शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी : राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम कोषाच्या उत्पादनावर आधारित प्रतिक्विंटल ५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पाथरी : राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम कोषाच्या उत्पादनावर आधारित प्रतिक्विंटल ५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, जिल्ह्यातील १ हजार रेशीम उत्पादक शेतकऱ्यांपैकी एकाही शेतकऱ्याला अद्याप या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणे अपेक्षित आहे.

राज्यात मागील काही वर्षात रेशीम कोषाचे उत्पादन वाढावे, यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. शासनाने तुती लागवड मनरेगा योजनेंतर्गत सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक कोषाचे उत्पादन मराठवाडा विभागात केले जाते. परभणी जिल्ह्यात तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास १ हजारांच्या घरात आहे. शेतकऱ्यांना या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यात संबंधित यंत्रणेला यश आलेले नाही. मराठवाडा विभागात जालना आणि पूर्णा या दोन ठिकाणी राज्य शासनाने शासकीय खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने रेशीम उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादनावर आधारित प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय दिनांक १३ जुलै २०२० रोजी घेतला. याचा शेतकऱ्यांना भविष्यात अधिक लाभ मिळणार आहे. मात्र, जिल्ह्यातील १ हजार रेशीम उत्पादक शेतकऱ्यांपैकी एकाही शेतकऱ्याला अद्याप या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.

शासकीय केंद्रावर १०० क्विंटलपेक्षा अधिक खरेदी

परभणी जिल्ह्यात जवळपास १ हजार शेतकरी रेशीमचे उत्पादन घेतात. यावर्षी लॉकडाऊनच्या काळातही शेतकऱ्यांनी ६७ टन म्हणजेच ६७० क्विंटल रेशीम उत्पादन केले आहे. शासकीय खरेदी केंद्रावर विक्री झालेल्या रेशीम कोषाला शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. पूर्णा आणि जालना येथील शासकीय खरेदी केंद्रावर १०० क्विंटलपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रेशीम कोषाची विक्री केली आहे. हे शेतकरी अनुदानासाठी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना जवळपास ५० लाखांपर्यंत अनुदान मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अद्यापही संबंधित यंत्रणेने लक्ष दिलेले नाही.

शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून रेशीम कार्यालयाने प्रस्ताव मागवले आहेत. आतापर्यंत केवळ ७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. अंडीपुंज खरेदी पावती, रेशीम कोष विक्री पावती, बँकेचे स्टेटमेंटसोबत शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल करावेत.

जी. आर. कदम, रेशीम विकास अधिकारी

सातबारावर नोंद आवश्यक

अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तुती लागवडीची आपल्या सातबारा उताऱ्यात नोंद करुन घेणे आवश्यक आहे.