शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

‘ई-पॉस’वरील अंगठा हटला; कोरोनाचा धोका टळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने १ मे पासून ‘ई-पाॅस’ मशिनवर रेशन कार्डधारक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने १ मे पासून ‘ई-पाॅस’ मशिनवर रेशन कार्डधारक लाभार्थ्यांचा अंगठा घेण्याच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील रेशन दुकानदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभधारकांना ३ किलो गहू व २ किलो तांदुळ असे ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्यापासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याअंतर्गत संबधित लाभार्थ्यांसाठी एकूण ५ किलो धान्य मोफत देण्यासाठीचे नियतन जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे धान्य वाटप लवकरच सुरू होणार आहे. अशात राज्य शासनाने ‘ई-पाॅस’ मशिनवर अंगठा घेऊन धान्य वाटप करण्याचे आदेश दिले होते. कोरोनाच्या संकटात ‘ई-पाॅस’ मशिनवर अंगठा घेण्याची जोखीम रेशन दुकानदारांना वाटत होती. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मे महिन्यापूरते ‘ई-पाॅस’ मशीन बाजूला ठेण्याचे आदेश दिले आहे. गेले ३ महिने सलग ज्या लाभार्थ्यांनी धान्य घेतले आहे, त्यांना ‘ई-पाॅस’ मशिनवर अंगठा न लावताच धान्य देण्यात येणार आहे. ज्यांनी ३ महिन्यांपूर्वी धान्य घेतले होते, त्यांची स्वतंत्र नोंद घेऊन धान्य दिले जाणार आहे.

रेशन दुकानदारांच्या मागण्या काय?

मे महिन्यापुरते शासनाने ई-पाॅस मशिनवर अंगठा न घेता धान्य वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची लवकर शक्यता वाटत नाही. त्यामुळे संसर्ग कमी होईपर्यंत मुदतवाढ द्यावी.

रेशन दुकानदारांना ५० लाखाची विमा सुरक्षा मंजूर करावी, प्रलंबित रिबीट वाटप करावे, पीपीई किट, मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा करावा. प्रत्येक दुकानदाराचे लसीकरण करून घ्यावे, कोरोना काळात ज्या रेशन दुकानदारांचा मृत्यू झाला त्यांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर करावे आदी रेशन दुकानदारांच्या मागण्या आहेत.

लाभार्थ्यांची भीती दूर होणार

ई-पाॅस मशिनवर अनेक लाभार्थी अंगठा लावतात. त्यातूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता १ महिना का होईना यातून सवलत मिळाल्याने लाभार्थ्यांची भीती दूृर होणार आहे.

रेशन दुकानावर सॅनिटायझर राहणार का ?

सध्यस्थितीत अनेक रेशन दुकानदार स्वत:च्या खिशाला झळ सोसून दुकानात सॅनिटायझर ठेवत आहेत; प्रशासनानेच सॅनिटायझरचा पुरवठा करावा, अशी या दुकानदारांची मागणी आहे.

काही रेशन दुकानदार मात्र त्यांच्या दुकानात सॅनिटायझर ठेवत नाहीत. लाभार्थ्यांनीच ते घेऊन यावे, अशा त्यांच्या सूचना आहेत.

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुक्याध्यक्ष बाबूआप्पा साळेगांवकर यांनी प्रशासनाकडे सॅनिटायझर देण्याची मागणी केली आहे.

मे महिन्यासाठी राज्य शासनाने ‘ई-पाॅस’ मशिनवर लाभार्थ्यांचा अंगठा घेऊन नये, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व रेशन दुकानदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.

-मंजूषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी