शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:41 IST

कार्यालयाच्या परिसरात वाढली अस्वच्छता परभणी : येथील प्रशासकीय इमारत भागातील कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली आहे. जागोजागी धूळ ...

कार्यालयाच्या परिसरात वाढली अस्वच्छता

परभणी : येथील प्रशासकीय इमारत भागातील कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली आहे. जागोजागी धूळ झाली असून, प्रत्येक कोपऱ्यात गुटखा, पान खाऊन थुंकल्याने हे कोपरे रंगलेले आहेत. या भागात नियमित स्वच्छता केली जात नसल्याने अस्वच्छता वाढली आहे. गुटखा, पान खाऊन थुंकणाऱ्या नागरिकांवरही कारवाई होत नाही. परिणामी हा प्रकार बळावला आहे.

स्टेडियम भागातील खड्डा धोकादायक

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात नालीवरील ढापा गायब झाल्याने हा खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक झाला आहे. स्टेडियमच्या प्रवेशद्वारावरच नालीवरील ढापा गायब झाला आहे. त्यामुळे खड्ड्यात अडकून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

पीकविम्याच्या तक्रारींवर कारवाई कधी?

परभणी : जिल्ह्यात पीकविम्याच्या तक्रारींवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याने विमा कंपनीच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी नुकसानीसंदर्भात ऑफलाइन तक्रार नोंदविली आहे. मात्र कंपनीने त्याची दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे,

‘मुख्यमंत्री ग्रामसडक’ची रखडली कामे

परभणी : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक भागात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याची कामे सुरू केली. मात्र मध्यंतरी कोरोनाच्या संकटामुळे ही कामे ठप्प झाली. आता या कामांसाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने रखडलेली कामे अद्यापही सुरू केली नाहीत.

अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करा

परभणी : शहरात सार्वजनिक जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. सुरुवातीला किरकोळ अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी आता त्याचे पक्क्या स्वरुपात बांधकाम केले आहे. मात्र मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने अतिक्रमणधारकांचे फावते आहे. तेव्हा शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग

परभणी : ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारासाठीचा कालावधी संपत आल्याने प्रचाराला वेग आला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला असून, गावात जागोजागी होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रचारासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. एकंदर ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण तापू लागले आहे.