शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

कर्मचाºयाकडून मागविला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:45 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी गेलेल्या दात्याचे रक्तदान करून न घेतल्या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाºयाकडून प्रशासनाने खुलासा मागविला आहे़ ‘लोकमत’ने हे प्रकरण समोर आणल्यानंतर आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी गेलेल्या दात्याचे रक्तदान करून न घेतल्या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाºयाकडून प्रशासनाने खुलासा मागविला आहे़ ‘लोकमत’ने हे प्रकरण समोर आणल्यानंतर आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे़येथील डॉ़ पवन चांडक हे १३ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्या मित्रासमवेत रक्तदान करण्यासाठी गेले होते़ विशेष म्हणजे स्वइच्छेने रक्तदान करण्याची त्यांनी तयारी केली होती़ डॉ़ पवन चांडक रक्तपेढीमध्ये गेल्यानंतर तेथील कर्मचाºयाने रक्तदान करून घेण्यास टाळाटाळ केली़ या प्रकारानंतर डॉ़ चांडक यांनी आपले सरकार पोर्टलवर स्वत:चे अनुभव कथन केले़ डॉ़ चांडक यांच्या या तक्रारीची दखल घेत आपले सरकार पोर्टलवरून संबंधितांकडून या प्रकरणी खुलासा मागविला होता़ जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा प्रकार समोर आल्यानंतर ‘लोकमत’ने १७ आॅक्टोबरच्या अंकात ‘प्रति जैविक औषधींचा तुटवडा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले़त्यात डॉ़ चांडक यांना रक्तदान करण्यासाठी आलेल्या अडचणीही मांडल्या होत्या़ या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने कर्मचाºयाकडून या विषयीचा खुलासा मागविला आहे़ त्यामुळे या कर्मचाºयाविरूद्ध प्रशासन आता काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़रक्ताचा तुटवडा असतानाही उदासिनताजिल्हा सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे़ दररोज हजारो रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात़ अशा वेळी रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये पुरेसा रक्तसाठा असणे आवश्यक आहे़ रक्तपेढीच्या वतीने वेळोवेळी निवेदने काढून जिल्हा रुग्णालयात रक्तसाठा कमी असल्याचे सांगत रक्तदात्यांना आवाहन केले जाते़ मात्र स्वच्छेने येणाºया रक्तदात्यांनाच योग्य वागणूक मिळत नसल्याचे दिसून आले आहे़ डॉ़ पवन चांडक हे दरवर्षी जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून गरजू रुग्णांसाठी रक्तदान करतात़ आतापर्यंत त्यांनी २२ वेळा रक्तदान केले आहे़ रक्तपेढीत रक्ताचा साठा उपलब्ध नसताना येणाºया प्रत्येक रक्तदात्याला अस्थेवाईक वागणूक देणे आवश्यक होते़ मात्र स्वत:हून दाते रुग्णालयात येवून रक्तदान करण्यास तयार असताना त्यांचे रक्तदान होत नसेल तर रुग्णालयातील रक्तसाठ्यात वाढ होणार कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे़ तसेच रक्तही अत्यावश्यक बाब असून, रक्तसाठा वाढविण्यासाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे़ मात्र केवळ उदासिन भूमिकेमुळे जिल्हा रुग्णालयातील रक्तसाठ्यात वाढ होत नसल्याचे दिसत आहे़