शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

परभणी शहरात वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:41 IST

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक व पार्किंगच्या समस्येमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना ही वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेले या शाखेचे पोलीस कर्मचारी ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणाहून गायब असल्याची स्थिती शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली. पाहणी केलेल्या १८ पैकी चारच ठिकाणी वाहतूक पोलीस दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक व पार्किंगच्या समस्येमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना ही वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेले या शाखेचे पोलीस कर्मचारी ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणाहून गायब असल्याची स्थिती शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली. पाहणी केलेल्या १८ पैकी चारच ठिकाणी वाहतूक पोलीस दिसून आले.शहरातील बाजारपेठ भागासह बसस्थानक, रेल्वेस्थानक, नारायणचाळ आदी भागात वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होत आहे. शहरातील रस्ते जुने असून एकेरी वाहतुकीचे हे रस्ते आहेत. या रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहतूक होते. शिवाय वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी केली जातात. परिणामी शहरातील रस्त्यांवरुन वाहने चालविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. शहरातील नारायण चाळ परिसरात गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास वाहतूक ठप्प झाली. चारही बाजुंच्या वाहनांमध्ये रुग्णवाहिका अडकून पडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. तब्बल २० मिनिटे रुग्णवाहिका वाहनाच्या गराड्यात अडकून पडली. त्यानंतर काही नागरिक व वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी ही वाहतूक सुरळीत करुन रुग्णवाहिकेला रस्ता उपलब्ध करुन दिला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘लोकमत’ने दोन पथकांमार्फत शहरातील वर्दळीच्या १८ ठिकाणची पाहणी केली. परंतु, या पाहणीमध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, बसस्थानक, शिवाजी चौक या चारच ठिकाणी वाहतूक पोलीस आढळून आले. शहरातील वसमतरोडवरील वसंतराव नाईक पुतळा परिसरात दुपारी १२.४८ वाजता भेट दिली तेव्हा एकही वाहतूक पोलीस कर्मचारी दिसून आला नाही. त्यामुळे चारही बाजुंनी येणारे वाहनधारक आपल्या सोयीनुसार मार्ग काढत वाहन चालविताना दिसून आले. १२.५८ वाजता विद्यापीठ गेट समोरील काळी कमान परिसरात भेट दिली असता तेथेही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. तर वाहनधारक आपल्या सोयीनुसार वळण घेत होत होते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी दिसून आली. १.०५ वाजेच्या सुमारास खानापूर फाटा येथे भेट दिली असता या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी दिसला नाही.दुसºया पथकाने दुपारी १ वाजता शिवाजी चौकात पाहणी केली असता वाहतूक शाखेचे एक पुरुष व एक महिला कर्मचारी विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांवर कारवाई करताना दिसून आले. त्यानंतर १.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व १.१६ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या परिसरात भेट दिली तेव्हा या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी आढळून आले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात मागील काही दिवसांपासून चांगलीच वाहनांची वर्दळ होत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी तरी वाहतूक शाखेचे कर्मचारी असतील, अशी अपेक्षा होती. परंतु, तेथे १.२५ वाजता भेट दिली असता कोणीही दिसून आले नाही. त्यामुळे वाहनधारक आपल्या मनाला वाटेल तशी वाहने चालवितांना दिसून आले. त्यानंतर १.२६ वाजता बसस्थानकासमोर एक वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असताना दिसून आला. त्यानंतर १.३० वाजता उड्डाणपूल, १.३५ वाजता जांब नाका, १.४० वाजता रायगड कॉर्नर, १.४२ वाजता गणपती चौक, १.४५ विसावा कॉर्नर, १.५५ वाजता गांधी पार्क, २ वाजता नानलपेठ २.१५ वाजता नारायण चाळ, २.३० डॉक्टर लेन परिसरात वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी आढळून आला नसल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असणे आवश्यक असतानाही ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत १८ पैकी केवळ चारच ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी दिसून आले.