शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार प्रस्ताव केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

परभणी: शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ...

परभणी: शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात १० हजार २४ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यातील महावितरण कंपनीच्या वतीने ५ हजार १५४ प्रस्ताव मंजूर करुन ३ हजार २६३ प्रस्ताव रद्द केले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास ९२ हजार कृषीपंपधारकांना वीजपुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यात १३२ केव्ही केंद्राबरोबरच ३३ केव्ही उपकेंद्राची उभारणी कऱण्यात आली असली तरी जिल्ह्यातील कृषीपंपधारकांना वीजपुरवठा करताना ती तोडकी पडत आहे. यावर उपाय म्हणून तत्कालीन राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व सर्वसाधारण या दोन गटातील लाभार्थ्यांना लाभ दिला होता. सर्वसाधारण गटासाठी १६ हजार रुपयांचा भरणा केल्यानंतर सौर कृषीपंपाचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो. या योजनेंतर्गत जिल्ह्यातून आतापर्यंत १० हजार २४ कृषीपंपधारकांनी आपले अर्ज वीज वितरण कंपनीकडे दाखल केले. या अर्जांची पडताळणी केल्यानंतर महावितरणकडून ५ हजार १५४ प्रस्तावच पात्र ठरविण्यात आले. विशेष म्हणजे ३ हजार २६३ प्रस्तावांमध्ये वेगवेगळ्या चुका काढत ते अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत पात्र प्रस्तावांपैकी ४ हजार ७१५ प्रस्ताव सौर कृषीपंप योजनेतील ठरवून दिलेल्या कंपन्यांकडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये टाटा सोलर पंप, सीआरआय सोलर पंप, जैन सोलर पंप, मुद्रा सोलर पंप यासह १३ कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांकडून आतापर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ५८९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे या कंपन्यांकडूनही संथगतीने काम सुरु असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचाही लाभ रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी घेता येईना. त्यामुळे वीजवितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्याने याकडे लक्ष देऊन पात्र लाभार्थ्यांना सौर कृषीपंपाचा लाभ द्यावा, अशी मागणी लाभार्थी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ऑनलाईन अर्ज भरणा साईड बंद

शेतकऱ्यांच्या हितासाठी ठरलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेसाठी जवळपास २ वर्षापूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यामध्ये १० हजार २४ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला, त्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोयीचे झाले आहे. मात्र इतर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.