शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

कोरोना लसीकरण ठरविणार शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने शाळा सुरू झालेल्या नाहीत. गतवर्षी ९ वी ते १२ वीचे वर्ग काही काळ ...

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने शाळा सुरू झालेल्या नाहीत. गतवर्षी ९ वी ते १२ वीचे वर्ग काही काळ सुरू झाले होते; परंतु पहिली ते आठवीचे वर्ग सुरूच झाले नाहीत; त्यामुळे या वर्गांमधील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नंतर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या महिन्यातच दहावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. वर्षभरानंतरही कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने येत्या शैक्षणिक वर्षातही शाळा सुरू होतील की नाही, याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे. शाळेविना शिक्षकही अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील याची त्यांनाही चिंता लागली आहे. जोपर्यंत सर्व वयोगटांतील लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही, तोपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

३६ हजार ५६१ विद्यार्थी थेट दुसरीत

गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात शाळा सुरूच झालेल्या नाहीत. त्यामुळे गतवर्षी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेले ३६ हजार ५६१ विद्यार्थी शासनाच्या धोरणामुळे थेट दुसरीत गेले आहेत. या विद्यार्थ्यांनी शाळेने तोंडही पाहिलेले नाही. शाळेत शिक्षक कोण आहेत? याचीही त्यांना माहिती नाही. तरीही एकही दिवस शाळेत न जाता हे विद्यार्थी दुसरीच्या वर्गा गेले आहेत. आता दुसरीचे वर्गही कधी सुरू होतील, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक असले तरी त्यांना नाइलाजाने घरातच बसावे लागत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्यांना विविध खेळ खेळण्यावरही बंधने आली आहेत. परिणामी घरात बसून ही मुले कंटाळली आहेत.

विद्यार्थी, शिक्षक, पालक म्हणतात...

कोराेनाचा वाढता प्रादुर्भाव व दुसऱ्या आणि संभाव्य तिसऱ्या लाटांच्या अनुषंगाने शिक्षकांकडे सोपविलेली कोरोनासंदर्भातील कामे पाहता प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यास ऑक्टोबर महिना उजाडू शकतो.

- आबासाहेब लोंढे, शिक्षक

कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता मुलांचे संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय मुलांना शाळेत पाठवण्याचा धोका शासनाने पत्करू नये. यासाठी राज्यभरातील मुलांच्या लसीकरणाचे नियोजन शासनाने लवकर करावे.

- दादाराव काळे, पालक

आत्ता दुसऱ्या वर्षी शाळा सुरू होण्याची वाट पाहत आहोत; परंतु आईवडील म्हणतात, कोरोना संपल्यावरच शाळा सुरू होणार आहे; परंतु कोरोना कधी संपणार हे सांगत नसल्याने चिंता वाटत आहे. सारखे घरी बसून कंटाळा येत आहे.

- अर्जुन बेंद्रे,

विद्यार्थी

शिक्षणाधिकारी म्हणतात...

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच शासनाने शाळा बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना आटोक्यात आल्याशिवाय पुन्हा शाळा सुरू होणे कठीण आहे. शाळा, विद्यार्थी, शिक्षक हा आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. शाळा बंद असल्याने आम्हीही अस्वस्थ झालो आहोत; परंतु कोरोनामुळे आमचाही नाइलाज आहे. शासन आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.

-डॉ. सुचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, परभणी