शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

निम्न दुधनेच्या दोन्ही कालव्यात पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:47 IST

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील मूग, सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील ...

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील मूग, सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवर आहेत. निम्न दुधना प्रकल्पात शंभर टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दोन्ही कालव्याव्दारे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, जानेवारीत पहिल्या आठवड्यात आणि फेब्रुवारी महिन्यातही पहिल्या आठवड्यात अशा तीन पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा ४८ किमी तर डावा कालव्या ६९ किमी आहे. दोन्ही कालव्या पाणी सोडले तर सेलू, मानवत, परभणी आणि जिंतूर तालुक्यातील कालवा लाभ क्षेत्रातील सुमारे १३ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी मिळू शकणार आहे.

दोन्ही कालव्याची अनेक ठिकाणी तुटफूट झाली आहे. तसेच गाळ साचून कालव्यात झुडपे वाढले आहेत. कालव्यात पाणी सोडले असले तरी टेलपर्यंत पाणी जाण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याला अथळ्याची शर्यत करून टेलपर्यंत पोहचावे लागणार आहे. दरम्यान, टेलपर्यंत पाणी पोहण्यासाठी ४ ते ५ दिवस लागणार असल्याचे प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.

विजेची समस्या

दुधना प्रकल्पातून रब्बी हंगामातील पिकांना कालव्याद्वारे पाणी मिळाले तरी ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या आहे. तुटलेल्या तारा, रोहित्रात जळण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे कमी दबाने वीज पुरवठा होतो. तर अनेक वेळा फ्युज उडतात. पाणी सोडल्यानंतर चांगल्या दाबाने आणि सुरळीत वीज पुरवठा होणे गरजेचे आहे.