शहरं
Join us  
Trending Stories
1
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
6
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
7
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
8
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
9
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
10
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
11
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
12
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
13
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
14
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
15
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
16
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
17
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
18
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा

संत जनाबाई महाविद्यालयाला अघोषित सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गंगाखेड : तालुक्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी तालुका प्रशासनाने शहरातील संत जनाबाई् कनिष्ठ महाविद्यालयाचा ताबा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गंगाखेड : तालुक्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी तालुका प्रशासनाने शहरातील संत जनाबाई् कनिष्ठ महाविद्यालयाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अघोषित सुटी देण्यात आली आहे. यामुुळे महाविद्यालयातील नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे.

गंगाखेड तालुक्यात ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या संदर्भातील कामकाज तहसील कार्यालयातून होणे अपेक्षित असताना या कार्यालयाने शहरातील संत जनाबाई कनिष्ठ महाविद्यालयातील ७ कक्ष व एका सांस्कृतिक सभागृहाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे येथील अकरावी व बारावीचे कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांचे वर्ग दिनांक २३ डिसेंबरपासून बंद करण्यात आले आहेत. हे वर्ग कधी सुरु होतील, हे निश्चित नाही. त्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. कोरोनामुळे सहा महिने उशिराने शैक्षणिक वर्ष सुरु झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. हे नुकसान भरुन काढण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात शासनाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षणासाठी येत होते; परंतु, आता निवडणूक विभागानेच या महाविद्यालयातील प्रमुख कक्षांचा ताबा घेतल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नाईलाजाने घरी बसावे लागत आहे. जवळपास २८ दिवस ही निवडणूक प्रक्रिया चालणार आहे.

त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्ग सुरु होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तहसील प्रशासनाने यासाठी एखादे मंगल कार्यालय घेतले असते तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झाला नसता. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या संदर्भात प्राचार्य एम. बी. धूत म्हणाले की, तहसीलदारांनी उपयुक्त कामांसाठी सभागृह व कक्षाची मागणी केल्यास सदरील कक्ष व सभागृह देणे क्रमप्राप्त ठरते.

तालुक्यातील रुमणा व ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने ऑनलाईन शिक्षणात अडथळा येत आहे. शिवाय आपल्याकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत नाही. नियमित वर्ग झाले असते तर शैक्षणिक नुकसान टळले असते. तहसीलदारांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाकडे दुर्लक्ष केले आहे. - आकांक्षा कांबळे, विद्यार्थिनी