शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार प्रस्ताव केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

परभणी: शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ...

परभणी: शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात १० हजार २४ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यातील महावितरण कंपनीच्या वतीने ५ हजार १५४ प्रस्ताव मंजूर करुन ३ हजार २६३ प्रस्ताव रद्द केले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास ९२ हजार कृषीपंपधारकांना वीजपुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यात १३२ केव्ही केंद्राबरोबरच ३३ केव्ही उपकेंद्राची उभारणी कऱण्यात आली असली तरी जिल्ह्यातील कृषीपंपधारकांना वीजपुरवठा करताना ती तोडकी पडत आहे. यावर उपाय म्हणून तत्कालीन राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व सर्वसाधारण या दोन गटातील लाभार्थ्यांना लाभ दिला होता. सर्वसाधारण गटासाठी १६ हजार रुपयांचा भरणा केल्यानंतर सौर कृषीपंपाचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो. या योजनेंतर्गत जिल्ह्यातून आतापर्यंत १० हजार २४ कृषीपंपधारकांनी आपले अर्ज वीज वितरण कंपनीकडे दाखल केले. या अर्जांची पडताळणी केल्यानंतर महावितरणकडून ५ हजार १५४ प्रस्तावच पात्र ठरविण्यात आले. विशेष म्हणजे ३ हजार २६३ प्रस्तावांमध्ये वेगवेगळ्या चुका काढत ते अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत पात्र प्रस्तावांपैकी ४ हजार ७१५ प्रस्ताव सौर कृषीपंप योजनेतील ठरवून दिलेल्या कंपन्यांकडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये टाटा सोलर पंप, सीआरआय सोलर पंप, जैन सोलर पंप, मुद्रा सोलर पंप यासह १३ कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांकडून आतापर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ५८९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे या कंपन्यांकडूनही संथगतीने काम सुरु असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचाही लाभ रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी घेता येईना. त्यामुळे वीजवितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्याने याकडे लक्ष देऊन पात्र लाभार्थ्यांना सौर कृषीपंपाचा लाभ द्यावा, अशी मागणी लाभार्थी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ऑनलाईन अर्ज भरणा साईड बंद

शेतकऱ्यांच्या हितासाठी ठरलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेसाठी जवळपास २ वर्षापूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यामध्ये १० हजार २४ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला, त्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोयीचे झाले आहे. मात्र इतर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.