शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गावपातळीवरील पुढाऱ्यांनी स्वबळावर लढविला किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:18 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जीव तोडून काम केलेल्या कामाची पावती आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीत मदत म्हणून मिळेल, या आशेवर तालुक्यातील ४१ ...

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जीव तोडून काम केलेल्या कामाची पावती आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीत मदत म्हणून मिळेल, या आशेवर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांच्या गावपातळीवरील पुढाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीसाठी पॅनेल करण्यापासून अर्ज दाखल करणे, उमेदवारी अर्ज अवैध ठरण्यापर्यंत या पुढाऱ्यांनी स्वबळावर तयारी केली. निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर आपल्या पक्षाच्या नेत्यांची मदत होईल, असे सर्व पक्षांच्या पॅनेलप्रमुखांना वाटू लागले. मात्र ग्रामपंचायत निवडणूक जशी जशी रंगात येऊ लागली, तशी तशी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीतून अंग काढून घ्यायला सुरुवात केली. परिणामी गावपातळीवरील खासदार समर्थकांसह आजी-माजी आमदार समर्थकांवर निवडणुकीचा किल्ला स्वबळावर लढविण्याची वेळ आली. काही ठिकाणी या समर्थकांना दारुण पराभव स्वीकारावा लागला, तर काही ठिकाणी कसाबसा आपला गड राखला गेला. पाथरी मतदार संघाचे आ. सुरेश वरपूडकर यांच्या काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश संपादन करता आले नाही. खा. संजय जाधव यांनीही या ग्रामपंचायत निवडणुकीकडे कानाडोळा केल्याने शिवसेनेलाही अपेक्षित यश मिळवता आले नाही. भाजपचे माजी आ. मोहन फड हे तर निवडणूक जाहीर झाल्यापासून या निवडणुकीपासून दूर असल्याचे चित्र दिसून आले. परिणामी फड यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा फायदा त्यांना उठवता आला नाही. परिणामी त्यांनाही या निवडणुकीत चमक दाखवता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. बाबाजानी दुर्राणी हेही आपल्या पाथरी होमपीचवर व्यस्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पुढारी बॅकफूटवर आल्याचे चित्र होते. खासदार व आजी-माजी आमदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत हात आखडता घेतल्याने त्याचा परिणाम निकालावर दिसून आला. आपल्या नेत्याच्या निवडणुकीत जिवाचे रान करणाऱ्या गाव या पुढाऱ्यांना आयत्यावेळी नेत्यांची ताकद न मिळाल्याने पराभव स्वीकारावा लागला. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाला व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही या निवडणुकीत आपला करिश्मा दाखवता आला नाही. यामुळे या पक्षाच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.