे परतल्यानंतर पुन्हा दहावी प्रवेशासाठी आले नसावेत. त्याचप्रमाणे कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळेही विद्यार्थी संख्या कमी झाली असावी.

विठ्ठल भुसारे, प्रभारी शिक्षणाधिकारी