शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:49 IST

अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जिल्ह्यात अवकाळी पावसाने रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर या नुकसानीचा आढावा घेवून या संदर्भातील ...

अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्ह्यात अवकाळी पावसाने रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर या नुकसानीचा आढावा घेवून या संदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा प्राथमिक अहवाल आल्यानंतर तो राज्य शासनाकडे सादर केला जाईल, असे मुगळीकर यांनी सांगितले.

शेकडो हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज

जिल्ह्यात रबी हंगामात २ लाख २८ हजार ७९६ हेक्टर जमिनीवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये ९८ हजार ७७३ हेक्टरवर ज्वारी तर ३९ हजार १४ हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे.तसेच १ लाख १८ हजार ७१६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या तिन्ही पिकांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या प्राथमिक अहवालानुसार सेलू तालुक्यातील हातनूर, रोहिना आदी परिरसरात जवळपास २५० ते ३०० हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या नुकसानीची माहिती मागविण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.