शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:49 IST

अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जिल्ह्यात अवकाळी पावसाने रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर या नुकसानीचा आढावा घेवून या संदर्भातील ...

अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्ह्यात अवकाळी पावसाने रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर या नुकसानीचा आढावा घेवून या संदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा प्राथमिक अहवाल आल्यानंतर तो राज्य शासनाकडे सादर केला जाईल, असे मुगळीकर यांनी सांगितले.

शेकडो हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज

जिल्ह्यात रबी हंगामात २ लाख २८ हजार ७९६ हेक्टर जमिनीवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये ९८ हजार ७७३ हेक्टरवर ज्वारी तर ३९ हजार १४ हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे.तसेच १ लाख १८ हजार ७१६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या तिन्ही पिकांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या प्राथमिक अहवालानुसार सेलू तालुक्यातील हातनूर, रोहिना आदी परिरसरात जवळपास २५० ते ३०० हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या नुकसानीची माहिती मागविण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.