शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

निम्न दुधनेच्या दोन्ही कालव्यात पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:47 IST

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील मूग, सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील ...

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील मूग, सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवर आहेत. निम्न दुधना प्रकल्पात शंभर टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दोन्ही कालव्याव्दारे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, जानेवारीत पहिल्या आठवड्यात आणि फेब्रुवारी महिन्यातही पहिल्या आठवड्यात अशा तीन पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा ४८ किमी तर डावा कालव्या ६९ किमी आहे. दोन्ही कालव्या पाणी सोडले तर सेलू, मानवत, परभणी आणि जिंतूर तालुक्यातील कालवा लाभ क्षेत्रातील सुमारे १३ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी मिळू शकणार आहे.

दोन्ही कालव्याची अनेक ठिकाणी तुटफूट झाली आहे. तसेच गाळ साचून कालव्यात झुडपे वाढले आहेत. कालव्यात पाणी सोडले असले तरी टेलपर्यंत पाणी जाण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याला अथळ्याची शर्यत करून टेलपर्यंत पोहचावे लागणार आहे. दरम्यान, टेलपर्यंत पाणी पोहण्यासाठी ४ ते ५ दिवस लागणार असल्याचे प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.

विजेची समस्या

दुधना प्रकल्पातून रब्बी हंगामातील पिकांना कालव्याद्वारे पाणी मिळाले तरी ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या आहे. तुटलेल्या तारा, रोहित्रात जळण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे कमी दबाने वीज पुरवठा होतो. तर अनेक वेळा फ्युज उडतात. पाणी सोडल्यानंतर चांगल्या दाबाने आणि सुरळीत वीज पुरवठा होणे गरजेचे आहे.