शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:13 IST

शहरात वाढला धुळीचा त्रास परभणी : शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास वाढला आहे. प्रत्येक रस्त्यावर धुळीचे लोट उडत असून ...

शहरात वाढला

धुळीचा त्रास

परभणी : शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास वाढला आहे. प्रत्येक रस्त्यावर धुळीचे लोट उडत असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांतील माती वातावरणात मिसळून धूळ वाढत आहे.

पार्किंग सुविधेचा स्थानकावर बोजवारा

परभणी : येथील बसस्थानकात नवीन बसपोर्टचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यायी आणि अपुऱ्या जागेत बसगाड्या उभ्या केल्या आहेत. नातेवाइकांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना वाहने उभी करण्यासाठी या भागात पार्किंगची सुविधा नसल्याने अस्तव्यस्त वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे बसचालकांना या वाहनांचा अडथळा सहन करावा लागत आहे.

चारही बाजूंचे रस्ते उखडल्याने तारांबळ

परभणी : शहरात येण्यासाठी चारही बाजूंच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन रस्ता निर्मितीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर, परभणी- वसमत आणि परभणी- पाथरी या चारही मार्गांवर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करून वाहतूक योग्य रस्ते निर्माण करावेत, अशी मागणी होत आहे.

विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

परभणी : ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या रबी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत असून या पिकांना पाणी देणे गरजेचे असताना वीजपुरवठा गायब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. महावितरण कंपनीने ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

एकाच खिडकीमुळे प्रवाशांची गैरसोय

परभणी : येथील रेल्वेस्थानकावर एकच तिकीट खिडकी सुरू ठेवली आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने गाड्यांची संख्या वाढविल्याने प्रवासी मोठ्या संख्येने तिकीट काढण्यासाठी स्थानकावर येत आहेत. मात्र, तिकीट खिडकी एकच असल्याने प्रवाशांना रांग लावून तिकीट काढावे लागत आहे. स्थानकावरील तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

पोलीस चौक्यांना अवकळा

परभणी : शहरातील पोलीस चौक्यांची दुरवस्था झाली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ठाण्यापासून दूर अंतरावर असलेल्या ठिकाणी चौकीची उभारणी करण्यात आली होती. शहरातील विसावा पोलीस चौकीवगळता इतर पोलीस चौक्यांमध्ये कर्मचारी थांबत नाहीत. त्यामुळे चौक्यांची दुरवस्था झाली आहे. उड्डाणपूूल परिसर, जुना मोंढा, बसस्थानक या भागातील पोलीस चौकी पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.