शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

स्टेडियम भागातील स्वच्छतागृहाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:13 IST

नारायण चाळ भागात वाहतुकीची कोंडी परभणी : शहरातील नारायण चाळ भागामध्ये वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. या परिसरात चौक ...

नारायण चाळ भागात वाहतुकीची कोंडी

परभणी : शहरातील नारायण चाळ भागामध्ये वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. या परिसरात चौक नसल्याने चारही बाजूंनी येणारी वाहने एकत्र येतात. परिणामी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

बसस्थानकातील बसपोर्टचे काम ठप्प

परभणी : येथील बसस्थानक परिसरात उभारण्यात येत असलेले बसपोर्टचे काम दोन महिन्यांपासून ठप्प आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी निधी उपलब्ध असतानाही वरिष्ठ कार्यालयाकडून तो उपलब्ध होत नसल्याने पुढील काम बंद आहे. एसटी महामंडळाने याकडे लक्ष देऊन बसपोर्टचे काम त्वरित सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

सौर दिवे वर्षभरापासून बंद

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात खेळाडूंच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेले सौर पथदिवे वर्षभरापासून बंद आहेत. या सौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे पथदिवे सुरू करण्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू

परभणी : नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत अनेक भागांत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले नाही. सध्या राजगोपालाचारी उद्यान परिसरात हे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील इतर भागांतही जलवाहिनी टाकली जात आहे.

रोहयोच्या कामांना मिळेना गती

परभणी : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे संथ गतीने सुरू आहेत. रोहयोसाठी एक लाखापेक्षा अधिक मजुरांनी नोंदणी केली असताना या मजुरांना काम उपलब्ध होत नाही. प्रशासनाने कामे वाढवावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

प्रचारफेऱ्यांनी ग्रामीण वातावरण तापले

परभणी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. गावागावात वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. मतदारांच्या थेट भेटी घेण्यावर उमेदवारांनी आता भर दिला आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचाही या निवडणुकीत वापर वाढविण्यात आला आहे. प्रत्यक्ष प्रचाराबरोबरच सोशल मीडियातून प्रचाराने जोर धरला आहे.

आचारसंहितेमुळे रखडली नागरिकांची कामे

परभणी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे विकासकामांना ब्रेक लागला आहे. आचारसंहितेमुळे उपलब्ध झालेला निधी त्या त्या कामांना वितरित करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या तरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू असून, विकासकामे थांबलेली आहेत.