शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

वेळा न ठरविताच होतोय पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST

परभणी : मनपाच्या वतीने नळाद्वारे अवेळी पाणीपुरवठा केला जात असून, अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. ठरलेल्या वेळाने ...

परभणी : मनपाच्या वतीने नळाद्वारे अवेळी पाणीपुरवठा केला जात असून, अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. ठरलेल्या वेळाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षभरापूर्वी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून आता शहरातील सर्वच भागांत पाणीपुरवठा होत आहे. मात्र, पाणी वितरणाचे नियोजन अद्यापही योग्य पद्धतीने केले जात नाही. त्यामुळे पाणी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला येईल, याचा नेम नाही. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करीत थांबावे लागत आहे. अनेक वेळा तर पाणी येऊन गेलेलेही अनेकांना लक्षात येत नाही. महापालिकेने पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन केलेले नाही. कोणत्या प्रभागात कधी पाणी सोडायचे, याचे नियोजन नसल्याने नागरिकांनाच पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक वेळा तर रात्री-अपरात्री नळांना पाणी सोडले जाते, त्यामुळे पाण्यासाठी रात्रही जागून काढावी लागते.

सध्या शहराला येलदरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. शहरवासीयांसाठी मुबलक प्रमाणात पाणीही उपलब्ध आहे. असे असताना केवळ नियोजन नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तेव्हा मनपाने पाणी वितरणाचे नियोजन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

आठ दिवसांतून एक वेळा पाणी

नवी योजना कार्यान्वित होण्यापूर्वी १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे नवीन योजना कार्यान्वित झाल्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल, अशी शहरवासीयांची अपेक्षा होती. मात्र, भर पावसाळ्यातही नागरिकांना आठ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची उपलब्धता असताना आणि नवीन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली असतानाही नागरिकांना मात्र पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.