शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

निम्न दुधनेच्या दोन्ही कालव्यात पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:47 IST

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील मूग, सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील ...

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील मूग, सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवर आहेत. निम्न दुधना प्रकल्पात शंभर टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दोन्ही कालव्याव्दारे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, जानेवारीत पहिल्या आठवड्यात आणि फेब्रुवारी महिन्यातही पहिल्या आठवड्यात अशा तीन पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा ४८ किमी तर डावा कालव्या ६९ किमी आहे. दोन्ही कालव्या पाणी सोडले तर सेलू, मानवत, परभणी आणि जिंतूर तालुक्यातील कालवा लाभ क्षेत्रातील सुमारे १३ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी मिळू शकणार आहे.

दोन्ही कालव्याची अनेक ठिकाणी तुटफूट झाली आहे. तसेच गाळ साचून कालव्यात झुडपे वाढले आहेत. कालव्यात पाणी सोडले असले तरी टेलपर्यंत पाणी जाण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याला अथळ्याची शर्यत करून टेलपर्यंत पोहचावे लागणार आहे. दरम्यान, टेलपर्यंत पाणी पोहण्यासाठी ४ ते ५ दिवस लागणार असल्याचे प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.

विजेची समस्या

दुधना प्रकल्पातून रब्बी हंगामातील पिकांना कालव्याद्वारे पाणी मिळाले तरी ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या आहे. तुटलेल्या तारा, रोहित्रात जळण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे कमी दबाने वीज पुरवठा होतो. तर अनेक वेळा फ्युज उडतात. पाणी सोडल्यानंतर चांगल्या दाबाने आणि सुरळीत वीज पुरवठा होणे गरजेचे आहे.