शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:13 IST

शहरात वाढला धुळीचा त्रास परभणी : शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास वाढला आहे. प्रत्येक रस्त्यावर धुळीचे लोट उडत असून ...

शहरात वाढला

धुळीचा त्रास

परभणी : शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास वाढला आहे. प्रत्येक रस्त्यावर धुळीचे लोट उडत असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांतील माती वातावरणात मिसळून धूळ वाढत आहे.

पार्किंग सुविधेचा स्थानकावर बोजवारा

परभणी : येथील बसस्थानकात नवीन बसपोर्टचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यायी आणि अपुऱ्या जागेत बसगाड्या उभ्या केल्या आहेत. नातेवाइकांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना वाहने उभी करण्यासाठी या भागात पार्किंगची सुविधा नसल्याने अस्तव्यस्त वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे बसचालकांना या वाहनांचा अडथळा सहन करावा लागत आहे.

चारही बाजूंचे रस्ते उखडल्याने तारांबळ

परभणी : शहरात येण्यासाठी चारही बाजूंच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन रस्ता निर्मितीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर, परभणी- वसमत आणि परभणी- पाथरी या चारही मार्गांवर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करून वाहतूक योग्य रस्ते निर्माण करावेत, अशी मागणी होत आहे.

विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

परभणी : ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या रबी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत असून या पिकांना पाणी देणे गरजेचे असताना वीजपुरवठा गायब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. महावितरण कंपनीने ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

एकाच खिडकीमुळे प्रवाशांची गैरसोय

परभणी : येथील रेल्वेस्थानकावर एकच तिकीट खिडकी सुरू ठेवली आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने गाड्यांची संख्या वाढविल्याने प्रवासी मोठ्या संख्येने तिकीट काढण्यासाठी स्थानकावर येत आहेत. मात्र, तिकीट खिडकी एकच असल्याने प्रवाशांना रांग लावून तिकीट काढावे लागत आहे. स्थानकावरील तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

पोलीस चौक्यांना अवकळा

परभणी : शहरातील पोलीस चौक्यांची दुरवस्था झाली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ठाण्यापासून दूर अंतरावर असलेल्या ठिकाणी चौकीची उभारणी करण्यात आली होती. शहरातील विसावा पोलीस चौकीवगळता इतर पोलीस चौक्यांमध्ये कर्मचारी थांबत नाहीत. त्यामुळे चौक्यांची दुरवस्था झाली आहे. उड्डाणपूूल परिसर, जुना मोंढा, बसस्थानक या भागातील पोलीस चौकी पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.