शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने हजारो विद्यार्थ्यांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:20 IST

परभणी : आरोग्य विभागाच्या वतीने २५ व २६ सप्टेंबर रोजी घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने परीक्षेसाठी ...

परभणी : आरोग्य विभागाच्या वतीने २५ व २६ सप्टेंबर रोजी घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने परीक्षेसाठी परभणीत आलेल्या विविध जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रासही सहन करावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

आरोग्य विभागाला सक्षम करण्यासाठी या विभागात पदभरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्यक असलेली पदभरती करण्याचे काम मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा.लि या कंपनीला देण्यात आले; मात्र ही कंपनी उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यास व आसन व्यवस्था करण्यास असमर्थ ठरली. तसेच कंपनीच्या संचालकांनी परीक्षा घेण्याबाबत असमर्थता दर्शविली. त्यामुळे २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आली.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. बाहेर जिल्ह्यातूनही अनेक विद्यार्थी परभणीत दाखल झाले होते. तर परभणी जिल्ह्यातूनही अनेक विद्यार्थी औरंगाबाद, लातूर, नांदेड या सारख्या जिल्ह्यात परीक्षेसाठी आदल्या दिवशीच पोहोचले होते; मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.

परभणीत १० हजार विद्यार्थी

आरोग्य विभागाच्या गट क पदासाठी २५ सप्टेंबर रोजी आणि गट ड साठी २६ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार होती. २५ सप्टेंबर रोजी ३० केंद्रांवर ८ हजार ४६३ विद्यार्थी तर २६ सप्टेंबर रोजी गट ड साठी ३६ केंद्रांवर १० हजार ९५८ विद्यार्थी परीक्षा देणार होते. रेल्वे आणि बसने अनेक विद्यार्थी आदल्या दिवशीच परभणीत दाखल झाले होते; मात्र परीक्षाच रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

आरोग्य विभागाने केली होती तयारी

ज्या एजन्सीला परीक्षा घेण्याचे काम दिले होते, ती कमी पडत असल्याने आरोग्य विभागाला शेवटच्या टप्प्यात परीक्षा पार पाडण्यासाठी एजन्सीला सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी येथील आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ लिपिक अशा ५० अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी परीक्षेसाठी नियुक्ती केली होती.

जिल्ह्यातील एकूण केंद्र

३०

१०९५८

परीक्षार्थी