शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

गावपातळीवरील पुढाऱ्यांनी स्वबळावर लढविला किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:18 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जीव तोडून काम केलेल्या कामाची पावती आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीत मदत म्हणून मिळेल, या आशेवर तालुक्यातील ४१ ...

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जीव तोडून काम केलेल्या कामाची पावती आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीत मदत म्हणून मिळेल, या आशेवर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांच्या गावपातळीवरील पुढाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीसाठी पॅनेल करण्यापासून अर्ज दाखल करणे, उमेदवारी अर्ज अवैध ठरण्यापर्यंत या पुढाऱ्यांनी स्वबळावर तयारी केली. निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर आपल्या पक्षाच्या नेत्यांची मदत होईल, असे सर्व पक्षांच्या पॅनेलप्रमुखांना वाटू लागले. मात्र ग्रामपंचायत निवडणूक जशी जशी रंगात येऊ लागली, तशी तशी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीतून अंग काढून घ्यायला सुरुवात केली. परिणामी गावपातळीवरील खासदार समर्थकांसह आजी-माजी आमदार समर्थकांवर निवडणुकीचा किल्ला स्वबळावर लढविण्याची वेळ आली. काही ठिकाणी या समर्थकांना दारुण पराभव स्वीकारावा लागला, तर काही ठिकाणी कसाबसा आपला गड राखला गेला. पाथरी मतदार संघाचे आ. सुरेश वरपूडकर यांच्या काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश संपादन करता आले नाही. खा. संजय जाधव यांनीही या ग्रामपंचायत निवडणुकीकडे कानाडोळा केल्याने शिवसेनेलाही अपेक्षित यश मिळवता आले नाही. भाजपचे माजी आ. मोहन फड हे तर निवडणूक जाहीर झाल्यापासून या निवडणुकीपासून दूर असल्याचे चित्र दिसून आले. परिणामी फड यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा फायदा त्यांना उठवता आला नाही. परिणामी त्यांनाही या निवडणुकीत चमक दाखवता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. बाबाजानी दुर्राणी हेही आपल्या पाथरी होमपीचवर व्यस्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पुढारी बॅकफूटवर आल्याचे चित्र होते. खासदार व आजी-माजी आमदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत हात आखडता घेतल्याने त्याचा परिणाम निकालावर दिसून आला. आपल्या नेत्याच्या निवडणुकीत जिवाचे रान करणाऱ्या गाव या पुढाऱ्यांना आयत्यावेळी नेत्यांची ताकद न मिळाल्याने पराभव स्वीकारावा लागला. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाला व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही या निवडणुकीत आपला करिश्मा दाखवता आला नाही. यामुळे या पक्षाच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.