शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्कूलबस मधून विकला जातोय भाजीपाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:12 IST

परभणी : मागील वर्षीच्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस चालक- मालकांची वाहने जागेवरच ...

परभणी : मागील वर्षीच्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस चालक- मालकांची वाहने जागेवरच उभी असून, या वाहनातून आता भाजीपाला, कपड्यांची विक्री केली जात आहे.

शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करुन अनेकांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगार निवडला होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूलबस वाहनचालकांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. वाहने जागेवरच उभी राहून असल्याने काही वाहन मालकांनी आता या वाहनांचा वापर भाजी विक्री आणि कापड विक्रीसाठी सुरू केला आहे. तर काहींनी आपले वाहन चक्क विक्री केले आहे. एकंदर स्कूल वाहन चालक सद्यस्थितीला आर्थिक अडचणीत आहेत.

रोजगार उपलब्ध होईल या उद्देशाने कर्ज काढून वाहन खरेदी केेले. सुरुवातीचे काही वर्ष बऱ्यापैकी व्यवसाय झाला. मात्र आता तो ठप्प आहे. त्यामुळे वाहनाच्या कर्जाचे हप्ते थकले असून, ते कसे फेडावे याची चिंता आहे.

- संतोष ठाकूर

कर्ज काढून वाहनाची खरेदी केली होती. विद्यार्थ्यांची ने-आण करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला जात होता. मात्र दोन वर्षांपासून हा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

- अरुण चंद्रे

शाळा बंद असल्याने वाहन घरासमोरच उभे रहात आहे. या वाहनाचा वापर व्हावा व उत्पन्न मिळावे या उद्देशाने आता ते भाजी विक्रीसाठी वापरत आहे. जुना पेडगाव रोड भागात वाहनातून भाजी आणून विक्री करतो.

- आसीम खान

शाळा बंद असल्याने रोजगार बुडाल्याने आता नवीन व्यवसाय सुरू केला आहे. शहरात मिळेल त्या ठिकाणी थांबून बेडशीट व इतर कपडे विक्री करुन कुटुंबाची गुजराण करीत आहे. त्यासाठी स्कूल वाहनाचा वापर केला.

- सय्यद बशीर

स्कूलबस बंद असल्याने आता या बसचा वापर बेडशीट आणि इतर कपड्यांच्या विक्रीसाठी केला जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर व्यवसाय सुरू केला आहे.

भाजी विक्रीसाठीही वाहनांचा वापर करुन कसेबसे उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जुना पेडगाव रोड भागात भाजी विक्रीसाठी हे वाहन वापरले जाते.

शासनानेही सोडले वाऱ्यावर

परभणी शहरात सुमारे ३०० पेक्षा अधिक स्कूलबस चालक आहेत. विद्यार्थ्यांची ने-आण करुन कुटुंबाची आर्थिक गुजराण केली जात होती. मात्र कोरोना संसर्गामुळे शाळा बंद पडल्या आणि मागच्या दोन वर्षांपासून वाहने घरासमोरच उभी आहेत. शासनाने इतर घटकांना मदतीचा हात दिला. मात्र स्कूलबस वाहन चालकांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे वाहन चालकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.