शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

संत जनाबाई महाविद्यालयाला अघोषित सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गंगाखेड : तालुक्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी तालुका प्रशासनाने शहरातील संत जनाबाई् कनिष्ठ महाविद्यालयाचा ताबा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गंगाखेड : तालुक्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी तालुका प्रशासनाने शहरातील संत जनाबाई् कनिष्ठ महाविद्यालयाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अघोषित सुटी देण्यात आली आहे. यामुुळे महाविद्यालयातील नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे.

गंगाखेड तालुक्यात ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या संदर्भातील कामकाज तहसील कार्यालयातून होणे अपेक्षित असताना या कार्यालयाने शहरातील संत जनाबाई कनिष्ठ महाविद्यालयातील ७ कक्ष व एका सांस्कृतिक सभागृहाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे येथील अकरावी व बारावीचे कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांचे वर्ग दिनांक २३ डिसेंबरपासून बंद करण्यात आले आहेत. हे वर्ग कधी सुरु होतील, हे निश्चित नाही. त्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. कोरोनामुळे सहा महिने उशिराने शैक्षणिक वर्ष सुरु झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. हे नुकसान भरुन काढण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात शासनाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षणासाठी येत होते; परंतु, आता निवडणूक विभागानेच या महाविद्यालयातील प्रमुख कक्षांचा ताबा घेतल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नाईलाजाने घरी बसावे लागत आहे. जवळपास २८ दिवस ही निवडणूक प्रक्रिया चालणार आहे.

त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्ग सुरु होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तहसील प्रशासनाने यासाठी एखादे मंगल कार्यालय घेतले असते तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झाला नसता. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या संदर्भात प्राचार्य एम. बी. धूत म्हणाले की, तहसीलदारांनी उपयुक्त कामांसाठी सभागृह व कक्षाची मागणी केल्यास सदरील कक्ष व सभागृह देणे क्रमप्राप्त ठरते.

तालुक्यातील रुमणा व ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने ऑनलाईन शिक्षणात अडथळा येत आहे. शिवाय आपल्याकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत नाही. नियमित वर्ग झाले असते तर शैक्षणिक नुकसान टळले असते. तहसीलदारांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाकडे दुर्लक्ष केले आहे. - आकांक्षा कांबळे, विद्यार्थिनी